शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 05:51 IST

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे!

करुणा सिंग, संचालक, अर्थ डे नेटवर्क

२२ एप्रिल १९७० या दिवशी पहिला ‘वसुंधरा दिन’ साजरा झाला. आज ५४ वर्षानंतर सुमारे १९० देशांमधल्या १५ लाख लोकांशी “अर्थ डे नेटवर्क” जोडले गेलेले आहे. आपली पृथ्वी, मानव आणि सर्वच जीवमात्रांच्या आरोग्याची काळजी वाहण्याचा विचार हे लोक करतात. वसुंधरा दिन ही आता एक जागतिक चळवळ बनली आहे. लक्षावधी लोकांना या दिवशी पर्यावरणाच्या प्रश्नांवर फक्त विचार नव्हे, काहीतरी कृती करावीशी वाटते. पर्यावरण हा सर्वांवर सारखा परिणाम करणारा, सर्वांना एकत्र आणणारा विषय आहे. हवा आणि पाणी ही आपली सामायिक मालमत्ता आहे. तिचे बरे किंवा वाईट असे परिणाम सर्वांवर सारखेच होतात. असे असतानाही भारतातल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर अजूनही पर्यावरणाचे प्रश्न येऊ नयेत, हे खरोखरीच विषण्ण करणारे आहे. 

हवामानातील बदलामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. ‘मी तुम्हाला मोफत अमुक तमुक देईन’ असे म्हणण्यापेक्षा ‘मी तुमची शेती हिरवीगार राहील, याची काळजी घेईन; जेणेकरून चांगले पीक येऊन तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचा फायदा होईल’ असे आश्वासन कुणी का देत नाही? प्रदूषण कमी झाले तर आरोग्यावरचा खर्चही कमी होईल हे का सांगत नाहीत?  यंदा वसुंधरा दिनाचा जागतिक विषय ‘पृथ्वी विरूद्ध प्लास्टिक’ असा आहे. संयुक्त राष्ट्रे म्हणतात ‘गेली कित्येक दशके आपण प्लास्टिकवर अधिकाधिक अवलंबून राहत आहोत. आपण जगण्याच्या  अनेकानेक  संदर्भात प्लास्टिक वापरतो; त्यातून आपले जीवन सुकर होते. पण, प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिक कुजायला २० ते पाचशे कितीही वर्षे लागू शकतात आणि तरीही ते पूर्णपणे नष्ट होत नाही. जगात आत्तापर्यंत ८.३ अब्ज टन प्लास्टिक निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे. या साठ्यातले निम्मे गेल्या १३ वर्षात तयार झाले आहे. 

प्लास्टिकला आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि विघटन होऊ शकेल, असे काही पर्याय शोधले जात आहेत. प्लास्टिकचे सर्वाधिक प्रदूषण फॅशन उद्योग करतो. त्यावर नियंत्रण आणणारे धोरण असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत  ७५ ते १९९ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्राच्या तळाशी गेलेले आहे, असा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक मिनिटाला सुमारे दहा लाख प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. तसेच अब्जावधींच्या संख्येने प्लास्टिकच्या पिशव्या जगभर वापरल्या जातात. आपले समुद्र, तलाव आणि नद्यांमध्ये प्लास्टिकचे ढीग साठत जातील. जमिनीवरही ते साठतील. प्लास्टिक कुजते म्हणजे बारीक कणात रुपांतरित होते. आपण ते कण श्वासावाटे अन्नातून आत घेत राहू. शीतपेयांच्या बाटल्या, स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खेळणी यामध्ये बायसफिनेल वापरलेले असते. ते माणसाच्या यकृताच्या कार्यावर परिणाम करते. आधुनिक तंत्राने प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक उरतेच.

याचा अर्थ आता काहीच करता येणार नाही, असे नाही. प्लास्टिकच्या त्सुनामीने आपल्याला गिळंकृत करू नये म्हणून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. अनेक पावले आधीच उचलली गेली आहेत. उदाहरणार्थ दिल्ली महानगरपालिकेने शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत कापडाच्या पिशव्या पुरवल्या. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी त्या वापराव्यात, यासाठी या मुलांनी दुकानदारांना उद्युक्त केले. १०० मायक्रॉनच्या खाली असलेल्या प्लास्टिकच्या एकल वापरावर भारतात बंदी आहे. आसामात प्लास्टिकचा कचरा जमा करून आणून दिला तर शाळा ते शुल्क म्हणून जमा करून घेतात.अनेक धार्मिक ठिकाणी प्लास्टिकवर बंदी आहे. प्रत्येक नागरिकाने प्लास्टिकची पिशवी वापरायला नकार द्यावा, असे आवाहन आजच्या दिवशी “अर्थ डे नेटवर्क” करते आहे. पृथ्वीवर आधीच ज्याची दाटी झाली आहे, असे प्लास्टिक मी खरेदी करणार नाही, दुष्परिणाम इतरांना सांगेन, असा निर्धार प्रत्येकाने करावा.  हे वाटते तेवढे अवघड नाही... फक्त करून पाहिले पाहिजे!

अधिक माहितीसाठी : https://www.earthday.org/india/

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीEarthपृथ्वी