शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

वाघांचे अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:15 PM

हल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात.

- नंदकिशोर पाटीलहल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात. मायानगरी मुंबापुरीत तर त्यांचं येणं-जाणं नित्याचंच झालं आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीपासून बालघाटाच्या डोंगरदऱ्यांपर्यंत कधीकाळी वाघांचा खूप दरारा होता. पण हल्ली जंगलात त्यांचं मन रमत नाही. शहरांतील ‘हायफाय’ जीवनशैलीची त्यांना भुरळ पडली असावी. शहरांतली माणसं जसं ‘वीकएन्ड’ला जंगलाकडे धाव घेतात, तसं आपणही शहरांत येऊन वीकएन्ड साजरा करावा असंही कदाचित त्यांना वाटत असावं. परवा मालाडच्या एका मल्टीप्लेक्समध्ये बिबट्या आढळला म्हणे. शहरी माणसांना बिबट्या आणि वाघातला फरकही धड कळत नाही. तो बिबट्या नव्हे, तर बिबट्याचा वेष धारण केलेला वाघ असण्याची शक्यता अधिक. सध्या वांद्रेतील सेनेतही बिबट्याची चलती असल्यामुळे आला असेल बिचारा वेषांतर करून! वाघांना शहराचं आकर्षण असण्यामागे तशी अनेक कारणं आहेत. शहरांत रस्तोरस्ती लागलेल्या होर्डिंग्ज्वरील ‘वाघां’ची चित्रे बघून खरेखुरे वाघही मनोमन सुखावत असतील. शहरात तसेही पोट भरण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. जर तुम्ही वाघकुळातील असाल, तर बसल्याजागी काम फत्ते होऊन जाते. फक्त गुरगुरता आलं पाहिजे! मागच्या आठवड्यात एक वाघोबा पाय मोकळे करायला म्हणून गिरगावात आलेले. समोरच्या गल्लीत शर्टावर ‘वाघसेने’चा बिल्ला लावलेला एक गल्लीदादा तिथल्या व्यापाºयांना जाम घाम फोडत होता. ते दृश्य बघून खºयाखुºया वाघाला हसू आवरेना. पण हसरा वाघ म्हणून लहान मुलांनी आपणास गुदगुल्या करायला नकोत, म्हणून त्यानं हसू आवरतं घेतलं. शहरातली पॉश रेस्टॉरंट्स, बार, पब्स बघून वाघांनाही ‘बसण्याचा’ मूड होत असेल का, ही शंका मनात यायला उशीर की, पिझ्झा, बर्गरवर ताव मारणारी माणसं बघून वाघांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं मी पाहिलं आहे. उद्या कदाचित ‘मॅक्डोनॉल्ड’ किंवा ‘केएफसी’च्या काऊंटरवर केंटुकी चिकनची आॅर्डर देणारा एखादा वाघ दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, हल्ली जंगलातील शिकारीला वाघ मंडळी जाम वैतागली आहे. दिवसरात्र धावपळ केल्यानंतर कुठे एखादी शिकार हाती लागते. त्यातही वाटेकरी अधिक. त्यापेक्षा शहरातली खंडणी परवडली. नुसतं धमकावलं, तरी बिल्डर मंडळी खोकीभर ‘माल’ पाठवतात! फेरीवाल्यांकडून मिळणाºया चिरीमिरीवर पॉकेटमनी सहज निघून जातो. वाघ म्हटलं की, सहसा कुणी रिकाम्या हातांनी परत पाठवणार नाही. सत्ताधाºयांनाही व्याघ्रकोप परवडणारा नसतो. नाणारच्या नावानं नुस्ती डरकाळी फोडली तरी ‘लादणार नाही’ असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागतो आणि ‘बाहेर पडणार’ अशी नुसती धमकी दिली तर शहेन‘शाहां’ना वांद्रेत येऊन पायधूळ झाडून जावी लागते. आपले वनमंत्री तर सतत कागदीवाघ नाचवित असतात.गतवर्षी तर त्यांनी चक्क भुसा भरलेला एक वाघ ‘मातोश्री’वर पाठवला होता. त्यातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं होतं, याचा खुलासा अद्याप केलेला नाही. वनमंत्र्यांवर आता सेनेचे वाघ सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. शहरी वाघांचे चाललेले हे लांगुलचालन बघून जंगली वाघांची पावलं शहरांकडे पडली नाहीत तरच नवल!

टॅग्स :Tigerवाघ