शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

१०० पाळणाघरे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 01:25 IST

सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.

लोकमत विशेष
दिलीप दहेलकर गडचिरोली
सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अशी मुले कुपोषीत होण्याची शक्यता असते. सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेऊन सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली ग्रामपंचायतीमार्फत चालू वर्षात जिल्ह्यात १०० पाळणाघरे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाला २६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पाळणाघरे सुरू होणार आहेत.
राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून सहा जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गावांमध्ये पाळणाघरे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कोणती गावे शासनाच्या निधीतून पाळणाघरे सुरू करणार याबाबत संबंधित ग्रामसभेचा ठराव व प्रस्ताव जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाला सादर करणे आवश्यक आहे.
पाळणाघर योजना कार्यान्वित करण्यासाठी महिला ग्रामसभेमध्ये सदर विषय घेण्यात यावा, महिा सदस्य व स्थानिक माता यांच्या संयुक्त बैठकीत पाळणाघराची वेळ व जागा निश्चित करावी, असेही शासनाने म्हटले आहे. पाळणाघरासाठी अंगणवाडीत जागा उपलब्ध नसल्यास ग्रामसभेनी इतर उपयुक्त जागेची निवड करावी, मात्र या ठिकाणी शौचालय, पाण्याची सुविधा व स्वयंपाकाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. पाळणाघराचे काम सांभाळण्यासाठी संबंधित गावातील दोन महिलांची निवड करण्यात येणार आहे. या दोन्ही महिलांना प्रती महिना एक हजार ६०० रूपये मानधन मजुरी म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने या गावातील मजूर वर्ग बाहेर जिल्ह्यात बाहेर गावांमध्ये कामासाठी जातो. त्यामुळे दिवसभर अशा मजुरांच्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने सदर मुले कुपोषीत होतात. कुपोषण समस्येवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा पाळणाघराची योजना कार्यान्वित करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.
ग्रा.पं.कडून थकीत अनुदान परत घेणार
पाळणाघर चालविण्यासाठी राज्य शासनाकडून मिळालेला निधी जि.प. प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केला. मात्र काही ग्रामपंचायती पूर्ण कालावधीत पाळणाघरे चालविली नाहीत. अशा ग्रामपंचायतीकडे जवळपास १० लाखांचे अनुदान थकीत आहे. जुने थकीत अनुदान संबंधित ग्रामपंचायतीकडून जि.प. प्रशासन आता परत घेणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. थकीत अनुदान परत केल्याशिवाय या ग्रा.पं.ना चालू वर्षात पाळणाघरे सुरू करता येणार नाही.
दीड महिन्यात एकही प्रस्ताव नाही
नव्याने पाळणाघर सुरू करण्यासाठी जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाने एप्रिल महिन्यापासून ग्रामसभांचे ठराव व प्रस्ताव मागितले आहेत. या संदर्भात गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना व महिलांना माहिती दिली आहे. मात्र दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही महिला व बालकल्याण विभागाला एकाही ग्रामसभेचा ठराव व प्रस्ताव प्राप्त झाला नाही.
केवळ १५ पाळणाघरे पूर्णवेळ कार्यान्वित
राज्य शासनाच्या निर्णयानंतर २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात मंजूर ९४ पैकी प्रत्यक्षात ८८ पाळणाघरे सुरू करण्यात आली. कोरची, देसाईगंज, गडचिरोली व मुलचेरा आदी चार तालुक्यांत १५ पाळणाघरे दोन वर्षे पूर्णवेळ चालविण्यात आले होते. इतर गावातील पाळणाघरे अल्पावधीतच बंद पडली.