शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आपल्या देशाचा ‘स्वधर्म’... अभिमान आणि शरम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 13:57 IST

भारतीय लोकशाहीने पश्चिमी लोकशाहीचे शरीर तर घेतले; परंतु त्यात आपले प्राण फुंकले. म्हणून आपल्या स्वधर्माचे आकलन सोपे नाही!

- योगेंद्र यादव, अध्यक्ष स्वराज इंडिया

या देशाच्या विद्यमान परिस्थितीला स्वधर्माच्या प्रकाशात पारखून पाहिले पाहिजे, असे या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हटले होते. आज जे होते आहे, ते बरोबर आहे की चूक, अभिमानाचा विषय आहे की शरमेचा, याचा निर्या आपण आपल्या आग्रह दुराग्रहाच्या आधारे करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला केवळ कोणीतरी मारून मुटकून तयार केलेली किंवा उधार घेतलेली विचारधारा उपयोगी पडणार नाही. एखाद्या देशाच्या प्रवासाचे मूल्यमापन स्वधर्माच्या आधारे होऊ शकते. 

राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आणि पश्चिमी विचारांमध्ये झालेला संवाद आणि संघर्षाच्या ऐतिहासिक प्रक्रियेतून जन्माला आलेला भारतीय स्वधर्म शेवटी आहे तरी काय? 

- भारतीय संस्कृतीच्या शील, करुणा आणि मैत्री या तीन शाश्वत मूल्यांचा संगम भारताच्या स्वधर्मामध्ये आपल्याला शोधता येतो; परंतु हे तिन्ही आदर्श प्राचीन स्वरुपात आपल्या राज्यघटनेमध्ये आणले गेलेले नाहीत. स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी या आदर्शांची साफसफाई झाली आणि आधुनिक युरोपच्या तीन आदर्शांशी त्याचा अत्यंत सखोल संवाद झाला. फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उद्घोषाला भारतीय मनाने आपल्या पद्धतीने ऐकले.

विसाव्या शतकातील उदारवाद, समाजवाद आणि सेक्युलरवादाच्या विचार प्रवाहांना आपल्या वैचारिक चाळणीने चाळून घेतले. या मंथनातून लोकशाही कल्याणकारी राज्य आमि सर्वधर्मसमभावाची देशी, परंतु आधुनिक अशी समज तयार झाली. या खास हिंदुस्तानी आधुनिकतेत भारतीय गणतंत्राच्या सर्वधर्माची तीन पायाभूत सूत्रे विसलेली आहेत. अलग अलग धर्मीयांच्यामध्ये सौहार्द सांभाळणे ही आधुनिक भारताची समस्या आहेत. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक विविधता आहे. सर्व धार्मिक समुदाय सार्वजनिकरित्या आपापल्या धार्मिक आस्था दाखवत असतात. त्यातल्या अनेक समुदायांचे एकमेकांशी सौहार्द दिसते. तसेच त्यांच्यात संघर्ष झाल्याचेही इतिहास सांगतो. म्हणून भिन्नभिन्न मते आणि भिन्न भिन्न धर्मीयांमध्ये समभाव प्रस्थापित करणे घृणा आणि हिंसा रोखणे, धार्मिक संस्थांचे नियमन करणे आणि आंतरिक कुप्रथा सुधारणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. 

म्हणून आस्थाहीन किंवा अनिश्वरवादी सेक्युलरवाद आपल्या समस्येचे उत्तर नाही. भारताच्या स्वधर्मात स्वधर्मीयांची एक अशी दृष्टी आहे, जी धार्मिकतेचा आदर करते. सर्व पंथांबद्दल समभाव राखते. जी मैत्रीच्या भावनेतून उत्पन्न झालेली असते आणि देशधर्मी असते. आपल्या राज्यघटनेत वर्णन केलेल्या सामाजिक आर्थिक आणि समतेच्या मुळाशी करुणेचा विचार आहे. तो आपल्या परंपरेमध्ये होता. करुणेची प्रवृत्ती जीवाचे दुःख हलके करण्यासाठी असते. आधुनिक काळात करुणाची प्रवृत्ती सामूहिक आदर्शांचे रुप घेते. उर्वरित जगाप्रमाणे आपल्या देशातही आधुनिक समाजवादाचे विचार आणि रशियन क्रांतीच्या प्रभावाखाली करुणेची व्याख्या केली गेली. समतेचा विचार आदर्श समाजाच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आला. समतेची जबाबदारी कोण्या एका व्यक्तीची नाही तर ती राज्यव्यवस्थेची जबाबदारी मानली गेली आहे. 

लोकशाहीचा विचार आधुनिक आहे आणि त्यातील संस्था पश्चिमी व्यवस्थेतून उसन्य घेतलेल्या आहेत; भारतीय लोकशाहीने पश्चिमी लोकशाहीचे शरीर तर घेतले; परंतु त्यात आपले प्राण फुंकले. भारतीय लोकशाही संस्था किंवा प्रक्रियेपेक्षाही लोकांचे कल्याण, लोकमत याला अधिक महत्त्व देते. अहंकार आणि मतभिन्नतेचे दमन भारतीय लोकशाही संस्काराच्या विरुद्ध आहे.

आता शेवटचा प्रश्न: गेल्या काही वर्षांत भारताचे बदलते स्वरुप आपल्या या स्वधर्माच्यानुसार आहे काय?

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Indiaभारत