शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भरोणीया बार, हाती भरमार ।  नेम तो चुकार, कैसा होई उद्धार ।।

By सुधीर महाजन | Updated: August 17, 2019 10:56 IST

घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच.

- सुधीर महाजन

अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णी या दोन उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत ‘घोडे बाजार बंद’ची घोषणा केल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसले. ‘हेचि फळ काय मम् तपाला,’ असा करुणार्त गलका उच्चरवात कानावर आला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसाठी हाच तर कपिलाषष्ठीचा योग असतो. कार्यकाळात घाऊक बाजार एवढाच भरतो. एरवी चिल्लर खुळखुळत फिरावे लागते; पण घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच. त्यामुळे पोटात गोळा येणे, जिवाची घबराट होणे, रक्तचाप वाढणे नैसर्गिकच समजले पाहिजे, अशा मानसिक अस्वस्थतेच्या वातावरणात शिवसेनेचे रांगडे उमेदवार अंबादासरावांनी थेट नाशिक मोहीम हाती घेऊन आपल्या नेक-नामदार ७१ मावळ्यांना तेथे हॉटेलात कुलूपबंद केल्याची माहिती हाती आली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. हॉटेलच्या दारावरच ‘हाऊस फुल्ल’ची पाटीही लटकवली.

शिवसेनेच्या तंबूत एवढी घबराट का उडाली? खरेतर शिवसेना आणि भाजप यांचे संख्याबळ पाहता दानवेंना निवडून येण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही; पण युतीधर्माचे पालन झाले तरच. परिस्थिती तशी नाही. मावळेसुद्धा अखेरपर्यंत साथ देतील का, अशी शंकेची फट असल्याने अंबादास दानवेंनी दोर कापून टाकले आणि मावळ्यांना नाशिक प्रांती पाठविले. कारण भवानी तलवारीसारखे मजबूत, कणखर असणारे इमान आता पाण्यासारखे प्रवाही झाले आहे. सत्ता-संपत्तीच्या घसरगुंडीवर ते सहज घसरताना पावलोपावली दिसते, म्हणूनच ही शिबंदी नाशिकात बंदोबस्तात ठेवली अन् शिवबंधनाचा तोडगा बांधला. या गोंधळात भाजपचे मतदार आपल्याला कोणी सहल घडवते का, याचा अंदाज घेत आहेत.

भाजपने काँग्रेसच्या तंबूचे कळस कापल्यापासून तिकडे सामसूम आहे. अब्दुल सत्तार नावाचे सरदार आपल्या साथीदारांसह बाहेर पडले. आता त्यांची चाकरी कोणाच्या दरबारी रुजू होणार याची उत्सुकताही संपली. मनोमनी त्यांनी भाजपचे मंगळसूत्र बांधण्याचा निर्णय घेतला; पण तिकडून होकारही नाही अन् नकारही नाही, अशी स्थिती असल्याने त्यांची अवस्था अवघडल्यासारखी आहे. ‘महाजनादेश यात्रेत’ ते भाजपवासी होऊन श्रीरामाचा जयघोष करतील, असे वातावरण होते; पण प. महाराष्ट्रात आलेल्या महापुरात हे वातावरण वाहून गेले; पण आता ही यात्रा पुन्हा निघणार असल्याने त्यांना यात्रेत सामील करून घेतले जाईल का, यावर तर्कवितर्क चालू आहेत. घोडेबाजार बंदच्या परस्पर तहानंतर बाबूराव कुठे दिसले नाहीत आणि सत्तार आपल्या सैन्यासह दानवेंच्या मागे उभे राहिल्याचे चित्र उभे करण्यात आले. खरे-खोटे आई भवानीलाच माहीत.

( भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग )

एका चर्चेने मात्र जोर धरला. अंबादास दानवे निवडून आले, तर औरंगाबाद शिवसेनेत मराठ्यांचे वर्चस्व वाढणार. पराभवामुळे चंद्रकांत खैरे अगोदरच बॅकफूटवर गेले आहेत. दानवे हे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मराठा नेत्यांना अडचणीचे ठरू शकतात आणि औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील त्याचा मराठा राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मराठा नेते सावध पावले उचलताना दिसतात. त्यांच्यादृष्टीने आजवर वळचणीला पडलेले कुलकर्णी हे निरुपद्रवी आहेत आणि निवडून आले तरीही निरुपयोगी आहेत. आपल्या जहागिरी शाबूत ठेवण्यासाठी कुळकर्ण्यांवर उपकार करणे हितकारी ठरू शकते. राजकारणाचे असे वेगवेगळे प्रवाह व समीकरणे सध्या मांडली जात आहेत. प्रत्येक जण आपल्या आकलनशक्तीद्वारे अर्थ लावण्यात मश्गूल असताना उरलेल्या नगरसेवकांना वेगवेगळे डोहाळे लागले आहेत.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद