शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:33 IST

Congress: राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता पायलटांकडे लागल्या आहेत.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले त्रिभुवनेश्वर सरण सिंग देव म्हणजेच टी. एस. सिंग देव अथवा टीएस बाबा यांचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. सत्तरपैकी तब्बल ५५ जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर खरंतर त्यांचाच दावा किंवा हक्क होता. तथापि, ओबीसी मते डोळ्यासमोर ठेवून भूपेश बघेल यांच्या गळ्यात ती माळ पडली. सरगुजा संस्थानचे राजे टीएस बाबा यांची नाराजी आरोग्य, वैद्यक शिक्षण, ग्रामविकास अशी चार-पाच महत्त्वाची खाती देऊन दूर करण्याचा प्रयत्न झाला. आता चार महिन्यांपुरते का हाेईना त्यांना औटघटकेचे उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सत्तराव्या वर्षी ऑस्ट्रेलियात स्कायडायव्हिंग करणाऱ्या या राजांना दिलासा मिळाल्यामुळे राजस्थानात राजपुत्रांसारखे वावरणारे सचिन पायलट यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील. तेे गेली अडीच-तीन वर्षे नाराज आहेत. समर्थक आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत नेत्रपल्लवी खेळूनही झाली आहे. पण, फुटीसाठी आवश्यक तेवढी संख्या जमली नाही. गांधी कुटुंबातून त्यांना थोडेसे समर्थन असले तरी राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता पायलटांकडे लागल्या आहेत.

अशा राजकीय घडामोडींना गती येण्याचे कारण तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेआधीची सेमीफायनल काही महिन्यांवर आली आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे यापैकी मध्य प्रदेश राज्य आहे. मिझोराम या ईशान्य भारतातील छोट्या राज्यात भाजपचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष ‘मिझो नॅशनल फ्रंट’ सत्तेवर आहे. जवळपास चार दशके मिझोरामच्या राजकारणावर प्रभाव ठेवणारे माजी मुख्यमंत्री, राजीव गांधींचे मित्र लल थनहवला यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. तिथे ग्राम समित्या व स्वायत्त जिल्हा समित्यांच्या निवडणुकीत यश मिळविले असल्याने ती निवडणूक भाजपला तितकीशी कठीण नाही. तेलंगणाची सत्ता भारत राष्ट्र समितीकडे आहे आणि तिच्या बळावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नजर शेजारच्या महाराष्ट्रावर आहे.

छत्तीसगड व राजस्थान ही काँग्रेसची सत्ता असलेल्या, देशातील मोजक्या राज्यांमध्ये प्रमुख आहेत. या सेमी फायनलमध्ये मोठे यश मिळविण्याचे आव्हान भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मादींपुढे आहे. त्यांना मध्य प्रदेशातील सत्ता टिकवायची आहे. तेलंगणामध्ये किमान प्रमुख विरोधी पक्ष बनण्याचे भाजपचे स्वप्न आहे. वसुंधरा राजे शिंदे व अशोक गहलोत यांना आलटून-पालटून सत्ता देणाऱ्या राजस्थानमध्ये यावेळी सहज सत्तांतर होईल, अशी स्थिती नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची ताकद अशोक गहलोत यांना मात देण्यासाठी पुरेशी नाही, हे लक्षात आल्यानंतर सध्या शांत असलेल्या वसुंधराराजेंना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. तथापि  छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी राबविलेल्या योजनांचा मुकाबला भाजपला करायचा आहे. गेल्यावेळी भाजपच्या हातून मध्य प्रदेशची सत्ता गेली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडताना सोबत आणलेल्या आमदारांच्या मदतीने ती पुन्हा हस्तगत केली गेली. यावेळीही काँग्रेसचे तगडे आव्हान भाजपपुढे आहे. कमलनाथ यांनी पुन्हा सत्तेवर येण्याचा चंग बांधला आहे.

विशेष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजप व काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. या निवडणुकीच्या निकालांवर लोकसभेची वातावरणनिर्मिती अवलंबून आहे. याची पहिली जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थातच आहे. म्हणूनच अमेरिका व इजिप्तचा बहुचर्चित दौरा आटोपून परत आल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी भोपाळला पोहोचले. ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याच्या निमित्ताने त्यांनी सभा घेतली आणि आठवडाभरापूर्वी पाटण्यात एकत्र आलेल्या विरोधकांवर अगदी एकेकाचे नाव घेत हल्ला चढविला. जणू पाच विधानसभा व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच नारळ मोदींनी भोपाळमध्ये फाेडला आहे. पाठोपाठ काँग्रेस सक्रिय झाली आहे. थोडक्यात, सेमीफायनलची खडाखडी सुरू झाली आहे. सगळेच कामाला लागले आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस