शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Education: पहिली ते सातवीचे वर्ग भरणार, पहिली घंटा १७ ऑगस्टपासून; ८ वी ते १० वीच्या वर्गांना अल्प प्रतिसाद

By अतुल कुलकर्णी | Updated: August 7, 2021 07:12 IST

Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.इयत्ता ८ वी ते १० वीच्या ३६,८३५ पैकी १२,७२५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात ८६,३३,८०५ विद्यार्थ्यांपैकी ८,९८,८९४ विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकूण शाळांच्या ३४.५५ टक्के शाळा सुरू झाल्या मात्र, त्यात फक्त १०.४१ टक्के विद्यार्थ्यांनीच थेट वर्गात येणे पसंत केले आहे. लातूर, अमरावती, नागपूर या तीन विभागात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत आले आहेत. पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. 

शाळांना ‘एसओपी’ पुढील आठवड्यात पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे असावे? याविषयीची ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. 

फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चाशाळांची फी कमी करण्याविषयी  चर्चा सुरू होती. त्याचे पुढे काय झाले असे विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. शाळा सुरू झाल्यानंतर काय ठरवायचे, यावरही बैठकीत चर्चा होईल.  

राज्यात आरटीईचे ६० टक्के प्रवेश पूर्ण- यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी बंद आहेत. अशा परिस्थितीत आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे. - अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झालेले नाहीत. - शिक्षण संचालनालयाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीत राज्यात एकूण रिक्त जागांच्या जवळपास ६० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.- आरटीईअंतर्गत ९,४३२ शाळांमध्ये ९६,६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. - पण पालकांकडून कमी प्रतिसाद मिळाला आणि आवश्यक तेवढे प्रवेश होऊ शकले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी