शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 3:14 PM

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही.

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. अनेकदा आहारतज्ज्ञ थंडीमध्ये भात न खाण्याचा सल्ला देतात. परंतु भात हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक घरामध्ये दररोज तयार करण्यात येतो. खरं तर भातामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्याचे शरीराला अनेक फायदेही आहेत. परंतु यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात पांढरा तांदूळ खातात. त्यांना टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. 

अनेक संशोधनातून या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे की, दररोज भात खाल्याने आर्सेनिकसारखे विषारी रसायन शरीरामध्ये प्रवेश करते. ज्यामुळे कॅन्सर, हृदय रोग आणि डायबिटीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, भातामध्ये दुसऱ्या गोष्टींच्या तुलनेत 10 ते 20 टक्के जास्त आर्सेनिक रसायन आढळून येतं. ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

जर तुम्ही ब्राउन राइस खात असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम अजिबात दिसून येत नाहीत. अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचाच वापर करतात. जर तुम्हीही जास्त प्रमाणात भाताचे सेवन करत असाल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शरीराच्या अनेक समस्यांबाबत...

1. लठ्ठपणाचा वाढता धोका

जर तुम्ही नियमितपणे पांढऱ्या तांदळाचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. अशातच भात खाल्याने वजन वेगाने वाढते. 

2. पोटाच्या समस्या 

पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबर्सचे योगदान फार महत्त्वाचे असते. परंतु जर तुम्ही तांदूळ खात असाल तर त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. तांदळामध्ये फायबर्स नसतात. ज्यामुळे पोटामध्ये पचनाशी निगडीत समस्यांचाही सामना करावा लागतो. 

3. डायबिटीजचा धोका 

डायबिटीज होण्याची अनेक कारणं असतात, परंतु जर तुम्ही दररोज आहारात तांदळाचा समावेश करत असाल तर त्यामुळे तुम्हालाही डायबिटीजचा धोका संभवतो. तांदळाचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते. 

4. हाडांसाठीही हानिकारक

तांदूळ हाडांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण फार कमी असते. ज्यामुळे याचे सेवन केल्याने हाडांना नुकसान पोहोचते. परिणामी हाडं ठिसूळ होतात. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य