शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

दिलदार नेत्याच्या अधुऱ्या स्वप्नांची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 07:48 IST

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन! त्यांच्या प्रागतिक व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करताना त्या काळाला उजाळा देणारा विशेष लेख...

- के. नटवर सिंग

भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत २१ व्या शतकात नेण्याचे श्रेय नि:संशय देशाचे भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनाच जाते. त्यांना यंत्रतंत्राची उत्तम जाण होती. आधुनिक तंत्रज्ञानावरची  अद्ययावत पुस्तके ते सतत वाचत  असत. देशात दूरध्वनी आणि संगणकाचे नवे तंत्रज्ञान आणण्याचे श्रेयही अर्थातच राजीवजींचेच!  या कामासाठी त्यांनी त्यांचे निकट मित्र सॅम पित्रोदा यांना अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात बोलावून घेतले. त्यांना सरळ सांगितले, ‘आमच्याकडे दूरध्वनी नाहीत. लवकरात लवकर सर्वांना फोन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची.’- तेव्हा देशात डायल फिरवायचे फोन होते. राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत बटणाच्या फोनची निर्मिती भारतात सुरू झाली. त्याशिवाय क्रॉस बार एक्स्चेंजच्या जागी इलेक्ट्रॉनिक एक्स्चेंज आणून घरोघर दूरध्वनी उपलब्ध करून दिले गेले. दुसरे शहर किंवा देशात फोन करण्यासाठी ट्रंककॉल बुक करण्याची गरज न उरणे, हा तत्कालीन भारतासाठी चमत्कारच होता. 

मी त्यांच्याबरोबर अनेक देशांत प्रवास केला. एकदा आम्ही नामिबिया या आफ्रिकी देशाच्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात सामील होण्यासाठी गेलो. तेव्हा दक्षिण आफ्रिकेतूनच तिकडे जावे लागायचे. झांबियाची राजधानी लुसाकामध्ये आम्ही एक रात्र थांबलो होतो. रात्री राजीव गांधी यांनी आपल्या सामानातून तारा जोडलेल्या काही वस्तू काढल्या आणि मला त्यांना मदत करायला सांगितले. मी विचारले, ‘आपण काय करता आहात?’ ते म्हणाले, ‘मी रेडिओ सेट करतो आहे. बातम्या ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणून माझा रेडिओ मी बरोबर ठेवतो!’

- तोवर मी इतका छोटा रेडिओ पाहिला नव्हता 

त्यांची ही नजर आणि बुद्धिमत्ता खरेच असामान्य होती. राजीवजींना आणखी थोडे आयुष्य मिळते, तरी भारत अधिक वेगाने आधुनिक तंत्रयुगात पोहोचला असता.  १९८८ मध्ये आम्ही स्वीडनच्या दौऱ्यात आधी मोबाईल कारखाना पाहायला गेलो. चाचणी म्हणून राजीवजींनी तेथूनच दिल्लीतील दूरसंचार विभागाचे प्रमुख अग्रवाल यांना फोन लावला. कोण्या सचिवाने फोन उचलला. राजीव गांधी बोलत आहेत सांगितल्यावर त्यांना वाटले कोणीतरी थट्टा करते आहे. त्यांनी फोन ठेवून दिला. दोनदा असे झाले. -दिल्लीत परतल्यावर राजीवजींनी अग्रवाल यांना बोलावून घेतले... त्याच दिवशी भारतातल्या मोबाईल क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

७ मार्च १९८३ ला भारतात अलिप्ततावादी देशांचे संमेलन झाले. त्या संमेलनाच्या चोख व्यवस्थेसाठी राजीवजींनी स्वीडनहून ६ मोबाईल फोन मागवून घेतले होते. भारतात कोणाला हे तंत्रज्ञान माहीत नव्हते म्हणून तंत्रज्ञही स्वीडनहून आले होते. त्यांनी एक छोटे एक्स्चेंज तयार केले. त्या वेळी हे फोन दिल्लीमध्ये सर्व ठिकाणी चालत असल्याचा चमत्कार मी अनुभवला आहे.

आपल्या कार्यकालात राजीव गांधी यांनी अणुबॉम्ब तयार केले होते, हे फार थोड्यांना माहीत असेल. दुसऱ्यांदा सत्ता मिळती तर त्यांनी अणुचाचण्याही केल्या असत्या. जे श्रेय अटलबिहारी वाजपेयींना मिळाले. त्याची पूर्वतयारी राजीव यांनीच केली होती. 

वाट पाहणे हा राजीवजींचा जणू स्वभावच नव्हता. त्यांना प्रत्येक काम अत्यंत त्वरेने करायचे असे.  वेग त्यांच्या स्वभावातच होता. कित्येकदा ते स्वत: ताशी १२० ते १४० किमी वेगाने गाडी चालवत. संरक्षककवचातील गाड्या किंवा सहकारी ५- ६ किमी मागे पडत. गाडी हळू चालवा, असे सोनियाजी त्यांना वारंवार सांगत, पण ते ऐकून न ऐकल्यासारखे करत, हे मी अनुभवले आहे.

एकदा आम्ही तुर्कस्तानात गेलो. त्या देशाने कुठलेसे विमान खरेदी केले होते. राजीव यांनी ते उडवून पाहिले. नंतर मी त्यांना म्हणालो, ‘हे आपण बरोबर केले नाही. आपण केवळ पायलट नाही. देशाचे पंतप्रधानही आहात. कोणाला न सांगता आपण चाचणी उड्डाणासाठी कसे काय गेलात?’ते म्हणाले, ‘मी २० वर्षे विमान उडवत आलो, मला काही होणार नाही!’

धोका पत्करणे हे या दिलदार माणसाच्या स्वभावातच मुरलेले होते. पंचायत राजची कल्पना भले मणिशंकर अय्यर यांची असेल, पण ती समजून घेऊन प्रत्यक्षात उतरवणारे राजीवजीच होते. त्यांच्यामुळेच आज गावे सशक्त होत आहेत. सरकारी योजना आणि खजिन्यातून पैसे थेट गावाकडे जात आहेत.राजीव गांधी हा एक सत्शील, दिलदार माणूस तर होताच, शिवाय ते दूरदर्शी प्रशासकही होते. १९८४ साली त्यांना भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा कौल मिळाला. पण दुर्दैव हे, की काही सल्लागारांच्या कारस्थानांमुळे फासे उलटे पडत गेले. भारताच्या इतिहासात राजीवजी जे स्थान मिळवू शकले असते, त्यापासून ते वंचित राहिले.. आणि भारतही!  (मुलाखत आणि शब्दांकन : शरद गुप्ता)

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी