शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 08:09 IST

४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणाऱ्या तापमानात होरपळणारा भारत विशेष जोखमीच्या गटात मोडतो. येणारे उन्हाळे आणखीच कडक असतील!

- डॉ. रीतू परचुरे

अतिउष्णतेच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल आपण बुधवारच्या पूर्वार्धात वाचले. पुढील काळात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि दाहकता जशी वाढत जाईल, तसा या प्रश्नाचा आवाकाही वाढणार आहे. देशाची लोकसंख्या, वाढते शहरीकरण, सिमेंटच्या जंगलांमुळे शहरात तयार झालेली उष्णतेची बेटे, आणि उन्हाळ्यात अनेक भागात आताच ४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणारे तापमान अशा कारणांमुळे भारत या दृष्टीने विशेष जोखमीच्या गटात मोडला जातो. साधन-क्षमतांचे असमान वाटप, यामुळे जोखमीत अजून भर पडते.

भारतात, २०११ च्या जनगणनेनुसार जवळजवळ ३०% लोक शहरात राहत होते. २०५० पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत पोहोचेल, असा कयास आहे. यातला एक मोठा गट शहरी गरीब गटात मोडतो. या गटातील अनेकांच्या डोक्यावर पत्र्याचे छप्पर असते, घरे अतिशय छोटी असतात, फॅन/कूलर यासारखी साधने परवडत नाहीत, पाण्याचा प्रश्न असतो.  शहरातला एक मोठा वर्ग अनौपचारिक क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रातली अनेक कामे (उदा. पथारी विक्रेते, फेरीवाले, हमाल, मजूर, ड्रायवर) दिवसदिवस उन्हात असतात. कामाच्या जागी बऱ्याचदा आडोसा, पिण्याच्या पाण्याची सोय नसते. ग्रामीण भागातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. शेतमजुरी किंवा मनरेगामधून विकासाच्या कामांवर मजुरी हे अनेकांचे अर्थार्जनाचे साधन आहे. कामासाठी उन्हात राबणे आणि घरात पुरेशा सोयी नाहीत, हे वास्तव इथेही आहेच. पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागात अधिकच अवघड आहे. ही असमानता अनारोग्याचे (उष्णतेमुळे होणारे आजार / मृत्यू) वाटपही असमान करते. यात, शहरी असो वा ग्रामीण, पुरुष-स्त्रियांच्या अडचणीत थोडे-थोडे वेगळेपणही आहे. पुरुषांना बाहेरच्या उन्हातली, जास्त कष्टाची कामे पडतात, तर बायकांना बाहेरची आणि मग घरातली कामे पडल्याने जराही उसंत नसते. कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसेल तर अशा वेळी बराच काळ लघवीलाच जाऊ शकत नसल्याने स्त्रिया कमी पाणी पितात, यामुळे उष्णतेचे आजार बळावतात. 

सरकारी सेवांचा अभाव आणि महागडी खासगी सेवा यामुळे वैद्यकीय सेवा बऱ्याच रुग्णांना दुरापास्त ठरतात. सध्या काही शहर व राज्यांमध्ये  उष्णतेसंबंधी कृती आराखडे कार्यरत करण्यात आले आहेत. यात संभाव्य उष्णता-लाटेच्या धोक्याची शक्यता सूचित केली जाते. त्यानुसार स्थानिक प्रशासनातर्फे काही दक्षता घेतल्या जातात, जाणीव जागृतीचे प्रयत्न केले जातात. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी, जोखमीच्या गट-समूहांच्या गरजा कशा भागवता येतील, हा विचार या योजना आखताना होणे अपेक्षित आहे.   

या सर्व प्रयत्नात स्थानिक लोकांचा सहभाग अतिशय मोलाचा ठरेल. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फॅन, कूलर, छप्पराला पांढरा रंग, हवा खेळती राहील अशी बांधकामे अशी उत्तरे आहेतच. शहरांचा शाश्वत विकास, वीज, पाणीपुरवठा, कामाच्या ठिकाणी स्वास्थ्य, सुरक्षा याबद्दलची धोरणेही लागतील.

उष्णतेच्या आजारांचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार हा एक भाग झाला. त्यासाठी सुसज्ज आरोग्य केंद्रे आणि आरोग्य सेवकांचे वेळोवेळी प्रशिक्षण हवेच. तितकाच महत्त्वाचा दुसरा भाग आहे आरोग्य संबंधित विदेचा (डेटा). जागतिक पर्यावरण बदलाचे आरोग्यावर होणारे परिणाम महाकाय आणि अनिश्चित असू शकतात. त्यांच्याबद्दल जागरूक असावे लागेल. वेळोवेळी विश्लेषण केलेली आरोग्याबद्दलची माहिती पुढील तयारीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरू शकते. ritu@prayaspune.org

टॅग्स :Heat Strokeउष्माघात