शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: July 21, 2014 00:11 IST

शेतकऱ्यांच्या असहायता व अज्ञानाचा फायदा उचलत खत विक्रेते शेतकऱ्यांकडून खताची छापील किमतीपेक्षा जास्त किंमत वसूल करीत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे.

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या असहायता व अज्ञानाचा फायदा उचलत खत विक्रेते शेतकऱ्यांकडून खताची छापील किमतीपेक्षा जास्त किंमत वसूल करीत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षीही मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही भागात रोवणीच्या कामालाही सुरूवात झाली आहे. पुढील आठ दिवसात सर्वच शेतकरी धान रोवणीचे काम सुरू करणार आहेत. धानाची रोवणी करतेवेळीच शेतकरी रासायनिक खते टाकतात. आजपर्यंत पावसाने दडी मारली असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी खते खरेदी केले नव्हते. आता पाऊस सुरू झाल्याबरोबर खतांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या गरजेचा व गर्दीचा फायदा खत विक्रेत्यांकडून उचलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीकधी खत उपलब्ध असतानाही खताची टंचाई असल्याचे वातावरण तयार करण्यात येते. वेळेवर खत टाकणे आवश्यक असल्याने शेतकरी कितीही किंमत देण्यास तयार होतो. अशावेळी शेतकऱ्यांकडून अधिकची किंमत आकारण्यात येते. यामुळे खत दुकानदाराचा फायदा होत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. खताचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांनी खत विक्री केंद्रावर स्वत: भेट देऊन खत विक्री केंद्राची तपासणी करावी. एखाद्या खत विक्रेत्यांकडून अधिकची किंमत आकारली जात असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर कारवाई करावी. खत विक्रेत्याने दुकानासमोर दरफलक लावावे व शासनाच्या नियमाप्रमाणेच खताची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे. खतांचा काळाबाजार दरवर्षीच केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी मात्र अशा प्रकारचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्यामुळे खताच्या काळाबाजारावर नियंत्रण राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)