शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

कानडी-मराठीने का करावा एकमेकींचा द्वेष?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 5:11 AM

Kandi-Marathi : कन्नड व मराठी भाषा तसेच संस्कृतीमध्ये शतकानुशतकांचं साहचर्य आहे. हा सांस्कृतिक पूल दोन्हीकडल्या माणसांना का नाही जोडून ठेवू शकत?

- उदय कुलकर्णी(ज्येष्ठ पत्रकार) कोणतीही भाषा व संस्कृती यांचा उद्देश समाजात संवादाचे पूल तयार करणं हा असतो. काळाच्या प्रवाहात राजवटी बदलतात, राज्यांच्या सीमा बदलतात त्याप्रमाणं भाषा व संस्कृती यांच्यावर पडणारा राजकीय प्रभावही बदलत असतो. खरंतर, भिन्न भाषा व संस्कृती यांच्यामध्ये आदान-प्रदान होत राहते तेव्हा दोन्ही भाषा व संस्कृती आणि माणसंही सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होत असतात. कन्नड व मराठी भाषा तसेच संस्कृती यामध्ये असं साहचर्य शतकानुशतके चालत आलेलं आहे. भाषावार प्रांतरचनेचा फतवा अंमलात आला आणि वादग्रस्त सीमा भागातील परभाषिकांकडे राज्यकर्ते जणू शत्रू म्हणून पाहू लागले. आपल्या राज्यातील परभाषिकांचं व त्यांच्या भाषेचं खच्चीकरण करण्याचा विडा उचलल्याप्रमाणं विशेषत: कर्नाटक सरकार गेली अनेक वर्षे वागत आलं आहे. महाराष्ट्रकर्नाटक या दोन्ही राज्यांतील सत्तेवरचे पक्ष बदलले, पण या प्रश्‍नाबाबत दोन्ही राज्यांतील राजकीय नेत्यांची वक्तव्ये आक्रमकच राहिली. वास्तविक, दोन्ही भाषिकांना आपापल्या भाषांच्या विकासाची आणि समृद्धीची संधी मिळेल याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात न्यायालय राज्यांच्या सीमेबाबत द्यायचा तो निर्णय देईल, पण त्याचा परिणाम मानवी संबंधांवर व सांस्कृतिक आदान-प्रदानावर होऊ नये. आपण मराठी माणसं अण्णा, अप्पा अशी जी संबोधनं  वापरतो त्यांचं मूळ कानडी भाषेत आहे हे आपल्याला माहीत आहे का? मराठी स्त्रिया अय्या किंवा इश्श असं म्हणतात तेव्हा ते शब्द तमिळ भाषेतून मराठीत आलेत हे तरी कुठे आपल्याला माहीत असतं? प्रख्यात गायक भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगल यांना एकमेकांशी बोलताना ज्यांनी ऐकलं असेल, त्यांचं भाग्य मोठं. भीमसेनांचं वास्तव्य नंतरच्या काळात पुण्यात आणि गंगूबाईंचं कर्नाटकात, पण गंगूबाईंनी ‘भीमण्णा’ अशी हाक मारली की भीमसेन ज्या प्रेमानं त्यांच्याकडं धावत जायचे ते प्रेम ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट होती. कोण कुठं राहतं या बाबी कलेच्या आड कधी आल्या नाहीत आणि म्हणूनच मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व यांच्यासारख्या गायकांवर मराठी माणसानंही भरभरून प्रेम केलं व कन्नडभाषिकांनीही! प्राचार्य डॉ. व्ही. के. गोकाक हे प्रख्यात कन्नड साहित्यिक. ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक मिळालेला हा साहित्यिक काही काळ सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये आणि नंतर  कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाविद्यालयात प्राचार्य होता. या दोन्ही महाविद्यालयांत काम करताना त्यांनी तेथील शैक्षणिक दर्जा ज्या पद्धतीनं उंचावला त्यांची आपण केवळ ते कर्नाटकी म्हणून उपेक्षा करणं योग्य ठरेल का? डॉ. बाळकृष्ण यांचा महाराष्ट्राशी तसा काही संबंध नव्हता, पण त्यांनी इंग्रजी भाषेत पाच खंडांत शिवचरित्र लिहिलं. कै. अलूर व्यंकटराय यांनी टिळकांचं ‘गीतारहस्य’ कानडीत भाषांतरित केलं आहे. साने गुरुजींच्या कथा, रणजीत देसाईंच्या कथा असं खूप काही मराठी साहित्य कानडी साहित्य रसिकांपर्यंत गेलं आहे; तर भैरप्पा, शिवराम कारंथ, गिरीश कार्नाड, सुधा मूर्ती, वैदेही, डॉ. चंद्रशेखर कंबार अशा अनेक कन्नड साहित्यिकांच्या भाषांतरित साहित्यकृती मराठी वाचक आजही आवडीनं वाचतात.मराठी व कन्नड भाषेतील देवाणघेवाणीबाबत विचार करताना कै. डॉ. द. रा. बेंद्रे यांच्यापासून अगदी अलीकडच्या कै. पंडित आवळीकर, सौ. उमा कुलकर्णी अशा अनेकांचं स्मरण करावं लागतं. एकमेकांच्या भाषेचा द्वेष करून किंवा बेताल वक्तव्य करून सतत सीमाभाग धुमसत ठेवण्यात कोणतं शहाणपण आहे?- याबाबत कर्नाटकमधील राजकारण्यांना जितक्या लवकर सुबुद्धी मिळेल तितक्या लवकर महाराष्ट्रातून त्यांच्या वेडेपणाला अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर मिळणं थांबेल!

टॅग्स :marathiमराठीbelgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक