शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

या ठेकेदारांना कोण आवरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:53 AM

सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे असले प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही या घटना घडतात याचाच अर्थ कायद्याचे भय या धर्मांधांना वाटत नाही

गोंदिया जिल्ह्याच्या किन्ही गावातील एका तरुणाने आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. खरंतर आताशा अशा बातम्या वाचून कुणाचे मन सुन्न होत नाही किंवा त्या ऐकून कुणाचे कानही बधिर होताना दिसत नाही. कारण दर चार दिवसाआड अशा बातम्या वृत्तपत्रांतून वाचावयास मिळतातच. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे असले प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही या घटना घडतात याचाच अर्थ कायद्याचे भय या धर्मांधांना वाटत नाही अथवा या कायद्यांची तेवढ्याच कठोरतेने अंमलबजावणी होत नाही असा घेतला तर ते चुकीचे ठरणार नाही. किन्ही गावचे हे प्रकरण तसे जुने आहे. २०११ मध्ये मरार समाजाच्या या तरुणाने एका दलित तरुणीशी विवाह केला. पण गावातील मरार समाज समितीच्या ठेकेदारांना हे रुचले नाही. त्यांनी या तरुणाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्याच्याकडून दंडादाखल ६१ हजार रुपये उकळले. दंडाची रक्कम भरल्यामुळे मधला काळ शांततेत गेला. पण या जातीय ठेकेदारांची खुन्नस गेली नव्हती. गेल्यावर्षी या तरुणाची आजी मरण पावली. त्याचे वृत्त समाजाच्या ठेकेदारांपैकी एकाला दिले नाही एवढेसे निमित्त पुढे करून या तरुणावर पुन्हा दंड लादण्यात आला. केवढी ही मग्रुरी! घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्याने कुणाशी लग्न करावे. आपल्या कोैटुंबिक बाबी कुणाला सांगाव्यात हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. अशावेळी जाती-धर्मांचे हे तोतये संरक्षक गुंडगिरी करून दहशत निर्माण करीत असतील तर त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजे. खरं तर किन्हीसारख्या लहानशा गावात सामाजिक बहिष्कारासारखी घटना घडते आणि गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या तेथील पोलिसांना याची गंधवार्ता नव्हती असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. सात वर्षांनंतर तक्रार आली तेव्हा कुठे पोलिसांना जाग आली आणि त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. बरं या गावातले हे एकमेव प्रकरण नाही. याआधीही अनेक वेळा मरार समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बहिष्काराची धमकी देऊन काही जणांकडून दंड उकळल्याची माहिती आहे. दंडाच्या या रकमेचा कुठे हिशेबही नाही. हा खंडणीचाच प्रकार नव्हे का. आश्चर्य याचे वाटते की हे सर्व घडत असताना गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सदस्य मूग गिळून गप्प राहिले. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्याच्या पाठीशी ते का उभे राहिले नाहीत? खंडणीतला काही वाटा त्यांनाही तर मिळाला नाही ना? याची चौकशीही आता झाली पाहिजे.

टॅग्स :marriageलग्न