शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

By रवी ताले | Published: January 30, 2018 12:20 AM

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी तर अवघड आहेच; पण तो सर करताना भाजपाचाही चांगलाच घाम निघणार आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेससाठी मात्र पुनरागमनाची ही उत्तम संधी असणार आहे.

कुणाच्या डोळ्याची पापणी प्रथम लवते, असा एक खेळ लहान मुले खेळत असतात. गत विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान तोच खेळ सुरू होता. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. युतीचा पोपट कधीच मेला होता. ती बातमी कोण फोडणार, एवढाच काय तो प्रश्न होता! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित करून, त्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकले आहे.राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात वळवळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले असले तरी, त्या उत्तराने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. भाजपा आणि शिवसेनेने १९८९ पासून महाराष्ट्रात युती करूनच प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. अपवाद फक्त २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचा! त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवायची म्हटल्यास, १९८९ पासून ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलीच नाही, त्या मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध घेण्यापासून, मतदारसंघाची बांधणी करण्यापर्यंतचे आव्हान, उभय पक्षांना पेलावे लागणार आहे.विदर्भापुरता विचार करायचा झाल्यास, शिवसेनेसाठी हे आव्हान तुलनात्मकरीत्या अधिक अवघड असणार आहे. त्यातही पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील वाटचाल सेनेसाठी अधिकच खडतर सिद्ध होणार आहे. लोकसभेचा रामटेक व विधानसभेचा वरोरा मतदारसंघ वगळता, सेनेचा पूर्व विदर्भात कुठेही दबदबा नाही. लोकसभेचा विचार केल्यास, पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ हे तीन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत आणि तिन्ही मतदारसंघांमध्ये सेनेचा बºयापैकी वरचष्माही आहे. पूर्व विदर्भात मात्र रामटेक वगळता सेनेला कधीच यश लाभले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १९८९ पासून २०१४ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सेनेला भाजपाची साथ होती. आता स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविताना, ताब्यातील मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणे, सेनेसाठी सोपे असणार नाही.सेनेच्या तुलनेत भाजपासाठी विदर्भ सोपा असला तरी, एकाच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व सेनेला अंगावर घ्यायचे असल्याने, भाजपालाही चांगलाच घाम गाळावा लागेल, हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत सेना भाजपाच्या साथीला होती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. आगामी निवडणुकीत भाजपा व सेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतील, तर काँग्रेस व राकाँची आघाडी कायम असेल. भरीस भर म्हणून भाजपाच्या काही आमदार-खासदारांचाच पक्षाविषयी भ्रमनिरास होऊ लागला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गटबाजीही मोठ्या प्रमाणात उफाळली आहे. वरून विदर्भवाद्यांची नाराजी आहेच!  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक