शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

By सुधीर लंके | Updated: May 29, 2024 07:08 IST

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

काश्मीरमध्ये फिरतानाचा ताजा अनुभव हल्ली हे सांगतो की, आता तिकडेही उन्हाळ्यात उकाडा जाणवतो. दुपारी उन्हाचे चटके बसतात. श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये फॅन, एसी चालवावा लागतो. प्रवासासाठी वातानुकूलित वाहन लागते. कारण रस्त्यांवरील धूळ आणि गर्मी नकोशी होते. बर्फाच्या नदीवर (ग्लेशियर) उभे असताना उबदार कपड्यांची गरज भासत नाही. थोडक्यात काश्मीरमधूनही थंडी पळाली आहे. 

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग संबोधले जाते. जम्मू-काश्मीर सरकारच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २७ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. एकेकाळी दहशतवादी कारवायांनी पोखरलेल्या या भूमीत पर्यटक आता न डगमगता फिरू लागले आहेत. काश्मीरची जनता आणि पर्यटक यांच्यात एक नाते होतेच. ते नाते आता आणखी खुले व बिनधास्त झाले आहे. ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा होता. यात संरक्षण व इतर काही निर्णय वगळता त्या राज्यातील विकासाचे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकार तेथील सरकारच्या संमतीशिवाय घेऊ शकत नव्हते. आता ‘३७०’ हटले. त्याचे फायदे-तोटे व त्यामागील राजकारण काय, याची चर्चा भविष्यातही झडत राहील; पण ‘३७०’शिवाय काश्मीरसमोर मोठे सामाजिक व पर्यावरणीय धोके वाढून ठेवलेले असल्याचे तेथे फिरताना जाणवते. काश्मीरात २१ डिसेंबर ते २९ जानेवारी या कालावधीत हाडे गोठविणारी थंडी असते. कारण सर्वत्र बर्फ असतो. या कालावधीला तेेथे चिल्ला-ए-कलां म्हणतात; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हल्ली डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान आढळते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

या तापमानामुळे या खोऱ्यातील हिमनद्यांचे साठे लवकर वितळतात. मैदानी प्रदेशांच्या तुलनेत येथील तापमानात १.२ अंशाने वाढ झाल्याचे अहवाल आहेत. याचे परिणाम तेथील केशरच्या उत्पादनापासून अनेक बाबींवर होत आहेत. उन्हाळा जाणवू लागला आहे. वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे हवेचे प्रदूषण आले आहे. जम्मू ते बारामुल्ला ही रेल्वेसेवा ऑगस्ट २०२३ ला खुली होणार होती; पण ती अद्याप सुरू नाही. त्यामुळे पर्यटक व लष्करी वाहनांच्या एनएच ४४ वर  अक्षरश: रांगा लागतात. जम्मू ते श्रीनगर हा चारपदरी रस्ता व श्रीनगरहून पुढे लडाखपर्यंतचा महामार्ग साकारण्यासाठी अनेक बोगदे खोदणे सुरू आहे. त्यासाठी काश्मिरी पहाडांचे अक्षरश: लचके तोडले गेले आहेत. झाडांची साल सोलावी तसे डोंगर खरवडलेले दिसतात. यातून भविष्यात लॅण्ड स्लाईडिंगचे मोठे धोके दिसतात. 

मोठमोठे डोंगर खोदल्याने धुळीचे लोटच्या लोट पर्यटकांच्या आणि तेथील गावांच्याही अंगावर येताहेत.  या महामार्गामुळे पूर्वीची डोंगराच्या कुशीतील छोटी नागमोडी वळणे व सभोवतालची गावे हे सौंदर्य संपले अन् निरस, धोपट निव्वळ रस्ता तो उरला. महामार्गाने गावेच गिळून टाकली. औद्योगिक युनिटसाठी ५ हजार ३२७ भूखंड मागणीचे प्रस्ताव या प्रदेशात आले आहेत. त्यामुळे काश्मीरने नैसर्गिकपणे जपलेल्या येथील भूखंडांचे काय होणार? हा गंभीर प्रश्न आहे.

ऊर्जानिर्मितीसाठी या खोऱ्यात मुबलक पाणी असताना काश्मिरात वीजटंचाई आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाही प्रमुख मुद्दा होता. रोजगारासाठी पहाडांवर घोडे घेऊन पर्यटकांना फिरविणारे, स्लेज राइडसाठी पर्यटकांचे ओझे ओढत त्यांना बर्फील्या पहाडांवर नेणारे अनेक तरुण व बुजुर्ग येथे भेटतात. यातून या प्रदेशाची रोजगाराची गरज जाणवते. एकीकडे दऱ्याखोऱ्यांत फिरणारे मेंढपाळ काश्मिरी पहाडांवर लाकूड व मातीपासून बनविलेल्या नैसर्गिक घरांत राहतात. दुसरीकडे पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्याठी काँक्रीटच्या चारपदरी रस्त्यांची  धोरणे आहेत. एकीकडे चिनार. दुसरीकडे बोेगदे. ३७० पेक्षाही काश्मीरमधील हा झगडा मोठा वाटतो. निसर्ग आणि विकास, प्रदेशाची अस्मिता आणि राष्ट्रीय धोरणे असा हा झगडा आहे. काश्मीर स्वर्ग आहेच; पण विकासासाठीची नवी धोरणे तिथले स्वर्गीय सौंदर्य टिकू देतील का?

सुधीर लंके (sudhir.lanke@lokmat.com)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर