शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानाचा वॉटर कप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:48 IST

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे.

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मी गावाचे काही तरी देणं लागतो, या जबाबदारीची जाणीव झाली आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनीही हे काम राज्याच्या जलसमृद्धीसाठी हाती घेतले असून, २०१९ अखेरपर्यंत राज्य दुष्काळमुक्तीचा संकल्प ठेवला आहे. यावर्षी २२ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकचतुर्थांश गावे या अभियानामध्ये सहभागी झाली आहेत. दुष्काळमुक्तीसाठी मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारण आवश्यक असल्याची जाण ठेवत गावांचा आराखडा तयार करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी श्रमदानातून जलसंधारण, अशी ही चळवळ आहे. दिनांक ८ एप्रिलच्या मध्यरात्री अनेक गावांमध्ये कामाचा प्रांरभ झाला. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, या शिदोरीवर सध्या राज्यात स्वावलंबी आणि एकसंध जल चळवळ पहायला मिळत आहे. उत्सव, महापुरुषांच्या जयंती, लहान-थोरांचे वाढदिवसही श्रमदानस्थळीच साजरे होत आहेत. बुलडाण्यातील एका युवकाने तर त्याचे लग्न आटोपल्याबरोबर नवविवाहितेसोबत श्रमदान करून लग्नास संस्मरणीय केले. असे अनेक अभिनव उपक्रम या स्पर्धेत दृष्टीस पडतात. या सर्व उपक्रमांमधून स्पर्धेच्याप्रती लोकांची आत्मीयता वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज साधारणत: ४० लीटर पाणी लागते. प्रत्येकाचे सरासरी आयुर्मान ६० वर्ष गृहित धरल्यास, एका व्यक्तीस तिच्या आयुष्यात किती पाणी लागणार आहे, याची जाण प्रत्येक ग्रामस्थास करून दिली जात आहे. आयुष्यभरात जेवढं पाणी आपण वापरणार आहोत, किमान तेवढं साठवू शकेल, जमिनीत झिरपू शकेल, अशी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत की नाही, या प्रश्नांनी अस्वस्थ झालेली गावे सध्या जलक्रांतीच्या दिशेने निघाली आहेत. जलयुक्त शिवार अन् वॉटर कप या दोन अभियानामुळे सध्या जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अशा प्रयोगांमधून मिळणारा फायदा तत्काळ दिसत नाही; मात्र जलसंधारणाची ही गुंतवणूक निश्चितपणे नव्या जलक्रांतीचे बीजारोपण करणारी ठरणार आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र