शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 18:14 IST

Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.

ठळक मुद्देनिसर्गमित्रचा प्रयोग यशस्वी : ४१ प्रकारच्या वनस्पतींची लागवड जिल्ह्यातील ४५ कुटुंबे बनवितात रंग

संदीप आडनाईककोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या बिया रुजवून जिल्ह्यातील ४५ कुटुंबांनी वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती केली आहे. याशिवाय विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासूनही या कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे.गेल्या १५ वर्षांपासून निसर्गमित्र परिवार या संस्थेमार्फत प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काम केले जाते. दरवर्षी रंगपंचमीही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी व्हावी, यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि त्यांच्या पत्नी राणिता चौगुले दरवर्षी रंगनिर्मितीच्या कार्यशाळा घेतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या रंगांचा वापर करून कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, अहमदनगर, नांदेड, अमरावती जिल्ह्यांमधील निसर्गप्रेमी रंगपंचमी साजरी करतात.संस्थेतर्फे सात वर्षांपूर्वी रंग देणाऱ्या वनस्पतींची रोपे तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले होते. यंदा यामध्ये बहावा, बेल, आवळा, कढीपत्ता, शेंद्री, पारिजातक, पळस, जांभूळ, शेवगा, भोकर, कडुलिंब, गोकर्ण, बकुळ, कुंकूफळ, टाकाळा, कोकम, जास्वंद, झेंडू आदी वनस्पतींची रोपे देण्यात आलेली होती.रंगपंचमीसाठी रंगांचा मोठा वापरया अनेक वनस्पतींपासून तयार केलेले रंग मोठ्या प्रमाणात रंगपंचमीसाठी वापरण्यात येतात. याशिवाय चित्र रंगवणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, खाद्यरंग, सरबत, मिठाई, आईस्क्रिम, केक तयार करणे, गणपतीच्या मूर्तीसाठी या रंगांचा वापर करणे, लग्नसमारंभातील अक्षता रंगवण्याकरिता, हळद खेळण्याकरिता, कपडे डाय करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी रंग वापरण्यात येतो.४५ कुटुंबांनी तयार केली रंगनिर्मितीपळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या विविध वनस्पतींच्या बिया रुजवून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीच्या झाडांपासून तसेच विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तसेच विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर