शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाळा सुरू व्हावी, ही तर पालकांची इच्छा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 07:46 IST

एससीईआरटीच्या सर्वेक्षणात ८१ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार.

ठळक मुद्देएससीईआरटीच्या सर्वेक्षणात ८१ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास ८१ टक्के पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास सहमती दर्शविली आहे. राज्यातील तब्बल ५ लाख २५ हजार ८८ पालकांनी यासाठी होकार दिल आहे, तर राज्यातील १ लाख २० हजार ५९४ पालक अजून सुरक्षिततेच्या कारणास्तव मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. एससीईआरटीमार्फत झालेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे.

कल नोंदविलेल्या राज्यातील एकूण पालकांपैकी जवळपास १८ टक्के पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे सांगत आहेत. एससीईआरटीची ही आकडेवारी १२ जुलै २०२१ रोजी रात्री ९ वाजेपर्यंतची असून, हे सर्वेक्षण रात्री ११.५५ पर्यंत सुरू होते.

कोरोनामुक्त भागामध्ये शाळा सुरू कराव्यात का, या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) एक राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील पालक आणि शिक्षकांची शाळा सुरू करण्याबाबत मते नोंदवली गेली. या सर्वेक्षणात सोमवारी रात्री ९पर्यंत एकूण ६ लाख ४५ हजार ६८२ पालकांनी मते नोंदविली. ग्रामीण भागातील २ लाख ८७ हजार ५७८, तर शहरी भागातील २ लाख ९० हजार ८१६ पालकांनी यात सहभाग घेतला. निम शहरी भागातील पालकांची संख्या ६७ हजार २८८ होती. ग्रामीण भागातील पालकांचा सहभाग ४४.५४ टक्के, तर शहरी भागातील पालकांचा ४५.०४ टक्के इतका सहभाग होता.

ग्रामीण भागात पालकांना इंटरनेट कनेक्शन, स्मार्टफोनसारखी संसाधने अशा सुविधा परवडत नसल्याने त्यांचा कल प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याकडे अधिक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत. आता या सर्वेक्षणावरून आणि पालकांचा कल जाणून घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?विद्यार्थ्यांसह शाळा सुरू कराव्यात अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी प्रत्यक्ष अध्यापन झाल्यास विद्यार्थ्यांसाठी ते खूप आश्वासक असेल असे अनुभवातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करणेही आवश्यक आहे. 

त्यातील अनेकांनी सुरक्षित, असुरक्षित वातावरणात कोविडसंदर्भातील, निवडणुकांसंदर्भातील कामे केली आहेत. पुन्हा शालेय काम सुरू करण्याआधी आणि शाळा सुरू करण्याआधी विद्यार्थी आणि शिक्षक यांना योग्य साहाय्य, पाठिंबा आणि समुपदेशनाची गरज आहे.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण