शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील २४७३ युवक-युवतींना पोलिसांच्या पुढाकाराने मिळाली नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 11:10 IST

जिल्हा पोलीस दलाने गेल्या तीन वर्षांत २४७३ युवक-युवतींना विविध क्षेत्रांत नोकरी मिळवून देऊन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे.

ठळक मुद्देनक्षल विचारसरणीपासून दूर ठेवण्यात आले यशरोजगाराची समस्या मिटल्याने तरुणांना दिलासा

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षलवादाने बरबटलेल्या आणि उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी नवयुवकांसाठी रोजगार ही महत्त्वाची समस्या आहे. या जिल्ह्यात नक्षलवाद फोफावण्याचे मूळही याच समस्येत आहे. यातूनच आतापर्यंत अनेक युवक-युवतींनी अजाणतेपणे नक्षल चळवळीची वाट धरली; पण आता जिल्हा पोलीस दलाने त्यांना नक्षल चळवळीत जाण्यापासून रोखण्यासाठी रोजगाराचे नवीन पर्याय उपलब्ध करून देत त्यांना बाहेरची दुनिया दाखविली. त्यातून गेल्या तीन वर्षांत २४७३ युवक-युवतींना विविध क्षेत्रांत नोकरी मिळवून देऊन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे.

जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात येथील काही कंपन्यांशी बोलणे केले. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील युवा वर्गात क्षमता आणि प्रामाणिकपणा आहे. केवळ थोड्या प्रशिक्षणाची गरज होती. विविध शासकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचीही सोय केली आणि टप्प्याटप्प्याने सुरक्षा रक्षक, नर्सिंग असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रीशियन, प्लंम्बिंग, वेल्डिंग, फिल्ड ऑफिसर अशा विविध क्षेत्रांत आणि विविध शहरांमध्ये युवक-युवतींना नोकरी मिळवून दिली. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबविले जात आहेत.

२७३७ जणांना व्यावसायिक प्रशिक्षण

प्रत्येक युवक-युवतीला नोकरी देणे शक्य नसल्याने किमान व्यावसायिक कौशल्य असल्यास स्वयंरोजगार उभारता येईल, या दृष्टीने पोलिसांकडून सातत्याने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात ब्युटीपार्लर, शिवणकाम, फोटोग्राफी, वाहन दुरुस्ती, मत्स्यपालन, कुक्कुटपाल, बदक पालन, शेळी पालन, फास्ट फूड, पापड-लोणचे, पालेभाज्या लागवड, मधमाशी पालन, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही देण्यात आले. एवढेच नाही, तर बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करून स्वयंरोजगार उभारण्याचा मार्गही प्रशस्त केला. आतापर्यंत २७३७ जणांना वेगवेगळे प्रशिक्षण मिळाले आहे.

नक्षल भरतीवर परिणाम

खासगी का असेना, मिळालेल्या नोकरीच्या निमित्ताने प्रथमच जिल्ह्याबाहेर गेलेल्या युवा वर्गाला बाहेरची दुनिया पाहता आली. आपण कुठे आहे आणि दुनिया कुठे आहे, नक्षलवादामुळे आपण किती मागे राहिलो याचीही जाणीव होऊ लागली. याचा परिणाम नक्षल भरतीवर झाला आहे. नक्षल चळवळीत जाण्यासाठी आता कोणीही तयार नाही. त्यामुळे नक्षल्यांनी चळवळीत येण्यासाठी छत्तीसगडमधील लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

एका गावात एका मुलाला नोकरी लागली तर तो संपूर्ण गावकऱ्यांचे मनपरिवर्तन करतो. त्यातून गावकऱ्यांचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण होत आहे. गावातील इतर युवक-युवतीमध्येही आत्मविश्वास निर्माण होऊन पोलीस हे आपल्या परिवाराचाच भाग आहेत, असेही त्यांना वाटते. आम्हाला हेच अभिप्रेत आहे.

संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली

टॅग्स :Socialसामाजिकgadchiroli-acगडचिरोलीPoliceपोलिसjobनोकरी