शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिका...भाजपविरोधात वापरायचे हत्यार म्हणून नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 02:26 IST

रक्तचाचणीचा अहवाल जसे व्यक्तीचे आरोग्य काय आहे हे नेमकेपणे सांगतो, तेच काम श्वेतपत्रिका करू शकते.

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची कल्पना यावी म्हणून श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे राज्यपालांच्या अभिभाषणात नव्या सरकारने जाहीर केले आहे. राज्याची आर्थिक स्थिती खरोखर कशी आहे? आर्थिक आरोग्य सुदृढ आहे की प्रकृती तोळामासा झाली आहे? नवी आव्हाने स्वीकारण्याची क्षमता महाराष्ट्राच्या तिजोरीत आहे की रोजचा घरखर्च चालविण्याइतकाच पैसा खात्यात आहे? महाराष्ट्रावरचे कर्ज फेडण्याची ताकद आहे का? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे श्वेतपत्रिकेतून मिळू शकतात.

रक्तचाचणीचा अहवाल जसे व्यक्तीचे आरोग्य काय आहे हे नेमकेपणे सांगतो, तेच काम श्वेतपत्रिका करू शकते. महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याचे स्पष्ट चित्र यातून जनतेसमोर आणि उद्योग क्षेत्रासमोर येईल. महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारनेही श्वेतपत्रिका काढावी, असा आग्रह उद्योगजगत व अर्थशास्त्रींकडून धरला जात आहे. देशासमोर गंभीर आर्थिक संकट आहे आणि परदेशातील घडामोडींमुळे आर्थिक आव्हाने वाढत जाणार आहेत; पण देशाची अर्थव्यवस्था कचाट्यात सापडली आहे हेच मान्य करण्यास मोदी सरकार तयार नाही.

देशात मंदी नाही; मात्र अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावली आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. अर्थशास्त्रीयदृष्ट्या सीतारामन यांच्या म्हणण्यात तथ्य असले, तरी विकासाची घसरण ही आर्थिक मंदीच्या दिशेने वेगाने होत आहे, ती घसरण सरकारला थांबविता आलेली नाही, हे वास्तव लपून राहत नाही. ती थांबविण्यासाठी काय करावे हे मोदी सरकारला सुचत नाही. मुळात अर्थव्यवस्थेबद्दल मोदी सरकारला स्वत:चा विचार नाही आणि त्या क्षेत्रातील बुद्धिमंतांचे साह्य घेण्याचे शहाणपण अजून तरी सुचलेले नाही. सुवर्णमय भूतकाळाचे कल्पित आळविणे यापलीकडे संघ परिवाराच्या अभ्यासाची मजल जात नसल्याने आणि विविध क्षेत्रांतील अभ्यासकांची फौज भाजपकडे नसल्याने नवा विचार सुचत नाही.

अन्य पक्षातील वा देशातील बुद्धिमंतांना एकत्रित आणून देशासाठी काही नवा मार्ग शोधण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत नाहीत. देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ करण्याचे काही चांगले प्रयत्न मोदी सरकारने केले व त्याचा फायदा देशाला नक्की होईल; मात्र सध्याची आव्हाने इतकी जटिल आहेत की डागडुजीचे प्रयत्न उपयोगाचे नाहीत, तर दिशादर्शक आर्थिक नकाशा मांडावा लागेल. तो मांडण्यासाठी श्वेतपत्रिका उपयोगी ठरू शकते, कारण त्यात देशाचे खरे आर्थिक चित्र उमटलेले असते. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हाच अशा श्वेतपत्रिकेची गरज होती. आर्थिक क्षेत्रातील अडचणींमुळे २०१० ते २०१४ च्या काळापेक्षा अर्थव्यवस्था कठीण स्थितीकडे जात आहे.

त्याचवेळी श्वेतपत्रिका काढली असती, तर वेळीच उपाययोजना करता आल्या असत्या आणि मोदी सरकारला आज जी टीका सहन करावी लागत आहे ती वेळ आली नसती; पण ‘मोदी है तो मुमकीन है’ या दुराभिमानापायी देशासमोर वास्तव चित्र मांडण्यात आले नाही. खरे चित्र मांडले, तर परदेशी गुंतवणूकदार देशात भांडवल गुंतविण्यास कचरतील, अशी धास्ती तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाटत होती आणि त्यामुळे श्वेतपत्रिकेला त्यांनी मंजुरी दिली नाही. आजही सरकारला तीच धास्ती वाटत असावी. श्वेतपत्रिका महत्त्वाची असली, तरी ती काढण्यामागचा उद्देश काय, हा कळीचा मुद्दा असतो. नवा मार्ग शोधण्यासाठी ती तयार केली जाते की आधीच्या सरकारवर दोषारोप ठेवून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी, हे महत्त्वाचे आहे. श्वेतपत्रिकेतील श्वेत हा शब्द महत्त्वाचा आहे.

पांढरा रंग हा नि:पक्षपातीपणाचा निदर्शक असतो. खरे तर आर्थिक पाहणी अहवाल हा श्वेतपत्रिकेसारखाच असणे जरुरीचे असते. अर्थसंकल्पावर राजकीय छाया असते, पण पाहणी अहवालावर ती नसावी ही अपेक्षा असते. तथापि, अलीकडे आर्थिक पाहणी अहवालात अपुरी आकडेवारी दिली जाते. महाराष्ट्रात तसे झाले आहे. यामुळे श्वेतपत्रिका आवश्यक ठरते; मात्र त्याचा उपयोग नवे मार्ग शोधण्यासाठी व्हावा, भाजपविरोधात वापरायचे हत्यार म्हणून नव्हे!

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपा