शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:39 AM

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते.

- टीआरके सौमय्या(व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ)महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे.माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वत:हून पुढे येत नाही. नि:स्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने नि:स्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे.तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत