शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

By यदू जोशी | Published: May 16, 2022 1:03 PM

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं.

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस खरेच राममंदिर आंदोलनाच्या वेळी अयोध्येला गेले होते की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तेव्हा तुमचं वय किती होतं?, ती काय शाळेची सहल होती का?, या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले. फडणवीस राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शाळकरी होते, असा तर्क एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांची खिल्ली उडविली होती. १९९२ मध्ये बाबरी पडली तेव्हा फडणवीस केवळ तेरा वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस खरेच अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांच्यावर तेरा वर्षांच्या बालकाला अयोध्येस नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती. 

आता प्रश्न निर्माण झाला आहे तो हा की, फडणवीस खरेच अयोध्येला आंदोलनासाठी गेले होते का? उत्तर आहे होय! फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते  २० वर्षांचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. सर्वात आधी ते ऑक्टोबर १९९० रोजी गेले होते पण प्रत्यक्ष अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते, मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला (आजचे प्रयागराज) गेले. तेथील सीताराम मंदिरात ते पाच दिवस राहिले. नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात अयोध्येकडे निघालेल्या शेकडो कारसेवकांसोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते १७ दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी असलेले संजय बंगाले, उदय डबली, शशि शुक्ला या मित्रांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी तिथे मुलायमसिंह यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र, बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले राममंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण अ‍ॅड.उदय डबले यांनी सांगितली. 

६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याजवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाचाजवळ घोषणा देत पुढेपुढे सरकत होतो, असे फडणवीस यांचे मित्र आणि आता नागपुरात नगरसेवक असलेले संजय बंगाले यांनी सांगितले. '२ डिसेंबरलाच आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो आणि आमचा नागपूरचा मित्र  महेश रामडोवकर याचे नातेवाईक पुजारी असलेल्या काळा राम मंदिरात मुक्कामी होतो. ६ डिसेंबरला सकाळपासूनच अयोध्येतील वास्तूसमोर जाहीर सभा सुरू झाली होती. त्या ठिकाणी आम्ही होतो', असे फडणवीस यांचे बालमित्र हर्षल आर्विकर यांनी सांगितले. 

आधी फडणवीस पोहोचले अन् नंतर पोहोचले पत्र

तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईस पत्र पाठविले आणि जेलमध्ये आहे, पण जिवाला काही धोका नाही असे कळविले. आश्चर्याची बाब म्हणजे बदायूच्या जेलमधून सुटका होऊन फडणवीस ज्या दिवशी नागपूरला घरी परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र त्यांच्या घरी आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा