शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

By विजय दर्डा | Updated: June 22, 2020 02:33 IST

मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच योग का शिकविला जात नाही? त्यात काय अडचणी आहेत.

- विजय दर्डारविवारी २१ जूनला संपूर्ण जगाने योगदिन साजरा केला. त्यानिमित्त ‘लोकमत’ समूहाने एका वेबिनारचे आयोजन केले. त्यात सुरुवातीस ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक व जागतिक शांतता आणि बंधुभावासाठी अग्रदूताची भूमिका बजावणारे श्री श्री रविशंकर आणि त्यानंतर भारतीय योगसाधनेने संपूर्ण जगाला आरोग्यसंपन्न करण्याचे व्रत घेतलेले योगगुरू स्वामी रामदेव यांच्याशी सविस्तर बातचीत झाली. मी या दोघांनाही विचारले की, योगाचे महत्त्व वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे व युरोप तसेच जगाच्या इतर अनेक देशांमध्ये योग शिकविला जात आहे, तर मग भारतात शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश का केला जात नाही? मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच योग का शिकविला जात नाही? त्यात काय अडचणी आहेत.आपल्याकडेही योग जीवनाचा अविभाज्य भाग व्हायलाच हवा, असे दोघांनीही आग्रहाने सांगितले. श्री श्री रविशंकर म्हणाले की, शाळांमध्ये तर योग शिकविला जायला हवाच, शिवाय नोकरीच्या ठिकाणीही योग सक्तीचा करायला हवा. कामाच्या ठिकाणी व्यक्ती खूप तणावाखाली असते, हे लक्षात घेता एव्हाना खरेतर अशा सर्व ठिकाणी योगाची व्यवस्था व्हायला हवी होती; पण एवढा उशीर का व्हावा हे कळत नाही. स्वामी रामदेव यांनी फारच चांगले सांगितले की, योगाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. योग सर्वांसाठी आहे व सर्वांनी त्याचा अंगीकार करायला हवा. घरोघरी लोक योगाभ्यास करू लागले, तर त्यासारखी उत्तम गोष्ट दुसरी कुठलीही नाही.

