शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 18:28 IST

मुंबईत हजारोंचा मोर्चा काढणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या कार्यक्रमात शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी भाषण आटोपलं आणि व्यासपीठ सोडलं.

-सुधीर महाजनखचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या औरंगाबादमधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या उत्साहावर पाणी ओतले. राज ठाकरे औरंगाबादेत चार दिवसांच्या दौऱ्यावर आले होते; पण त्यांनी दोन दिवसांतच तो आवरता घेतला आणि आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.

काल कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चेनंतर आज मेळावा आयोजित केला होता आणि १५/२० हजारांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होता; पण दीड दोनशे लोकांची उपस्थिती पाहून राज ठाकरे निघून गेले. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा जागर करीत मैदानात उतरले आहेत. रा. स्व. संघ, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाने व्यापलेल्या या मैदानात तशी राज यांच्यासाठी फारशी जागा नाही, तरी अंग चोरत त्यांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेनेकडून रिकामी होणारी जागा अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगतीने संसार मांडलेल्या सेनेचे हिंदुत्व पातळ झाले असा हिंदुत्ववाद्यांबरोबर राज यांचाही समज झालेला दिसतो, म्हणून आज आपला झेंडा बदलून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष करीत ते इकडे वळले, ते भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी.
या पार्श्वभूमीवर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी औरंगाबाद निवडले, कारण येथे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. गेल्या ३० वर्षांपासून सेनेचे वर्चस्व या शहरावर आहे; परंतु नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली असून, ती हिंदुत्वाला पर्याय म्हणून भाजपला जवळ करील असे गणित मांडले जाते आणि याच समीकरणाच्या आधारावर सेनेच्या विरोधात भाजपचा हात धरून राज यांच्या मनसेला येथे उतरायचे आहे. यासाठी औरंगाबाद त्यांना ‘फर्टाईल ग्राऊंड’ दिसते. शिवसेनेविरुद्धच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या हिंदुत्वाचे पीक येथे बहरू शकते, असा त्यांचा होरा दिसतो. म्हणूनच त्यांचा चार दिवसांच्या भरगच्च दौऱ्याचा कार्यक्रम घेऊन ते औरंगाबादेत डेरेदाखल झाले; पण कसाबसा दोन दिवस दम धरून मुंबईला परतले. दौरा आकसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
या दोन दिवसांच्या दौºयाने काय साधले याचाही हिशेब मांडला पाहिजेच. राज यांचे स्वागत उत्साहात झाले. गर्दी जमली, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांशी चर्चा, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता; पण तो पाऊणतासातच गुंडाळला गेला. पत्रकारांशी झालेल्या संवादातही मनसेच्या ठोस कार्यक्रमाचा आणि धोरणाचा उलगडा झाला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नारांजांचा ओघ मनसेकडे येईल हा त्यांचा अंदाजही सपशेल कोसळला. सेनेच्या एकाही दिग्गजाला ते आपल्या तंबूत आणू शकले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुक्कामस्थळी फारशी गर्दीही नव्हती. एकूणच इथले वातावरण त्यांना रुजणारे, मानवणारे नव्हते. जाताना त्यांनी ‘औरंगाबाद-संभाजीनगर या शिळ्या कढीलाच ऊत आणला. आता हे इतके गुळगुळीत झाले की, हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या गळाला तीन कार्यकर्ते लागले. त्यात शिवसेनेचे एकेकाळचे शहर प्रमुख सुहास दाशरथे हे एकच नाव महत्त्वाचे दिसते. दुसरे प्रकाश महाजन आणि तिसरे हर्षवर्धन जाधव. जे की, मनसेचे पहिले आमदार होते. पुढे ते शिवसेनेत गेले. सेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. लोकसभा आणि विधानसभेत पराभूत होत पुन्हा मनसेच्या वाटेवर आले. पक्ष संघटना बांधण्यासाठी यापैकी दाशरथेंचीच उपयुक्तता दिसते. एक तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील आणि संघटनेचा आधार असलेले ते कार्यकर्ते आहेत. सेनेतून इकडे नव्या पक्षात तेच काय कार्यकर्त्यांना वळवू शकतात. प्रकाश महाजनांकडे ते कौशल्य नाही आणि हर्षवर्धन यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. अशा तोकड्या फौजफाट्यावर राज ठाकरेंचा येथे शिवसेनेला शह देण्याचा इरादा आहे. शहरात, जिल्ह्यात पक्ष संघटना नाही, कार्यकर्ते नाहीत आणि आश्रयदाताही नाही, अशी परिस्थिती आहे.
राज ठाकरे चार दिवस थांबतील, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, इकडे येण्याचा विचार करणाºयांना आशादायक वातावरणाचा दिलासा देतील, असा अनेकांचा होरा होता; पण ते दोन दिवसातच निघून गेल्यामुळे ‘मनसे’चे वातावरणच तयार झाले नाही. सेनेच्या कारभाराला नागरिक कंटाळले असा एक शिवसेनाविरोधी सूर भाजप व तत्सम पक्षांकडून आळवला जातो. तसे सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी गजानन बारवाल यांच्यासारखी सेनेतून भाजपमध्ये गेलेली मंडळी परतीच्या वाटेवर आहेत. त्यात किशनचंद तनवानींचेही नाव घेतले जाते. शहराची नाडी ओळखणारे हे राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या हालचाली वेगळेच काही दर्शवितात. अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा समाज परिवर्तनाचा असतो. या कीर्तनाला अलोट गर्दी उलटते, म्हणजे समाज परिवर्तन झाले असे जसे म्हणता येणार नाही, तद्वतच राज ठाकरेंचे आहे. त्यांच्या भाषणात गर्दी खेचण्याची ताकद आहे; पण ‘मनसे’ बाळसे धरत नाही, म्हणूनच संघ, भाजप, शिवसेनेच्या ‘हिंदुत्वाचा चौथा कोन’ मनसे कशी बनणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाHindutvaहिंदुत्व