शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

गडकरींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 3:23 AM

येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे.

नितीन गडकरी यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत असतो. त्यामुळे ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार नसाल तर जनता तुम्हाला फटके लगावेल’ हे गडकरींचे विधान प्रत्यक्षात संघाचे आहे आणि ते मोदी आणि त्यांच्या सरकारला ऐकविले आहे, हे उघड आहे. नितीन गडकरी हे तसेही स्वतंत्र भूमिका घेण्यात आणि मोदींपासून शक्यतोवर दूर राहण्यात पटाईत आहेत. मोदीही त्यांना फारसे जवळ करताना गेल्या चार वर्षांत कधी दिसले नाहीत. पर्रीकर गोव्यात गेले, जेटली अमेरिकेला गेले, सुरेश प्रभूंचे खाते काढून घेतले अशा वेळी मोदी नितीन गडकरी यांना एखादे वरिष्ठ पद देऊन मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत आणतील, असा कयास अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात मोदींनी त्यांना दिल्लीपासून दूर अंतरावर सडका बांधत ठेवले.वास्तव हे की भाजपाच्या राजकारणात नितीन गडकरी मोदींना ज्येष्ठ आहेत. अडवाणींच्या पश्चात संघाने त्यांनाच भाजपाचे अध्यक्षपद दिले आहे. ते अध्यक्ष असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि अमित शाह हे त्या राज्याचे गृहराज्यमंत्री होते. ही एकच बाब गडकरींचा भाजपामधील अधिकार व उंची सांगणारी आहे. मात्र मोदींनी त्यांना तसा मान कधी दिला नाही. गडकरी यांनीही ते कधी मनावर घेतले नाही आणि आपले मनोगत धाडसाने ऐकविण्याचे कामही कधी थांबविले नाही. बाकीचे सारे मंत्री मोदींसमोर माना खाली घालून कारकुनासारखे उभे असताना गडकरी मात्र स्वतंत्र दिमाखात वावरताना सदैव दिसले.येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा व भाजपाच्या साºया पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. त्यातून १९ आणि २० फेब्रुवारीला नागपूर या गडकरींच्या मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हायचे आहे. त्यामुळे तर यजमानाचे हे खडेबोल मोदी व त्यांच्या भक्तांना घायाळ करणारे आहेत. अनेक भाजपा नेत्यांच्याही कपाळाला यामुळे आठ्या पडल्या आहेत. सत्तेवर येण्याआधी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे मोदींचे आश्वासन आता ते स्वत:च विसरले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे त्यांचे आश्वासन त्यांचा पक्षही विसरला आहे. महागाई कमी करणे, शेतमालाला दर्जेदार भाव देणे आणि देशाची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत ठेवणे ही आश्वासनेही कधीचीच हवेत विरली आहेत.‘तेव्हा कदाचित आम्ही निवडून येणार नाही असे वाटल्याने आमच्या पक्षाने व नेत्याने ही आश्वासने दिली असतील. मात्र लोक ती अद्याप विसरले नाहीत. सबब, येत्या निवडणुकीत लोक त्यांना त्याविषयीचा जाब मागणार आहेत’ हे गडकरी यांनी मोदींसकट साºया भाजपावाल्यांना खणखणीतपणे सुनावले आहे. जी गोष्ट सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी देशाला ऐकवायची ती मोदींचे एक ज्येष्ठ सहकारी अशी ऐकवत असतील तर ती त्या पक्षातील खदखद व असंतोष दर्शविणारी बाब आहे. नितीन गडकरी बिनधास्त बोलतात म्हणून त्यांचे बोलणे सहजासहजी उडवून लावता येण्याजोगे नाही. गडकरी ही संघाची देशाच्या नेतृत्वासाठी असलेली पहिली निवड आहे. याउलट मोदी हा संघाचा नाइलाज आहे, हा इतिहास ताजा आणि न विसरता येणारा आहे. त्यामुळे गडकरींचे वक्तव्य हे त्यांचे एकट्याचे मत म्हणून पाहता येत नाही. ते संघाचे, संघाच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्यांचे आणि झालेच तर पक्षातील वयस्क वरिष्ठांचे मत म्हणूनही पाहिले पाहिजे. केवळ ते बोलण्याची गडकरींची तयारी असल्याने ते बोलले इतकेच.अर्थात गडकरींच्या या टीकेमुळे मोदी त्यांची वाटचाल बदलतील किंवा अमित शाह यांचा उन्माद ओसरेल अशी भाबडी आशा कुणी बाळगण्याचे कारण नाही. त्यांचे ते उपजत स्वभाव आहेत. ते बदलू शकत नाहीत. आपल्या विरोधकांबाबत ज्या अशिष्ट पातळीवर मोदी बोलतात आणि शाह हे तर आपल्या मित्रपक्षांनाच ‘पटकण्याची’ भाषा ऐकवतात, ते पाहिले की मग त्यांची खरी ओळख त्यांच्या बैठकीसकट लक्षात येते. पाच राज्यांत जनतेने धूळ चारल्यानंतरही ज्यांचे मेंदू ठिकाणावर येत नाहीत त्यांना गडकरी वळणावर आणतील, अशी अपेक्षा त्याचमुळे बाळगण्याचे कारण नाही. मात्र मोदी सरकारने ही अपेक्षा पूर्ण केली नाही एवढ्यासाठी जनता त्यांची खोटी आश्वासने विसरून जाईल वा खपवून घेईल, असे आपणही समजण्याचे कारण नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