चर्चेमध्ये योगासोबत उद्योगाचा विषयही निघाला. कारण स्वामी रामदेव यांनी योगाप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही नाईलाजाने आयुर्वेदिक उत्पादनांकडे वळविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. योग आणि उद्योग हे असे दोन मार्ग आहेत, ज्यांचा अवलंब केल्याने व्यक्तिगत आरोग्यासोबतच देश स्वावलंबीही होऊ शकतो. आज सर्वांत मोठी अडचण अशी आहे की, जगातील अनेक देश आरोग्याच्या बाबतीत कमजोर होत आहेत (किंवा त्यांना मुद्दाम कमजोर केले जात आहे.) लोकांची रोगप्रतिकार क्षमता कमी होत चालली आहे. परिणामी ‘कोविड-१९’च्या महामारीने जगात लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती ते या साथीची लागण होऊनही वाचले आहेत. कधी ‘सार्स’, कधी ‘चिकुनगुनिया’ तर कधी ‘स्वाईन फ्लू’च्या साथीला लोक बळी पडत असतात. महिन्याला किराणा मालापेक्षा जास्त औषधांवर खर्च करणारे अनेक लोक मला माहीत आहेत.आपण दिनचर्येत योगाचा समावेश केला, तर विषाणूंच्या संसर्गाशी लढण्याची क्षमता आपण प्राप्त करू शकतो. व्यक्तीला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी योग व आयुर्वेद सक्षम आहे; पण दुर्दैवाने इंग्रजी औषधांचे लागेबांधे एवढे प्रबळ आहेत की त्याने आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारपद्धतींना पार दाबून टाकले आहे. इंग्रजी औषधांच्या कंपन्यांपुढे जागतिक आरोग्य संघटनाही अगदी हतबल आहे. सन २०१८ च्या आकडेवारीनुसार, जगभरात औषधांची बाजारपेठ ९१ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे व त्यात दरवर्षी ६.३ टक्क्यांनी वाढ होत आहे. एक रुपया उत्पादनखर्च असलेले औषध १०० रुपयांना विकले जाते. मला तर असे वाटते की, लोकांना ‘जंक फूड’च्या नादी लावणारे एक पद्धतशीर रॅकेट असावे. लोकांनी निकृष्ट आहार घेतला तर ते आजारी पडतील. मग औषधे घेतील व आरोग्य विमा उतरवतील, असे हे दुष्टचक्र आहे.चीनने पाश्चात्यांच्या आहारी न जाता आपले पारंपरिक वैद्यकशास्त्र टिकवून ठेवले व विकसित केले. मग आपण तसे का करू शकत नाही, हा खरा प्रश्न आहे. आपला योग व आयुर्वेदाचा वारसा खूप प्राचीन आहे. आपण जगाला योग व प्राणायाम शिकविला आहे. या दोन्हींचा अवलंब केला तर औषधांवरचा लाखो रुपयांचा खर्च वाचू शकतो. शेवटी सार्वजनिक आरोग्यसेवांवर खर्च होणारा हा पैसा समाजाच्या कल्याणासाठी अन्य कामांवर वापरता येऊ शकेल.स्वामी रामदेव यांच्या आधी योगाचार्य बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजा अय्यंगार यांचे नाव संपूर्ण जगात योगाच्या संदर्भात मोठ्या आदराने घेतले जायचे. पहिल्या महायुद्धानंतर योगाचार्य अय्यंगार यांनी जगाला योगसाधनेने पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याचा संदेश दिला. ‘अय्यंगार योग’ या नावाने त्यांनी योगाची एक नवी पद्धत सुरू केली. ‘जगातील सर्वांत वयोवृद्ध योगशिक्षक’ म्हणून गिनिज बुकात ज्यांची नोंद आहे त्या अमेरिकेतील ९८ वर्षांचे योगशिक्षक ताओ पोर्चोन यांनीही योगाचे धडे अय्यंगार यांच्याकडूनच घेतले होते. चीननेही देशातील सर्वोच्च बहुमानाने अय्यंगार यांचा गौरव केला होता. योगाचे महत्त्व पटल्याने बेल्जियमच्या महाराणीने सन १९५८ मध्ये अय्यंगार यांना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून शीर्षासन शिकले होते. जे. कृष्णमूर्ती, जयप्रकाश नारायण, सचिन तेंडुलकरसह इतरही अनेक मोठे लोक अय्यंगारजींचे शिष्य होते.
मुंगेर येथील ‘बिहार स्कूल आॅफ योगा’ने अद्वितीय कामगिरी केली आहे. याखेरीज भारतात योगाची इतरही प्राचीन पीठे आहेत. हृषिकेशने तर ‘योगाची राजधानी’ अशी ख्याती मिळविली आहे. हा थोर वारसा आपण किती जपत आहोत, किती पुढे नेत आहोत, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. योगामुळे आपल्या जीवनमूल्यांनाही संस्कारित करतो. आपल्याकडे आप्पासाहेब धर्माधिकारी, प्रल्हाद पै व अण्णासाहेब मोरे यांच्यासारख्या महानुभावांंनी समाजात संस्कार रुजविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचा हा वारसाही आपण जपायला हवा.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे योगाभ्यास करतात. पं. नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई व राजीव गांधी हे आपले माजी पंतप्रधानही योग करायचे. असे असूनही योगाला राजाश्रय न मिळणे, हे आश्चर्यकारक आहे; असे का, असे विचारता स्वामी रामदेव यांनी मला सांगितले की, मोदीजी निर्णय घ्यायला जरा संकोच करतात.सध्या आपण पुन्हा एकदा स्वदेशीच्या गप्पा जोरदार सुरू केल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेड इन इंडिया’च्या गोष्टी करत आहोत; पण चीन व बहुराष्ट्रीय कंपन्यांशी दोन हात करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? ज्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत आहे अशी काही उद्योजक घराणी आपल्याकडेही आहेत. पतंजली, डाबर, विको यांसारख्या कंपन्या नक्कीच नेटाने संघर्ष करत आहेत; पण हा संघर्ष दीर्घकाळ करावा लागणार आहे. याच स्तंभात उद्योगाविषयी मी याआधी अनेकदा असे लिहिले की, आपण धोरणे सुलभ केली तरच आपल्याकडे उद्योग विकसित होऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकतील. स्वदेशी उद्योगांची भरभराट होईल तेव्हाच देश स्वावलंबी होऊ शकेल. सध्याच्या स्थितीत योग व उद्योगच आपल्याला जगाच्या पातळीवर बलशाली बनवू शकतात. त्यामुळे औषधांची सवय लागण्याआधीच आपल्याला नव्या पुढीला योगाची ओढ लावावी लागेल. बालवयात लागलेली सवय नंतर आयुष्यभर सुटत नाही, तर योग व देशी कंपन्यांच्या उत्पादनांना जीवनात स्थान द्या. त्याने तुमचे आयुष्य नक्कीच सुखी व आनंदी होईल.

(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगVijay Dardaविजय दर्डा