शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

पावसाळ्यामध्ये काय ठरतं फायदेशीर?; फळं की, फळांचे ज्यूस?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:05 PM

फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं? खरचं का? तुम्हाला काय वाटतं....?

जर तुम्ही विचार करत असाल की, फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं, तर कदाचित तुमचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. खरं तर ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही फळांऐवजी ज्यूसचा पर्याय निवडणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यामध्ये आहारतज्ज्ञ फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच बाजारात मिळणारे पॅकेटबंद ज्यूस किंवा फळांपासून तयार केलेले ज्यूसही पिण्याऐवजी फळंच फायदेशीर ठरतात, असं त्यांच म्हणणं असतं. जाणून घेऊया आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं? फळं खाणं की फळांचे ज्यूस पिणं?

फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिण्याचा ट्रेन्ड 

सध्या लोकांचा असा समज झाला असल्याचं दिसून येत आहे की, फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. असं समज होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे, तुम्ही हे ज्यूस तुम्हाला पाहिजे तेव्हा पिऊ शकता. तसेच तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्येही हे अगदी सहज कॅरी करू शकता. हे सर्व खरं असलं तरिदेखील फळांऐवजी ज्यूस पिणं हा उत्तम पर्याय ठरू शकत नाही. कारण फळांमधील अनेक पोषक तत्व ज्यूस तयार करताना नष्ट होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, त्यामुळे ज्यूसमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होण्याची शक्यता असते. 

काय ठरतं उत्तम फळं की फळांचे ज्यूस? 

फळांमध्ये अस्तित्वात असणारं फायबर पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतं, त्यामुळे शरीर बराच काळापर्यंत हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. पण हेच जर फळांचा ज्यूस करायचं ठरवलं तर त्या प्रक्रियेमध्ये फळांमधील फायबर पूर्णपणे निघून जातात. 

वेगाने वाढते ब्लड शुगर 

शरीराला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स अब्जॉर्ब करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कमी वेळात ज्यूस अब्जॉर्ब होतात. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते. अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. काही फळांच्या सालींमध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारे न्यूट्रिशंस असतात. पण पॅकेटबंद ज्यूस तयार करताना फळांच्या साली काढून त्यानंतर त्यांचा वापर करण्यात येतो. तसेच डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी ज्यूस पिणं हेल्दी ऑप्शन नाही. 

इन्फेक्शनचा धोका अधिक 

पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त धोका हा इन्फेक्शनचा असतो. ज्यूस पॅकेटबंद असो किंवा तुम्ही तयार केलेला, त्यामध्ये घातक बॅक्टेरियांचा समावेश कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. पण त्याऐवजी फळांमध्ये तुम्ही स्वतः हाताने निवडून त्यानंतर स्वच्छ धुवूनच खाता. 

पचनासंबंधिच्या तक्रारी...

फळांच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक नसतं. परंतु साखरेचं प्रमाण यामध्ये अधिक असतं. त्यामुळे फळांचा रस प्यायल्यानंतर अनेकदा लूज मोशन्स किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही ज्यूस जास्त पित असाल, तर शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे फळं खाताना अजिबात समस्या होत नाहीत. 

पॅकेटबंद ज्यूस वाढवतात वजन

पॅकेटबंद ज्यूसमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. यामध्ये एनर्जी लेव्हल मोठ्या प्रमाणावर असते. याचा वापर करून भूक वाढते. तसेच वजन वाढण्याची शक्यताही वाढते. अशातच वजन कमी करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. फळं खाल्याने पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. ज्यामुळे तुम्ही फूड क्रेविंगपासून बचाव करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह