शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

By सुधीर लंके | Updated: May 29, 2024 07:08 IST

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

काश्मीरमध्ये फिरतानाचा ताजा अनुभव हल्ली हे सांगतो की, आता तिकडेही उन्हाळ्यात उकाडा जाणवतो. दुपारी उन्हाचे चटके बसतात. श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये फॅन, एसी चालवावा लागतो. प्रवासासाठी वातानुकूलित वाहन लागते. कारण रस्त्यांवरील धूळ आणि गर्मी नकोशी होते. बर्फाच्या नदीवर (ग्लेशियर) उभे असताना उबदार कपड्यांची गरज भासत नाही. थोडक्यात काश्मीरमधूनही थंडी पळाली आहे. 

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग संबोधले जाते. जम्मू-काश्मीर सरकारच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २७ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. एकेकाळी दहशतवादी कारवायांनी पोखरलेल्या या भूमीत पर्यटक आता न डगमगता फिरू लागले आहेत. काश्मीरची जनता आणि पर्यटक यांच्यात एक नाते होतेच. ते नाते आता आणखी खुले व बिनधास्त झाले आहे. ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा होता. यात संरक्षण व इतर काही निर्णय वगळता त्या राज्यातील विकासाचे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकार तेथील सरकारच्या संमतीशिवाय घेऊ शकत नव्हते. आता ‘३७०’ हटले. त्याचे फायदे-तोटे व त्यामागील राजकारण काय, याची चर्चा भविष्यातही झडत राहील; पण ‘३७०’शिवाय काश्मीरसमोर मोठे सामाजिक व पर्यावरणीय धोके वाढून ठेवलेले असल्याचे तेथे फिरताना जाणवते. काश्मीरात २१ डिसेंबर ते २९ जानेवारी या कालावधीत हाडे गोठविणारी थंडी असते. कारण सर्वत्र बर्फ असतो. या कालावधीला तेेथे चिल्ला-ए-कलां म्हणतात; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हल्ली डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान आढळते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

या तापमानामुळे या खोऱ्यातील हिमनद्यांचे साठे लवकर वितळतात. मैदानी प्रदेशांच्या तुलनेत येथील तापमानात १.२ अंशाने वाढ झाल्याचे अहवाल आहेत. याचे परिणाम तेथील केशरच्या उत्पादनापासून अनेक बाबींवर होत आहेत. उन्हाळा जाणवू लागला आहे. वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे हवेचे प्रदूषण आले आहे. जम्मू ते बारामुल्ला ही रेल्वेसेवा ऑगस्ट २०२३ ला खुली होणार होती; पण ती अद्याप सुरू नाही. त्यामुळे पर्यटक व लष्करी वाहनांच्या एनएच ४४ वर  अक्षरश: रांगा लागतात. जम्मू ते श्रीनगर हा चारपदरी रस्ता व श्रीनगरहून पुढे लडाखपर्यंतचा महामार्ग साकारण्यासाठी अनेक बोगदे खोदणे सुरू आहे. त्यासाठी काश्मिरी पहाडांचे अक्षरश: लचके तोडले गेले आहेत. झाडांची साल सोलावी तसे डोंगर खरवडलेले दिसतात. यातून भविष्यात लॅण्ड स्लाईडिंगचे मोठे धोके दिसतात. 

मोठमोठे डोंगर खोदल्याने धुळीचे लोटच्या लोट पर्यटकांच्या आणि तेथील गावांच्याही अंगावर येताहेत.  या महामार्गामुळे पूर्वीची डोंगराच्या कुशीतील छोटी नागमोडी वळणे व सभोवतालची गावे हे सौंदर्य संपले अन् निरस, धोपट निव्वळ रस्ता तो उरला. महामार्गाने गावेच गिळून टाकली. औद्योगिक युनिटसाठी ५ हजार ३२७ भूखंड मागणीचे प्रस्ताव या प्रदेशात आले आहेत. त्यामुळे काश्मीरने नैसर्गिकपणे जपलेल्या येथील भूखंडांचे काय होणार? हा गंभीर प्रश्न आहे.

ऊर्जानिर्मितीसाठी या खोऱ्यात मुबलक पाणी असताना काश्मिरात वीजटंचाई आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाही प्रमुख मुद्दा होता. रोजगारासाठी पहाडांवर घोडे घेऊन पर्यटकांना फिरविणारे, स्लेज राइडसाठी पर्यटकांचे ओझे ओढत त्यांना बर्फील्या पहाडांवर नेणारे अनेक तरुण व बुजुर्ग येथे भेटतात. यातून या प्रदेशाची रोजगाराची गरज जाणवते. एकीकडे दऱ्याखोऱ्यांत फिरणारे मेंढपाळ काश्मिरी पहाडांवर लाकूड व मातीपासून बनविलेल्या नैसर्गिक घरांत राहतात. दुसरीकडे पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्याठी काँक्रीटच्या चारपदरी रस्त्यांची  धोरणे आहेत. एकीकडे चिनार. दुसरीकडे बोेगदे. ३७० पेक्षाही काश्मीरमधील हा झगडा मोठा वाटतो. निसर्ग आणि विकास, प्रदेशाची अस्मिता आणि राष्ट्रीय धोरणे असा हा झगडा आहे. काश्मीर स्वर्ग आहेच; पण विकासासाठीची नवी धोरणे तिथले स्वर्गीय सौंदर्य टिकू देतील का?

सुधीर लंके (sudhir.lanke@lokmat.com)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर