शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 18:28 IST

मुंबईत हजारोंचा मोर्चा काढणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या कार्यक्रमात शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी भाषण आटोपलं आणि व्यासपीठ सोडलं.

-सुधीर महाजनखचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या औरंगाबादमधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या उत्साहावर पाणी ओतले. राज ठाकरे औरंगाबादेत चार दिवसांच्या दौऱ्यावर आले होते; पण त्यांनी दोन दिवसांतच तो आवरता घेतला आणि आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.

काल कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चेनंतर आज मेळावा आयोजित केला होता आणि १५/२० हजारांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होता; पण दीड दोनशे लोकांची उपस्थिती पाहून राज ठाकरे निघून गेले. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा जागर करीत मैदानात उतरले आहेत. रा. स्व. संघ, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाने व्यापलेल्या या मैदानात तशी राज यांच्यासाठी फारशी जागा नाही, तरी अंग चोरत त्यांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेनेकडून रिकामी होणारी जागा अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगतीने संसार मांडलेल्या सेनेचे हिंदुत्व पातळ झाले असा हिंदुत्ववाद्यांबरोबर राज यांचाही समज झालेला दिसतो, म्हणून आज आपला झेंडा बदलून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष करीत ते इकडे वळले, ते भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी.
या पार्श्वभूमीवर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी औरंगाबाद निवडले, कारण येथे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. गेल्या ३० वर्षांपासून सेनेचे वर्चस्व या शहरावर आहे; परंतु नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली असून, ती हिंदुत्वाला पर्याय म्हणून भाजपला जवळ करील असे गणित मांडले जाते आणि याच समीकरणाच्या आधारावर सेनेच्या विरोधात भाजपचा हात धरून राज यांच्या मनसेला येथे उतरायचे आहे. यासाठी औरंगाबाद त्यांना ‘फर्टाईल ग्राऊंड’ दिसते. शिवसेनेविरुद्धच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या हिंदुत्वाचे पीक येथे बहरू शकते, असा त्यांचा होरा दिसतो. म्हणूनच त्यांचा चार दिवसांच्या भरगच्च दौऱ्याचा कार्यक्रम घेऊन ते औरंगाबादेत डेरेदाखल झाले; पण कसाबसा दोन दिवस दम धरून मुंबईला परतले. दौरा आकसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
या दोन दिवसांच्या दौºयाने काय साधले याचाही हिशेब मांडला पाहिजेच. राज यांचे स्वागत उत्साहात झाले. गर्दी जमली, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांशी चर्चा, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता; पण तो पाऊणतासातच गुंडाळला गेला. पत्रकारांशी झालेल्या संवादातही मनसेच्या ठोस कार्यक्रमाचा आणि धोरणाचा उलगडा झाला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नारांजांचा ओघ मनसेकडे येईल हा त्यांचा अंदाजही सपशेल कोसळला. सेनेच्या एकाही दिग्गजाला ते आपल्या तंबूत आणू शकले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुक्कामस्थळी फारशी गर्दीही नव्हती. एकूणच इथले वातावरण त्यांना रुजणारे, मानवणारे नव्हते. जाताना त्यांनी ‘औरंगाबाद-संभाजीनगर या शिळ्या कढीलाच ऊत आणला. आता हे इतके गुळगुळीत झाले की, हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या गळाला तीन कार्यकर्ते लागले. त्यात शिवसेनेचे एकेकाळचे शहर प्रमुख सुहास दाशरथे हे एकच नाव महत्त्वाचे दिसते. दुसरे प्रकाश महाजन आणि तिसरे हर्षवर्धन जाधव. जे की, मनसेचे पहिले आमदार होते. पुढे ते शिवसेनेत गेले. सेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. लोकसभा आणि विधानसभेत पराभूत होत पुन्हा मनसेच्या वाटेवर आले. पक्ष संघटना बांधण्यासाठी यापैकी दाशरथेंचीच उपयुक्तता दिसते. एक तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील आणि संघटनेचा आधार असलेले ते कार्यकर्ते आहेत. सेनेतून इकडे नव्या पक्षात तेच काय कार्यकर्त्यांना वळवू शकतात. प्रकाश महाजनांकडे ते कौशल्य नाही आणि हर्षवर्धन यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. अशा तोकड्या फौजफाट्यावर राज ठाकरेंचा येथे शिवसेनेला शह देण्याचा इरादा आहे. शहरात, जिल्ह्यात पक्ष संघटना नाही, कार्यकर्ते नाहीत आणि आश्रयदाताही नाही, अशी परिस्थिती आहे.
राज ठाकरे चार दिवस थांबतील, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, इकडे येण्याचा विचार करणाºयांना आशादायक वातावरणाचा दिलासा देतील, असा अनेकांचा होरा होता; पण ते दोन दिवसातच निघून गेल्यामुळे ‘मनसे’चे वातावरणच तयार झाले नाही. सेनेच्या कारभाराला नागरिक कंटाळले असा एक शिवसेनाविरोधी सूर भाजप व तत्सम पक्षांकडून आळवला जातो. तसे सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी गजानन बारवाल यांच्यासारखी सेनेतून भाजपमध्ये गेलेली मंडळी परतीच्या वाटेवर आहेत. त्यात किशनचंद तनवानींचेही नाव घेतले जाते. शहराची नाडी ओळखणारे हे राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या हालचाली वेगळेच काही दर्शवितात. अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा समाज परिवर्तनाचा असतो. या कीर्तनाला अलोट गर्दी उलटते, म्हणजे समाज परिवर्तन झाले असे जसे म्हणता येणार नाही, तद्वतच राज ठाकरेंचे आहे. त्यांच्या भाषणात गर्दी खेचण्याची ताकद आहे; पण ‘मनसे’ बाळसे धरत नाही, म्हणूनच संघ, भाजप, शिवसेनेच्या ‘हिंदुत्वाचा चौथा कोन’ मनसे कशी बनणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाHindutvaहिंदुत्व