शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

By नंदकिशोर पाटील | Updated: October 17, 2023 16:26 IST

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणात ऐन दिवाळीत फटाके फुटणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल असेल. सध्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळ आले आहे. राजकीय पक्षांनी आपापली टीम बांधायला सुरुवात केली आहे. समोर भाजप सारखा तगडा प्रतिस्पर्धी आहे. भाजपने सलग दोन वेळा ‘लोकसभा चषक’ जिंकला आहे. यावेळीही ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखे शतकी ‘ओपनर’ आहेत. एकहाती सामना जिंकण्याची त्यांची क्षमता आजवर सिद्ध झालेली आहे. शिवाय, ऐनवेळी कमकुवत खेळाडू बदलण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मग तो कोणी-कितीही मोठा असला तरी! याउलट काँग्रेससह इतर पक्षांना खेळाडू शोधण्यापासून तयारी करावी लागते. अनेकदा तर ऐनवेळी त्यांचेच खेळाडू टीम बदलून प्रतिस्पर्धी संघाकडून मैदानात उतरतात! निवडणूक जवळ आली की, अशा दलबदलू खेळाडूंना चांगला ‘भाव’ मिळतो. ‘आयपीएल’सारखी बोली लागत नाही इतकेच. भविष्यात तेही होऊ शकते.

यावेळची लोकसभा निवडणूक वेगळी असेल. त्याची रंगीत तालीम पाच राज्यांच्या निवडणुकीत होईल. या निवडणुकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. कारण या पाच राज्यांत लोकसभेच्या ६३ जागा आहेत. शिवाय, या निवडणुकीपाठोपाठ लोकसभा असल्याने तो टेम्पो देशभर कायम राहू शकतो. तसे पाहिले तर रात्र थोडी आणि सोंगे फार, अशी राजकीय पक्षांची गत झाली आहे. भाजप बारमाही निवडणूक मूडमध्ये असतो. प्रश्न इतर पक्षांचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली आहे. या आघाडीतील सामील पक्षांची संख्या आणि नावे पाहिली तर आजघडीला कागदावर तरी ही आघाडी मजबूत दिसते. भाजप प्रणित एनडीएच्या घटक पक्षांची संख्या कमी होत आहे. अण्णा द्रमुक, तेलगु देसम, शिरोमणी अकाली दल यासारखे एकेकाळचे जुने सहकारी भाजपला सोडून जात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव अलीकडच्या काळात एनडीएत सहभागी झालेला नवा पक्ष आहे.

दक्षिण भारतातील एकही राज्य भाजपच्या ताब्यात नाही. उत्तरेतील मध्यप्रदेश हे राज्य देखील हातून जाण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलचे अंदाज तेच सांगतात. राजस्थानची आशा आहे. पण तिथे काहीही घडू शकते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट भाजपवर नाराज असल्याचे सांगतात. छत्तीसगडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला अनुकूल वातावरण आहे. विरोधकांनी एकजुटीने एकास एक उमेदवार दिला तर सामना चुरशीचा होऊ शकतो. पण राज्या-राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

महाराष्ट्राचेच उदाहरण घेऊ. एका बाजुला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे संघ आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या दोन्ही संघात नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची आघाडी झाली आहे. पण वंचित ‘इंडिया’ आघाडीत नाही! असे हे त्रांगडे आहे. ‘वंचित’ला कमी लेखून चालत नाही. गेल्यावेळी याच वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट लावली होती.गेल्या लोकसभेत मराठवाड्यातील नांदेडच्या जागेवर वंचितमुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर मतदारसंघात होती. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. वंचित सोबत असेल तर मराठवाड्यातील लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा विरोधकांच्या आघाडीला मिळू शकतात.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस