शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

By नंदकिशोर पाटील | Updated: October 17, 2023 16:26 IST

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणात ऐन दिवाळीत फटाके फुटणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल असेल. सध्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळ आले आहे. राजकीय पक्षांनी आपापली टीम बांधायला सुरुवात केली आहे. समोर भाजप सारखा तगडा प्रतिस्पर्धी आहे. भाजपने सलग दोन वेळा ‘लोकसभा चषक’ जिंकला आहे. यावेळीही ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखे शतकी ‘ओपनर’ आहेत. एकहाती सामना जिंकण्याची त्यांची क्षमता आजवर सिद्ध झालेली आहे. शिवाय, ऐनवेळी कमकुवत खेळाडू बदलण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मग तो कोणी-कितीही मोठा असला तरी! याउलट काँग्रेससह इतर पक्षांना खेळाडू शोधण्यापासून तयारी करावी लागते. अनेकदा तर ऐनवेळी त्यांचेच खेळाडू टीम बदलून प्रतिस्पर्धी संघाकडून मैदानात उतरतात! निवडणूक जवळ आली की, अशा दलबदलू खेळाडूंना चांगला ‘भाव’ मिळतो. ‘आयपीएल’सारखी बोली लागत नाही इतकेच. भविष्यात तेही होऊ शकते.

यावेळची लोकसभा निवडणूक वेगळी असेल. त्याची रंगीत तालीम पाच राज्यांच्या निवडणुकीत होईल. या निवडणुकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. कारण या पाच राज्यांत लोकसभेच्या ६३ जागा आहेत. शिवाय, या निवडणुकीपाठोपाठ लोकसभा असल्याने तो टेम्पो देशभर कायम राहू शकतो. तसे पाहिले तर रात्र थोडी आणि सोंगे फार, अशी राजकीय पक्षांची गत झाली आहे. भाजप बारमाही निवडणूक मूडमध्ये असतो. प्रश्न इतर पक्षांचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली आहे. या आघाडीतील सामील पक्षांची संख्या आणि नावे पाहिली तर आजघडीला कागदावर तरी ही आघाडी मजबूत दिसते. भाजप प्रणित एनडीएच्या घटक पक्षांची संख्या कमी होत आहे. अण्णा द्रमुक, तेलगु देसम, शिरोमणी अकाली दल यासारखे एकेकाळचे जुने सहकारी भाजपला सोडून जात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव अलीकडच्या काळात एनडीएत सहभागी झालेला नवा पक्ष आहे.

दक्षिण भारतातील एकही राज्य भाजपच्या ताब्यात नाही. उत्तरेतील मध्यप्रदेश हे राज्य देखील हातून जाण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलचे अंदाज तेच सांगतात. राजस्थानची आशा आहे. पण तिथे काहीही घडू शकते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट भाजपवर नाराज असल्याचे सांगतात. छत्तीसगडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला अनुकूल वातावरण आहे. विरोधकांनी एकजुटीने एकास एक उमेदवार दिला तर सामना चुरशीचा होऊ शकतो. पण राज्या-राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

महाराष्ट्राचेच उदाहरण घेऊ. एका बाजुला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे संघ आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या दोन्ही संघात नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची आघाडी झाली आहे. पण वंचित ‘इंडिया’ आघाडीत नाही! असे हे त्रांगडे आहे. ‘वंचित’ला कमी लेखून चालत नाही. गेल्यावेळी याच वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट लावली होती.गेल्या लोकसभेत मराठवाड्यातील नांदेडच्या जागेवर वंचितमुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर मतदारसंघात होती. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. वंचित सोबत असेल तर मराठवाड्यातील लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा विरोधकांच्या आघाडीला मिळू शकतात.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस