शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

पाकिस्तानात जाण्याच्या स्वप्नापोटी चेंगराचेंगरीत आलेल्या मरणाची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 8:23 AM

त्या अफवेवर भरवसा ठेवून नांगरहार प्रांतासह जवळपासचे तीन हजार लोक जलालाबादला पोहोचले. साधारण सात महिने कोरोनामुळे पाकिस्तान दूतावास बंद होता. कुणालाही व्हिसा दिला जात नव्हता. त्यामुळे दूतावास कार्यालय उघडल्याबरोबर व्हिसासाठी माणसांची झुंबड उडाली.

पाकिस्तानला जायचं हे कुणाचं स्वप्न  असू शकतं का? बुधवारी रात्री अफगाणिस्तानच्या भयानक गारठ्यात तीन हजार माणसं हे स्वप्न  घेऊन जलालाबादला पोहोचले. तिथं मोठं फुटबॉल स्टेडियम आहे. त्याच्या जवळच पाकिस्तानी दूतावास आहे. नेमकी त्याच दिवशी अफवा पसरली होती की पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात (म्हणजे नेहमीपेक्षा जास्त) व्हिसा देण्यात येणार आहेत.

त्या अफवेवर भरवसा ठेवून नांगरहार प्रांतासह जवळपासचे तीन हजार लोक जलालाबादला पोहोचले. साधारण सात महिने कोरोनामुळे पाकिस्तान दूतावास बंद होता. कुणालाही व्हिसा दिला जात नव्हता. त्यामुळे दूतावास कार्यालय उघडल्याबरोबर व्हिसासाठी माणसांची झुंबड उडाली. गर्दी इतकी जास्त की शेवटी जवळच्या स्टेडियममध्ये लोकांना रांगा करा असं सांगण्यात आलं. व्हिसाचे अर्ज देण्यासाठी फक्त टोकन देण्यात येणार होते. ते टोकन घेण्यासाठी लोक रात्र रात्र जागत भल्यामोठ्या लांबलचक रांगांमध्ये उभे राहिले, त्यात स्त्रिया आणि वृद्धांची संख्या जास्त होती. 

मात्र सकाळ होता होता लोकांचा संयम सुटला. पाकिस्तानी दूतावासात गर्दी अशी काही उसळली की रेटारेटी झाली. आणि चेंगराचेंगरीत १५ लोकांचा बळी गेला. त्यात ११ महिला  आहेत. पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील राजदूत मन्सूर अहमद खान यांनी झाल्या घटनेबद्दल दु:ख तर व्यक्त केलंच मात्र अफगाण सरकारलाही चार शब्द सुनावले. ते म्हणतात, अफगाण सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी व्हिसा मागण्यासाठी येणाऱ्या माणसांसाठी अधिक उत्तम सुविधा द्यायला हव्यात!’ थोडक्यात घटनेची जबाबदारी  अफगाण अव्यवस्थेवर ढकलून पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी मोकळे झाले. हजारो माणसं धास्तावून आपापल्या घरी परत गेली. म्हातारी माणसं हिरमुसली, जायबंदीही झाली. व्हिसा तर मिळाला नाहीच; पण निराशा मात्र वाढली.

पण मुळात हे सारं का झालं? एवढ्या लोकांना कशासाठी पाकिस्तानला जायचं होतं? पाकिस्तानला जाणं हे आयुष्याचं इप्सित असू शकतं का? - या प्रश्नाचं उत्तर आहे, हतबलता. अनेक अफगाणी नागरिक दुर्धर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी पाकिस्तानात जातात कारण अफगणिस्तानात उपचारांची सोयच नाही. याशिवाय शिक्षण, कामधंदा यासाठीही पाकिस्तानचं दार ठोठावणारे हजारो आहोत. आपल्या भवतालची असुरक्षितता आणि दैन्य, तालिबानने पुन्हा डोकं वर काढणं या सगळ्या अवस्थेत आपल्या देशातल्या अस्थिर जगण्यापेक्षा अफगाणी माणसांना पाकिस्तान बरा असं वाटू लागलं आहे. ३० लाख अफगाण निर्वासित सध्या पाकिस्तानात राहतात. गेली १९ वर्षे अफगणिस्तान युद्धात होरपळला, त्यामुळे निर्वासितांचे लोंढे पाकिस्तानात आले. आता हे लोंढे आवरा, आपलीच अन्नान्न दशा असताना अफगाणिस्तानातून येणारे हे लोंढे कसे आणि का पोसायचे असा स्थानिकांचा सवाल आहे.

अर्थात, अमेरिका-तालिबान-अफगाण चर्चेत आपलं स्थान आणि महत्त्व टिकून राहावं, आर्थिक रसद सुरू रहावी म्हणून कुटनैतिक आघाडीवर तरी पाकिस्तानला अफगाणी लोकांसाठी आपले दरवाजे बंद करता येत नाहीत. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना व्हिसा द्यावाच लागतो. आणि अफगाणी माणसांचं दुर्दैव म्हणजे जगात फार थोडे देश त्यांना पटकन व्हिसा देतात, त्यापैकी पाकिस्तान हा त्यांचा हक्काचा सहारा आहे. इथल्यापेक्षा तिथे बरं असं म्हणत, लोक पाकिस्तानात जायला निघतात. तिथं गुराढोरांसारखे जगतात, पण देश सोडतात. मात्र देश सोडून जाण्याचा विचार करण्याच्या दारातच असं चेंगराचेंगरीत मरण आणि मरणांतिक यातना देणारी निराशा अफगाण लोकांच्या वाट्याला आली. आता अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात शांतिवार्ता सुरू आहे. पण म्हणून काही तालिबान हल्ले थांबले नाहीत, परवाच झालेल्या एका तालिबानी हल्ल्यात ३५ लोक मारले गेले. मृत्यूचा भयाण खेळ सुरूच आहे. अफगाणिस्तान नावाच्या देशाची ही अशी धुळधाण आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान