शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Education: पहिली ते सातवीचे वर्ग भरणार, पहिली घंटा १७ ऑगस्टपासून; ८ वी ते १० वीच्या वर्गांना अल्प प्रतिसाद

By अतुल कुलकर्णी | Updated: August 7, 2021 07:12 IST

Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.इयत्ता ८ वी ते १० वीच्या ३६,८३५ पैकी १२,७२५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात ८६,३३,८०५ विद्यार्थ्यांपैकी ८,९८,८९४ विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकूण शाळांच्या ३४.५५ टक्के शाळा सुरू झाल्या मात्र, त्यात फक्त १०.४१ टक्के विद्यार्थ्यांनीच थेट वर्गात येणे पसंत केले आहे. लातूर, अमरावती, नागपूर या तीन विभागात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत आले आहेत. पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. 

शाळांना ‘एसओपी’ पुढील आठवड्यात पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे असावे? याविषयीची ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. 

फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चाशाळांची फी कमी करण्याविषयी  चर्चा सुरू होती. त्याचे पुढे काय झाले असे विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. शाळा सुरू झाल्यानंतर काय ठरवायचे, यावरही बैठकीत चर्चा होईल.  

राज्यात आरटीईचे ६० टक्के प्रवेश पूर्ण- यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी बंद आहेत. अशा परिस्थितीत आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे. - अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झालेले नाहीत. - शिक्षण संचालनालयाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीत राज्यात एकूण रिक्त जागांच्या जवळपास ६० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.- आरटीईअंतर्गत ९,४३२ शाळांमध्ये ९६,६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. - पण पालकांकडून कमी प्रतिसाद मिळाला आणि आवश्यक तेवढे प्रवेश होऊ शकले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी