शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

By नंदकिशोर पाटील | Updated: October 17, 2023 16:26 IST

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणात ऐन दिवाळीत फटाके फुटणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल असेल. सध्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळ आले आहे. राजकीय पक्षांनी आपापली टीम बांधायला सुरुवात केली आहे. समोर भाजप सारखा तगडा प्रतिस्पर्धी आहे. भाजपने सलग दोन वेळा ‘लोकसभा चषक’ जिंकला आहे. यावेळीही ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखे शतकी ‘ओपनर’ आहेत. एकहाती सामना जिंकण्याची त्यांची क्षमता आजवर सिद्ध झालेली आहे. शिवाय, ऐनवेळी कमकुवत खेळाडू बदलण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मग तो कोणी-कितीही मोठा असला तरी! याउलट काँग्रेससह इतर पक्षांना खेळाडू शोधण्यापासून तयारी करावी लागते. अनेकदा तर ऐनवेळी त्यांचेच खेळाडू टीम बदलून प्रतिस्पर्धी संघाकडून मैदानात उतरतात! निवडणूक जवळ आली की, अशा दलबदलू खेळाडूंना चांगला ‘भाव’ मिळतो. ‘आयपीएल’सारखी बोली लागत नाही इतकेच. भविष्यात तेही होऊ शकते.

यावेळची लोकसभा निवडणूक वेगळी असेल. त्याची रंगीत तालीम पाच राज्यांच्या निवडणुकीत होईल. या निवडणुकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. कारण या पाच राज्यांत लोकसभेच्या ६३ जागा आहेत. शिवाय, या निवडणुकीपाठोपाठ लोकसभा असल्याने तो टेम्पो देशभर कायम राहू शकतो. तसे पाहिले तर रात्र थोडी आणि सोंगे फार, अशी राजकीय पक्षांची गत झाली आहे. भाजप बारमाही निवडणूक मूडमध्ये असतो. प्रश्न इतर पक्षांचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली आहे. या आघाडीतील सामील पक्षांची संख्या आणि नावे पाहिली तर आजघडीला कागदावर तरी ही आघाडी मजबूत दिसते. भाजप प्रणित एनडीएच्या घटक पक्षांची संख्या कमी होत आहे. अण्णा द्रमुक, तेलगु देसम, शिरोमणी अकाली दल यासारखे एकेकाळचे जुने सहकारी भाजपला सोडून जात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव अलीकडच्या काळात एनडीएत सहभागी झालेला नवा पक्ष आहे.

दक्षिण भारतातील एकही राज्य भाजपच्या ताब्यात नाही. उत्तरेतील मध्यप्रदेश हे राज्य देखील हातून जाण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलचे अंदाज तेच सांगतात. राजस्थानची आशा आहे. पण तिथे काहीही घडू शकते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट भाजपवर नाराज असल्याचे सांगतात. छत्तीसगडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला अनुकूल वातावरण आहे. विरोधकांनी एकजुटीने एकास एक उमेदवार दिला तर सामना चुरशीचा होऊ शकतो. पण राज्या-राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

महाराष्ट्राचेच उदाहरण घेऊ. एका बाजुला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे संघ आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या दोन्ही संघात नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची आघाडी झाली आहे. पण वंचित ‘इंडिया’ आघाडीत नाही! असे हे त्रांगडे आहे. ‘वंचित’ला कमी लेखून चालत नाही. गेल्यावेळी याच वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट लावली होती.गेल्या लोकसभेत मराठवाड्यातील नांदेडच्या जागेवर वंचितमुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर मतदारसंघात होती. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. वंचित सोबत असेल तर मराठवाड्यातील लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा विरोधकांच्या आघाडीला मिळू शकतात.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस