शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

By सुधीर लंके | Updated: May 29, 2024 07:08 IST

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

काश्मीरमध्ये फिरतानाचा ताजा अनुभव हल्ली हे सांगतो की, आता तिकडेही उन्हाळ्यात उकाडा जाणवतो. दुपारी उन्हाचे चटके बसतात. श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये फॅन, एसी चालवावा लागतो. प्रवासासाठी वातानुकूलित वाहन लागते. कारण रस्त्यांवरील धूळ आणि गर्मी नकोशी होते. बर्फाच्या नदीवर (ग्लेशियर) उभे असताना उबदार कपड्यांची गरज भासत नाही. थोडक्यात काश्मीरमधूनही थंडी पळाली आहे. 

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग संबोधले जाते. जम्मू-काश्मीर सरकारच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २७ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. एकेकाळी दहशतवादी कारवायांनी पोखरलेल्या या भूमीत पर्यटक आता न डगमगता फिरू लागले आहेत. काश्मीरची जनता आणि पर्यटक यांच्यात एक नाते होतेच. ते नाते आता आणखी खुले व बिनधास्त झाले आहे. ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा होता. यात संरक्षण व इतर काही निर्णय वगळता त्या राज्यातील विकासाचे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकार तेथील सरकारच्या संमतीशिवाय घेऊ शकत नव्हते. आता ‘३७०’ हटले. त्याचे फायदे-तोटे व त्यामागील राजकारण काय, याची चर्चा भविष्यातही झडत राहील; पण ‘३७०’शिवाय काश्मीरसमोर मोठे सामाजिक व पर्यावरणीय धोके वाढून ठेवलेले असल्याचे तेथे फिरताना जाणवते. काश्मीरात २१ डिसेंबर ते २९ जानेवारी या कालावधीत हाडे गोठविणारी थंडी असते. कारण सर्वत्र बर्फ असतो. या कालावधीला तेेथे चिल्ला-ए-कलां म्हणतात; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हल्ली डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान आढळते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

या तापमानामुळे या खोऱ्यातील हिमनद्यांचे साठे लवकर वितळतात. मैदानी प्रदेशांच्या तुलनेत येथील तापमानात १.२ अंशाने वाढ झाल्याचे अहवाल आहेत. याचे परिणाम तेथील केशरच्या उत्पादनापासून अनेक बाबींवर होत आहेत. उन्हाळा जाणवू लागला आहे. वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे हवेचे प्रदूषण आले आहे. जम्मू ते बारामुल्ला ही रेल्वेसेवा ऑगस्ट २०२३ ला खुली होणार होती; पण ती अद्याप सुरू नाही. त्यामुळे पर्यटक व लष्करी वाहनांच्या एनएच ४४ वर  अक्षरश: रांगा लागतात. जम्मू ते श्रीनगर हा चारपदरी रस्ता व श्रीनगरहून पुढे लडाखपर्यंतचा महामार्ग साकारण्यासाठी अनेक बोगदे खोदणे सुरू आहे. त्यासाठी काश्मिरी पहाडांचे अक्षरश: लचके तोडले गेले आहेत. झाडांची साल सोलावी तसे डोंगर खरवडलेले दिसतात. यातून भविष्यात लॅण्ड स्लाईडिंगचे मोठे धोके दिसतात. 

मोठमोठे डोंगर खोदल्याने धुळीचे लोटच्या लोट पर्यटकांच्या आणि तेथील गावांच्याही अंगावर येताहेत.  या महामार्गामुळे पूर्वीची डोंगराच्या कुशीतील छोटी नागमोडी वळणे व सभोवतालची गावे हे सौंदर्य संपले अन् निरस, धोपट निव्वळ रस्ता तो उरला. महामार्गाने गावेच गिळून टाकली. औद्योगिक युनिटसाठी ५ हजार ३२७ भूखंड मागणीचे प्रस्ताव या प्रदेशात आले आहेत. त्यामुळे काश्मीरने नैसर्गिकपणे जपलेल्या येथील भूखंडांचे काय होणार? हा गंभीर प्रश्न आहे.

ऊर्जानिर्मितीसाठी या खोऱ्यात मुबलक पाणी असताना काश्मिरात वीजटंचाई आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाही प्रमुख मुद्दा होता. रोजगारासाठी पहाडांवर घोडे घेऊन पर्यटकांना फिरविणारे, स्लेज राइडसाठी पर्यटकांचे ओझे ओढत त्यांना बर्फील्या पहाडांवर नेणारे अनेक तरुण व बुजुर्ग येथे भेटतात. यातून या प्रदेशाची रोजगाराची गरज जाणवते. एकीकडे दऱ्याखोऱ्यांत फिरणारे मेंढपाळ काश्मिरी पहाडांवर लाकूड व मातीपासून बनविलेल्या नैसर्गिक घरांत राहतात. दुसरीकडे पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्याठी काँक्रीटच्या चारपदरी रस्त्यांची  धोरणे आहेत. एकीकडे चिनार. दुसरीकडे बोेगदे. ३७० पेक्षाही काश्मीरमधील हा झगडा मोठा वाटतो. निसर्ग आणि विकास, प्रदेशाची अस्मिता आणि राष्ट्रीय धोरणे असा हा झगडा आहे. काश्मीर स्वर्ग आहेच; पण विकासासाठीची नवी धोरणे तिथले स्वर्गीय सौंदर्य टिकू देतील का?

सुधीर लंके (sudhir.lanke@lokmat.com)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर