शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 18:28 IST

मुंबईत हजारोंचा मोर्चा काढणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या कार्यक्रमात शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी भाषण आटोपलं आणि व्यासपीठ सोडलं.

-सुधीर महाजनखचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या औरंगाबादमधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या उत्साहावर पाणी ओतले. राज ठाकरे औरंगाबादेत चार दिवसांच्या दौऱ्यावर आले होते; पण त्यांनी दोन दिवसांतच तो आवरता घेतला आणि आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.

काल कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चेनंतर आज मेळावा आयोजित केला होता आणि १५/२० हजारांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होता; पण दीड दोनशे लोकांची उपस्थिती पाहून राज ठाकरे निघून गेले. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा जागर करीत मैदानात उतरले आहेत. रा. स्व. संघ, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाने व्यापलेल्या या मैदानात तशी राज यांच्यासाठी फारशी जागा नाही, तरी अंग चोरत त्यांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेनेकडून रिकामी होणारी जागा अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगतीने संसार मांडलेल्या सेनेचे हिंदुत्व पातळ झाले असा हिंदुत्ववाद्यांबरोबर राज यांचाही समज झालेला दिसतो, म्हणून आज आपला झेंडा बदलून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष करीत ते इकडे वळले, ते भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी.
या पार्श्वभूमीवर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी औरंगाबाद निवडले, कारण येथे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. गेल्या ३० वर्षांपासून सेनेचे वर्चस्व या शहरावर आहे; परंतु नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली असून, ती हिंदुत्वाला पर्याय म्हणून भाजपला जवळ करील असे गणित मांडले जाते आणि याच समीकरणाच्या आधारावर सेनेच्या विरोधात भाजपचा हात धरून राज यांच्या मनसेला येथे उतरायचे आहे. यासाठी औरंगाबाद त्यांना ‘फर्टाईल ग्राऊंड’ दिसते. शिवसेनेविरुद्धच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या हिंदुत्वाचे पीक येथे बहरू शकते, असा त्यांचा होरा दिसतो. म्हणूनच त्यांचा चार दिवसांच्या भरगच्च दौऱ्याचा कार्यक्रम घेऊन ते औरंगाबादेत डेरेदाखल झाले; पण कसाबसा दोन दिवस दम धरून मुंबईला परतले. दौरा आकसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
या दोन दिवसांच्या दौºयाने काय साधले याचाही हिशेब मांडला पाहिजेच. राज यांचे स्वागत उत्साहात झाले. गर्दी जमली, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांशी चर्चा, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता; पण तो पाऊणतासातच गुंडाळला गेला. पत्रकारांशी झालेल्या संवादातही मनसेच्या ठोस कार्यक्रमाचा आणि धोरणाचा उलगडा झाला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नारांजांचा ओघ मनसेकडे येईल हा त्यांचा अंदाजही सपशेल कोसळला. सेनेच्या एकाही दिग्गजाला ते आपल्या तंबूत आणू शकले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुक्कामस्थळी फारशी गर्दीही नव्हती. एकूणच इथले वातावरण त्यांना रुजणारे, मानवणारे नव्हते. जाताना त्यांनी ‘औरंगाबाद-संभाजीनगर या शिळ्या कढीलाच ऊत आणला. आता हे इतके गुळगुळीत झाले की, हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या गळाला तीन कार्यकर्ते लागले. त्यात शिवसेनेचे एकेकाळचे शहर प्रमुख सुहास दाशरथे हे एकच नाव महत्त्वाचे दिसते. दुसरे प्रकाश महाजन आणि तिसरे हर्षवर्धन जाधव. जे की, मनसेचे पहिले आमदार होते. पुढे ते शिवसेनेत गेले. सेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. लोकसभा आणि विधानसभेत पराभूत होत पुन्हा मनसेच्या वाटेवर आले. पक्ष संघटना बांधण्यासाठी यापैकी दाशरथेंचीच उपयुक्तता दिसते. एक तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील आणि संघटनेचा आधार असलेले ते कार्यकर्ते आहेत. सेनेतून इकडे नव्या पक्षात तेच काय कार्यकर्त्यांना वळवू शकतात. प्रकाश महाजनांकडे ते कौशल्य नाही आणि हर्षवर्धन यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. अशा तोकड्या फौजफाट्यावर राज ठाकरेंचा येथे शिवसेनेला शह देण्याचा इरादा आहे. शहरात, जिल्ह्यात पक्ष संघटना नाही, कार्यकर्ते नाहीत आणि आश्रयदाताही नाही, अशी परिस्थिती आहे.
राज ठाकरे चार दिवस थांबतील, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, इकडे येण्याचा विचार करणाºयांना आशादायक वातावरणाचा दिलासा देतील, असा अनेकांचा होरा होता; पण ते दोन दिवसातच निघून गेल्यामुळे ‘मनसे’चे वातावरणच तयार झाले नाही. सेनेच्या कारभाराला नागरिक कंटाळले असा एक शिवसेनाविरोधी सूर भाजप व तत्सम पक्षांकडून आळवला जातो. तसे सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी गजानन बारवाल यांच्यासारखी सेनेतून भाजपमध्ये गेलेली मंडळी परतीच्या वाटेवर आहेत. त्यात किशनचंद तनवानींचेही नाव घेतले जाते. शहराची नाडी ओळखणारे हे राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या हालचाली वेगळेच काही दर्शवितात. अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा समाज परिवर्तनाचा असतो. या कीर्तनाला अलोट गर्दी उलटते, म्हणजे समाज परिवर्तन झाले असे जसे म्हणता येणार नाही, तद्वतच राज ठाकरेंचे आहे. त्यांच्या भाषणात गर्दी खेचण्याची ताकद आहे; पण ‘मनसे’ बाळसे धरत नाही, म्हणूनच संघ, भाजप, शिवसेनेच्या ‘हिंदुत्वाचा चौथा कोन’ मनसे कशी बनणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाHindutvaहिंदुत्व