शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शेतक-यांना मारण्याचा हा अमानुष खेळ कधी थांबणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:00 AM

यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत. त्याशिवाय शेतक-यांना मारण्याचा हा अमानुष खेळ थांबणार नाही. पण या कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्या कृषी केंद्रांना असलेल्या राजकीय संरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची कठोरपणे अंमजबजावणी होईल की नाही, अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात आहे. कीटकनाशक फवारणीतून मरण पावलेल्या शेतक-यांच्या मृत्यूला अपघात म्हणता येणार नाही. हा सदोष मनुष्यवध आहे. अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून या कीटकनाशक कंपन्या आणि कृषी केंद्रांच्या मालकांनी शेतकºयांच्या ताटात तर विष कालवले आहे. हा क्रूर खेळ सुरू असताना सरकारी यंत्रणा गप्प होती. शेतकºयांच्या मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्यानंतरही प्रशासन निगरगट्ट होते. प्रशासनाची भूमिका सुरुवातीपासूनच कंपन्या आणि कृषी केंद्र मालकांना वाचविण्याची होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यवतमाळचा दौरा केल्यानंतर कृषी खात्यातील १५ अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. यात चीड आणणारी गोष्ट अशी की, यातील फक्त एकाच अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची तसदीही प्रशासनाने अद्याप घेतली नाही. कीटकनाशक कंपन्या आणि विक्रेत्यांची एक मोठी साखळी या जिल्ह्यात कार्यरत आहे. या जिल्ह्यातील काही राजकारण्यांना तीे नियमित पोसत असते. पाटणबोरी, पांढरकवडा या भागात अवैध कीटकनाशकांचे गोडाऊन्स आहेत. लगतच्या तेलंगणातील अदिलाबाद येथून बनावट कीटकनाशकांची तस्करी नियमितपणे या भागात होते. पण, पोलिसांना आणि कृषी खात्याला याचा थांगपत्ताही लागत नाही. यवतमाळ जिल्ह्यात झालेले एवढे मृत्यू हे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे ढळढळीत अपयश आहे. त्याबद्दलचे प्रायश्चित्त कोण घेणार? आपल्या कठोर निर्देशांची तेवढ्याच तत्परतेने अंमलबजावणी होते की नाही, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा त्यांची ही घोषणा फसवी ठरेल. कीटकनाशक कंपन्या राजकीय अर्थकारणात नेहमीच प्रभावी ठरत असतात. कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेत असो, त्यांचे कुणीच काहीही बिघडवू शकत नाही. शेतक-यांचे अनेक नेते त्यांच्यासमोर नांगी टाकतात किंवा त्यांचे भागीदार होतात. त्यामुळे फडणवीसांच्या या कठोर निर्णयाबद्दल जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण, बळीराजाचे कल्याण करावयाचे असेल तर मुख्यमंत्र्यांना या बदमाशांच्या मुसक्या आवळाव्याच लागतील.

टॅग्स :Farmerशेतकरी