शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

सरकारने ‘एक देश, एक ओळखपत्र’ याबाबत विचार करावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 07:36 IST

माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी आपल्या निवडणूक पद्धतीला योग्य दिशा देत ती अधिकाधिक लोकशाहीभिमुख करण्यासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली.

- सुधीर दाणी, बेलापूर, नवी मुंबई

भविष्यात लोकसभा-विधानसभांसह सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या उपक्रमाच्या व्यवहार्यतेचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईलच. तथापि, वारंवार होणाऱ्या निवडणुका व त्या अनुषंगाने लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकासकामांत अडथळा निर्माण होतो, मनुष्यबळाचा अपव्यय, पैशांची नासाडी यासारखी कारणे  ‘एक देश, एक निवडणूक’  या मुद्याच्या समर्थनार्थ पुढे केली गेलेली आहेत.  मनुष्यबळाचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने ‘एक देश-एक निवडणूक’  उपक्रमासोबतच ‘एक देश-एक ओळखपत्र’ या संकल्पनेस अनुसरून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आधार आधारित बायोमेट्रिक ओळख पद्धतीच्या मदतीने मतदान प्रक्रिया राबविली जावी. 

माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी आपल्या निवडणूक पद्धतीला योग्य दिशा देत ती अधिकाधिक लोकशाहीभिमुख करण्यासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली. त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आपण पाहत आहोत. मतदारांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय देखील त्यांचाच. त्यालाही आता  दशकाहून अधिक काळ लोटला आहे परंतु आजही आपण मतदान प्रक्रिया पूर्णपणे फुलप्रूफ बनवू शकलो नाही. आजवर निवडणूक आयोगाने अनेकवेळा मतदारांचे सरकारी खर्चाने फोटो काढले, ओळखपत्र दिले, परंतु करोडो रुपये खर्चूनही आजही मतदार याद्या सदोष का, यावर मात्र चर्चा का होत नाही. 

समस्येचे निराकरण करण्याऐवजी, प्रश्नाचे उत्तर शोधण्याऐवजी केवळ आणि केवळ समस्या-प्रश्नांभोवती रुंजी घालणे हा आपल्या सर्वच व्यवस्थेचा छंद झाला आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाची मानसिकता तंत्रज्ञानाच्या सक्षम वापरासाठी पूरक नाही हे त्यांच्या ऑनलाइन अर्ज भरूनही त्याची प्रिंटआउट कार्यालयात जमा करण्याच्या अनिवार्यतेवरून दिसते. मतदार ओळखपत्र आणि आधार  लिंक करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. तूर्त हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक आहे.  ‘देर आये दुरुस्त आये’ अशा प्रकारचा हा निर्णय असून निवडणूक प्रक्रिया शुद्धीकरणासाठीचे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरते. वस्तुतः निवडणूक आयोगाने  मतदार ओळखपत्र पूर्णतः बंद करून संपूर्ण मतदान प्रक्रिया आधार ओळखपत्राच्या आधारे सुरू करण्याची गरज आहे.

निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीआधी याद्या अद्ययावत करण्यात मनुष्यबळ, कररूपी पैशांचा अपव्यय न करता, नवीन ओळखपत्राचा अट्टाहास धरण्यापेक्षा  किंवा आधार आणि ओळखपत्र लिंक करण्याच्या अर्धवट उपाय योजण्यापेक्षा थेट आधारच्या आधारे बायोमेट्रिक ओळखीच्या तंत्राने मतदान प्रक्रिया राबवावी.

ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेसाठी प्रत्येक वेळी मतदार याद्या बनवण्यात सर्वांगणी अपव्यय टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने देशातील सर्व मतदारांची डिजिटल मतदार यादी तयार करावी.  प्रत्येक मतदाराला निवडणुकीत कुठल्याही एक ठिकाणी म्हणजेच कुठल्याही एका ग्रामपंचायतीकरिता, कुठल्याही एका पंचायत समिती, जिल्हा परिषद, कुठल्याही एका विधानसभा, लोकसभेसाठी मतदान करण्याचा पर्याय द्यावा.