शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 18:14 IST

Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.

ठळक मुद्देनिसर्गमित्रचा प्रयोग यशस्वी : ४१ प्रकारच्या वनस्पतींची लागवड जिल्ह्यातील ४५ कुटुंबे बनवितात रंग

संदीप आडनाईककोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या बिया रुजवून जिल्ह्यातील ४५ कुटुंबांनी वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती केली आहे. याशिवाय विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासूनही या कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे.गेल्या १५ वर्षांपासून निसर्गमित्र परिवार या संस्थेमार्फत प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काम केले जाते. दरवर्षी रंगपंचमीही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी व्हावी, यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि त्यांच्या पत्नी राणिता चौगुले दरवर्षी रंगनिर्मितीच्या कार्यशाळा घेतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या रंगांचा वापर करून कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, अहमदनगर, नांदेड, अमरावती जिल्ह्यांमधील निसर्गप्रेमी रंगपंचमी साजरी करतात.संस्थेतर्फे सात वर्षांपूर्वी रंग देणाऱ्या वनस्पतींची रोपे तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले होते. यंदा यामध्ये बहावा, बेल, आवळा, कढीपत्ता, शेंद्री, पारिजातक, पळस, जांभूळ, शेवगा, भोकर, कडुलिंब, गोकर्ण, बकुळ, कुंकूफळ, टाकाळा, कोकम, जास्वंद, झेंडू आदी वनस्पतींची रोपे देण्यात आलेली होती.रंगपंचमीसाठी रंगांचा मोठा वापरया अनेक वनस्पतींपासून तयार केलेले रंग मोठ्या प्रमाणात रंगपंचमीसाठी वापरण्यात येतात. याशिवाय चित्र रंगवणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, खाद्यरंग, सरबत, मिठाई, आईस्क्रिम, केक तयार करणे, गणपतीच्या मूर्तीसाठी या रंगांचा वापर करणे, लग्नसमारंभातील अक्षता रंगवण्याकरिता, हळद खेळण्याकरिता, कपडे डाय करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी रंग वापरण्यात येतो.४५ कुटुंबांनी तयार केली रंगनिर्मितीपळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या विविध वनस्पतींच्या बिया रुजवून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीच्या झाडांपासून तसेच विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तसेच विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर