शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 05:51 IST

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे!

करुणा सिंग, संचालक, अर्थ डे नेटवर्क

२२ एप्रिल १९७० या दिवशी पहिला ‘वसुंधरा दिन’ साजरा झाला. आज ५४ वर्षानंतर सुमारे १९० देशांमधल्या १५ लाख लोकांशी “अर्थ डे नेटवर्क” जोडले गेलेले आहे. आपली पृथ्वी, मानव आणि सर्वच जीवमात्रांच्या आरोग्याची काळजी वाहण्याचा विचार हे लोक करतात. वसुंधरा दिन ही आता एक जागतिक चळवळ बनली आहे. लक्षावधी लोकांना या दिवशी पर्यावरणाच्या प्रश्नांवर फक्त विचार नव्हे, काहीतरी कृती करावीशी वाटते. पर्यावरण हा सर्वांवर सारखा परिणाम करणारा, सर्वांना एकत्र आणणारा विषय आहे. हवा आणि पाणी ही आपली सामायिक मालमत्ता आहे. तिचे बरे किंवा वाईट असे परिणाम सर्वांवर सारखेच होतात. असे असतानाही भारतातल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर अजूनही पर्यावरणाचे प्रश्न येऊ नयेत, हे खरोखरीच विषण्ण करणारे आहे. 

हवामानातील बदलामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. ‘मी तुम्हाला मोफत अमुक तमुक देईन’ असे म्हणण्यापेक्षा ‘मी तुमची शेती हिरवीगार राहील, याची काळजी घेईन; जेणेकरून चांगले पीक येऊन तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचा फायदा होईल’ असे आश्वासन कुणी का देत नाही? प्रदूषण कमी झाले तर आरोग्यावरचा खर्चही कमी होईल हे का सांगत नाहीत?  यंदा वसुंधरा दिनाचा जागतिक विषय ‘पृथ्वी विरूद्ध प्लास्टिक’ असा आहे. संयुक्त राष्ट्रे म्हणतात ‘गेली कित्येक दशके आपण प्लास्टिकवर अधिकाधिक अवलंबून राहत आहोत. आपण जगण्याच्या  अनेकानेक  संदर्भात प्लास्टिक वापरतो; त्यातून आपले जीवन सुकर होते. पण, प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिक कुजायला २० ते पाचशे कितीही वर्षे लागू शकतात आणि तरीही ते पूर्णपणे नष्ट होत नाही. जगात आत्तापर्यंत ८.३ अब्ज टन प्लास्टिक निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे. या साठ्यातले निम्मे गेल्या १३ वर्षात तयार झाले आहे. 

प्लास्टिकला आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि विघटन होऊ शकेल, असे काही पर्याय शोधले जात आहेत. प्लास्टिकचे सर्वाधिक प्रदूषण फॅशन उद्योग करतो. त्यावर नियंत्रण आणणारे धोरण असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत  ७५ ते १९९ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्राच्या तळाशी गेलेले आहे, असा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक मिनिटाला सुमारे दहा लाख प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. तसेच अब्जावधींच्या संख्येने प्लास्टिकच्या पिशव्या जगभर वापरल्या जातात. आपले समुद्र, तलाव आणि नद्यांमध्ये प्लास्टिकचे ढीग साठत जातील. जमिनीवरही ते साठतील. प्लास्टिक कुजते म्हणजे बारीक कणात रुपांतरित होते. आपण ते कण श्वासावाटे अन्नातून आत घेत राहू. शीतपेयांच्या बाटल्या, स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खेळणी यामध्ये बायसफिनेल वापरलेले असते. ते माणसाच्या यकृताच्या कार्यावर परिणाम करते. आधुनिक तंत्राने प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक उरतेच.

याचा अर्थ आता काहीच करता येणार नाही, असे नाही. प्लास्टिकच्या त्सुनामीने आपल्याला गिळंकृत करू नये म्हणून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. अनेक पावले आधीच उचलली गेली आहेत. उदाहरणार्थ दिल्ली महानगरपालिकेने शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत कापडाच्या पिशव्या पुरवल्या. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी त्या वापराव्यात, यासाठी या मुलांनी दुकानदारांना उद्युक्त केले. १०० मायक्रॉनच्या खाली असलेल्या प्लास्टिकच्या एकल वापरावर भारतात बंदी आहे. आसामात प्लास्टिकचा कचरा जमा करून आणून दिला तर शाळा ते शुल्क म्हणून जमा करून घेतात.अनेक धार्मिक ठिकाणी प्लास्टिकवर बंदी आहे. प्रत्येक नागरिकाने प्लास्टिकची पिशवी वापरायला नकार द्यावा, असे आवाहन आजच्या दिवशी “अर्थ डे नेटवर्क” करते आहे. पृथ्वीवर आधीच ज्याची दाटी झाली आहे, असे प्लास्टिक मी खरेदी करणार नाही, दुष्परिणाम इतरांना सांगेन, असा निर्धार प्रत्येकाने करावा.  हे वाटते तेवढे अवघड नाही... फक्त करून पाहिले पाहिजे!

अधिक माहितीसाठी : https://www.earthday.org/india/

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीEarthपृथ्वी