शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

JEE Main exam :  'या' भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 9:56 PM

JEE Main exam: पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा काही भागांत बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, या भागातील जेईई मेन २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे. पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले आहे. "JEE Main परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २५ जुलै आणि २७ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आल्यात. मात्र कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आणि लवकरच नवी तारीख जाहीर केली जाईल", असे ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.

गेल्या रविवावारपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यात पावसाने धूमाकूळ घातला.यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७,२८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधील परीक्षा पार पडली होती.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण