शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 09:52 IST

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे.

उदय गायकवाड

कोल्हापूर - गणपतीची आराधना करताना पंचमहाभुतांची पूजा आपण करतोच. मात्र, त्याच महाभुतांना आपण प्रदूषित करतो आणि स्वत: वर संकट ओढवून घेतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्सवाच्या निमित्ताने पाण्याचे, हवेचे, आवाजाचे, प्रकाशाचे, जमिनीचे प्रदूषण होते. ही बाब आता आपल्या लक्षात आली आहे. शाडूची लहान मूर्ती वनस्पतीजन्य रंगात रंगवून पूजेसाठी वापरणारा आणि त्याचे घरच्या घरी विसर्जन करणारा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये तयार झाला आहे. ३० वर्षे प्रबोधनाची सुरू असलेली चळवळ घट्ट रुजली आहे.

१९८८ पासून निर्माल्य व मूर्ती विसर्जन जलस्रोतांमध्ये न करता ते पर्यायी कुंडांमध्ये करण्याची मानसिकता नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्याचे कोल्हापूरमध्ये दिसून येते. चाळीस लाखांच्या जिल्ह्यात गेल्या वर्षी चार लाख ६७ हजार मूर्ती जलस्रोतांमध्ये विसर्जित न होता पर्यायी व्यवस्थेमध्ये विसर्जित झाल्या, ही खूप मोठी बाब आहे. कोल्हापूरमध्ये मिरवणुकीत गुलाल किंवा रंग वापरला जात नाही. घरगुती पातळीवर काही प्रमाणात फटाके फोडले गेले तरी ते प्रमाण नगण्य आहे. पारंपरिक वाद्य वापरण्याकडे बहुतेक मंडळे गेली आणि त्यांनी आता डॉल्बीला नकार दिला आहे. प्रकाशझोताचा खर्च पाहता काही मंडळे वगळता इतरांनी पाठ फिरवली आहे.

चळवळ रुजतेय

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे. नैसर्गिक पाने-फुले, कापड, कागद यांचा वापर करून केलेली सजावट आकर्षक ठरते हे लोकांना पटले आहे.

सृजनशील आविष्कार प्रदर्शित करायला ही उत्तम संधी मानणारा एक युवा वर्ग प्रयत्न करीत आहे. खरे तर ही एक व्यावसायिक संधी म्हणून पाहायला हरकत नाही.

प्लास्टिक नाकारा!

ज्या बाबी आता समजल्या आहेत त्यापेक्षा नव्याने काही मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. प्रसाद, महाप्रसादाच्या निमित्ताने प्लास्टिक प्लेट, ग्लास, वाट्या, द्रोण नाकारून धातूचे किंवा वनस्पतींचे साहित्य वापरले पाहिजे.

खाद्यपदार्थ बनवताना आणि विकत घेताना त्यामध्ये रंग हा वनस्पतीजन्य असावा याकडेही लक्ष दिले पाहिजे. या सर्व मुद्यांकडे लक्ष देऊन जल, जमीन, हवा, प्रकाश, अन्न, अग्नी अशा महाभुतांना प्रदूषित न करता साजरा केलेला उत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक असेल.

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सव