शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Education: पहिली ते सातवीचे वर्ग भरणार, पहिली घंटा १७ ऑगस्टपासून; ८ वी ते १० वीच्या वर्गांना अल्प प्रतिसाद

By अतुल कुलकर्णी | Updated: August 7, 2021 07:12 IST

Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.इयत्ता ८ वी ते १० वीच्या ३६,८३५ पैकी १२,७२५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात ८६,३३,८०५ विद्यार्थ्यांपैकी ८,९८,८९४ विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकूण शाळांच्या ३४.५५ टक्के शाळा सुरू झाल्या मात्र, त्यात फक्त १०.४१ टक्के विद्यार्थ्यांनीच थेट वर्गात येणे पसंत केले आहे. लातूर, अमरावती, नागपूर या तीन विभागात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत आले आहेत. पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. 

शाळांना ‘एसओपी’ पुढील आठवड्यात पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे असावे? याविषयीची ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. 

फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चाशाळांची फी कमी करण्याविषयी  चर्चा सुरू होती. त्याचे पुढे काय झाले असे विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. शाळा सुरू झाल्यानंतर काय ठरवायचे, यावरही बैठकीत चर्चा होईल.  

राज्यात आरटीईचे ६० टक्के प्रवेश पूर्ण- यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी बंद आहेत. अशा परिस्थितीत आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे. - अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झालेले नाहीत. - शिक्षण संचालनालयाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीत राज्यात एकूण रिक्त जागांच्या जवळपास ६० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.- आरटीईअंतर्गत ९,४३२ शाळांमध्ये ९६,६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. - पण पालकांकडून कमी प्रतिसाद मिळाला आणि आवश्यक तेवढे प्रवेश होऊ शकले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी