शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

५५ नवीन बाधित तर २६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 5:00 AM

शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील एकाचा मृत्यू : एकूण बाधित झाले १ हजार ८९६, सर्वाधिक गडचिरोलीतील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज २६ जण कोरोनामुक्त झाले असताना नवीन ५५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनारुग्णांची संख्या ५६५ झाली आहे. देसाईगंज येथील एका महिला कोरोनारुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या ८ वर पोहोचली आहे.आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ वर गेली असून पुढील दोन दिवसात दोन हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी १ हजार ३२३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.नवीन बाधित गडचिरोलीच्या रुग्णांमध्ये सोनापूर कॉम्प्लेक्सचे ३, गोकुळनगर ३, धुंडेशिवणी, पार्डी कुपी, हनुमान वार्ड, सुयोगनगर नवेगाव, रामपुरी वार्ड, महिला महाविद्यालय, सी-६० जवान, वनश्री कॉलनी, जिल्हा रूग्णालय, रामनगर वार्ड नं.८, सद्गुरू नगर नगर परिषदजवळ, आनंद नगर, सेमाना रस्ता, तसेच ब्रह्मपुरी व मूल येथील रुग्ण आहेत. देसाईगंज येथील ७ जणांमध्ये एसआरपीएफ ७, अहेरी २, सिरोंचा ४ यात आरोग्य कर्मचारी २, इतर २, आरमोरी ३, चामोर्शी २, हनुमान वार्ड १, येनापूर १, धानोरा येथील सीआरपीएफ २, एटापल्लीच्या ६ मध्ये सीआरपीएफ ४, आरोग्य कर्मचारी १, तसेच कोरची येथील २, मुलचेरा १ व कुरखेडा येथील २ जणांचा समावेश आहे.७३ टक्के पुरूष तर २७ टक्के महिला बाधितजिल्ह्यात आतापर्यंत प्रतिलक्ष ३ हजार ९९७ तपासण्या केल्या गेल्या. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ४.२९ टक्के तर निगेटिव्ह रेट ९४.७१ टक्के आहे. पुरुष ७३ टक्के तर महिलांचे प्रमाण २७ टक्के आहे. सद्या ५३७ क्रियाशिल रुग्ण असून त्यांची टक्केवारी एकूण बाधितांच्या २९ टक्के आहे. मृत्यू ८ असून त्याची टक्केवारी ०.४३ म्हणजे आर्ध्या टक्क्याहून कमी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यूदर गडचिरोलीत आहे. चाचण्यांच्या बाबतीतही जिल्हा आघाडीवर आहे. डबलिंग रेट जिल्ह्यात १७.९ असून या महिन्यात रुग्ण वाढल्याने प्रतिदिन ४० च्या प्रमाणात संख्या वाढत आहे.जनता कर्फ्यू करणार की नाही?जिल्ह्याच्या सर्व भागात नाही तरी किमान शहराच्या हद्दीत ‘जनता कर्फ्यू’ पाळून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याची गरज आहे. अनेक दुकानदार त्याबाबतची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. काही व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप जनता कर्फ्यूसंदर्भात निर्णय झालेला नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू