शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानाचा वॉटर कप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:48 IST

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे.

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मी गावाचे काही तरी देणं लागतो, या जबाबदारीची जाणीव झाली आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनीही हे काम राज्याच्या जलसमृद्धीसाठी हाती घेतले असून, २०१९ अखेरपर्यंत राज्य दुष्काळमुक्तीचा संकल्प ठेवला आहे. यावर्षी २२ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकचतुर्थांश गावे या अभियानामध्ये सहभागी झाली आहेत. दुष्काळमुक्तीसाठी मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारण आवश्यक असल्याची जाण ठेवत गावांचा आराखडा तयार करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी श्रमदानातून जलसंधारण, अशी ही चळवळ आहे. दिनांक ८ एप्रिलच्या मध्यरात्री अनेक गावांमध्ये कामाचा प्रांरभ झाला. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, या शिदोरीवर सध्या राज्यात स्वावलंबी आणि एकसंध जल चळवळ पहायला मिळत आहे. उत्सव, महापुरुषांच्या जयंती, लहान-थोरांचे वाढदिवसही श्रमदानस्थळीच साजरे होत आहेत. बुलडाण्यातील एका युवकाने तर त्याचे लग्न आटोपल्याबरोबर नवविवाहितेसोबत श्रमदान करून लग्नास संस्मरणीय केले. असे अनेक अभिनव उपक्रम या स्पर्धेत दृष्टीस पडतात. या सर्व उपक्रमांमधून स्पर्धेच्याप्रती लोकांची आत्मीयता वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज साधारणत: ४० लीटर पाणी लागते. प्रत्येकाचे सरासरी आयुर्मान ६० वर्ष गृहित धरल्यास, एका व्यक्तीस तिच्या आयुष्यात किती पाणी लागणार आहे, याची जाण प्रत्येक ग्रामस्थास करून दिली जात आहे. आयुष्यभरात जेवढं पाणी आपण वापरणार आहोत, किमान तेवढं साठवू शकेल, जमिनीत झिरपू शकेल, अशी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत की नाही, या प्रश्नांनी अस्वस्थ झालेली गावे सध्या जलक्रांतीच्या दिशेने निघाली आहेत. जलयुक्त शिवार अन् वॉटर कप या दोन अभियानामुळे सध्या जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अशा प्रयोगांमधून मिळणारा फायदा तत्काळ दिसत नाही; मात्र जलसंधारणाची ही गुंतवणूक निश्चितपणे नव्या जलक्रांतीचे बीजारोपण करणारी ठरणार आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र