शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

रंगपंचमी विशेष : हजारो निसर्गप्रेमी करतात नैसर्गिक रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 18:14 IST

Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.

ठळक मुद्देनिसर्गमित्रचा प्रयोग यशस्वी : ४१ प्रकारच्या वनस्पतींची लागवड जिल्ह्यातील ४५ कुटुंबे बनवितात रंग

संदीप आडनाईककोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे.बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या बिया रुजवून जिल्ह्यातील ४५ कुटुंबांनी वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती केली आहे. याशिवाय विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासूनही या कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे.गेल्या १५ वर्षांपासून निसर्गमित्र परिवार या संस्थेमार्फत प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काम केले जाते. दरवर्षी रंगपंचमीही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी व्हावी, यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि त्यांच्या पत्नी राणिता चौगुले दरवर्षी रंगनिर्मितीच्या कार्यशाळा घेतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या रंगांचा वापर करून कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, अहमदनगर, नांदेड, अमरावती जिल्ह्यांमधील निसर्गप्रेमी रंगपंचमी साजरी करतात.संस्थेतर्फे सात वर्षांपूर्वी रंग देणाऱ्या वनस्पतींची रोपे तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले होते. यंदा यामध्ये बहावा, बेल, आवळा, कढीपत्ता, शेंद्री, पारिजातक, पळस, जांभूळ, शेवगा, भोकर, कडुलिंब, गोकर्ण, बकुळ, कुंकूफळ, टाकाळा, कोकम, जास्वंद, झेंडू आदी वनस्पतींची रोपे देण्यात आलेली होती.रंगपंचमीसाठी रंगांचा मोठा वापरया अनेक वनस्पतींपासून तयार केलेले रंग मोठ्या प्रमाणात रंगपंचमीसाठी वापरण्यात येतात. याशिवाय चित्र रंगवणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, खाद्यरंग, सरबत, मिठाई, आईस्क्रिम, केक तयार करणे, गणपतीच्या मूर्तीसाठी या रंगांचा वापर करणे, लग्नसमारंभातील अक्षता रंगवण्याकरिता, हळद खेळण्याकरिता, कपडे डाय करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी रंग वापरण्यात येतो.४५ कुटुंबांनी तयार केली रंगनिर्मितीपळस, आवळा आदी रंगनिर्मिती करणाऱ्या विविध वनस्पतींच्या बिया रुजवून पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगनिर्मितीसाठीच्या झाडांपासून तसेच विविध सण, उत्सवावेळी वापरलेल्या फुलांपासून ४५ कुटुंबांनी रंगनिर्मिती केली आहे. बेल, पालक, पुदिना, बीट. टोमॅटो, कढीपत्ता, पारिजातक आदी विविध ४१ प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, त्यांच्या साली, तसेच विविध पालेभाज्या, फळभाज्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून रंगनिर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर