शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 06:14 IST

कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करून थकलेल्या भारताने आता त्याची मानगूट पकडली आहे. त्याला किती रट्टे द्यावे, याचा निर्णय भारताला घ्यावा लागेल.

रवि टाले कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) तीन माजी महासचिव बुट्रोस बुट्रोस-घाली, कोफी अन्नान व बान की-मून, नुकतेच निवर्तलेले पोप फ्रान्सिस, तसेच इतरही बऱ्याच बड्या व्यक्तींनी यापुढील लढाया पाण्यासाठी होतील, असे इशारे वारंवार दिले आहेत. पहलगाम येथे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करारातून काढून घेतलेले अंग आणि त्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी दिलेल्या रक्तपाताच्या धमक्या, यामुळे ते इशारे खरे ठरण्याची घटिका समीप येऊन ठेपल्याचे वाटू लागले आहे.

सिंधू जल वाटप करार १९६० मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली झाला होता आणि त्यानंतर तीन भारत-पाकिस्तान युद्धे होऊनही अबाधित राहिला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने करार ‘निलंबित’ केल्याचे घोषित केले. दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, अशी घोषणाही झाली. त्यामुळे आता भारत करारातून बाहेर पडण्याची अंमलबजावणी नेमकी कशी करू शकेल आणि पाकिस्तानची प्रतिक्रिया काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी थांबवणे तातडीने शक्य नाही. त्यासाठी काही वर्षे तरी लागतील; पण पाकिस्तानला चटके जाणवण्यासाठी तेवढा वेळ लागणार नाही. सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांपैकी, भारताचा शंभर टक्के हक्क असलेल्या पूर्वेकडील रावी, बियास व सतलज या तीन नद्यांचे संपूर्ण पाणी भारताने अद्यापही अडवलेले नाही. त्यावर भारत वेगाने काम करू शकतो.  पाकिस्तानच्या वाट्याला गेलेल्या पश्चिमेकडील सिंधू, झेलम व चिनाब या तीन नद्यांवर, करारात मुभा असल्याने जलविद्युत प्रकल्पांसाठी उभारलेल्या धरणांमधून होणारा विसर्ग भारत तातडीने  थांबवू शकतो, तसेच अशा धरणांची साठवणूक क्षमता वाढवू शकतो. शिवाय सहाही नद्यांवर नव्याने धरणे बांधण्याचा, कालवे, बोगदे बांधून पाणी वळवण्याचा पर्याय आहेच! पाकिस्तानला पाणी न देण्याच्या निर्णयावर भारत ठाम राहिल्यास, यापैकी काही उपायांचे परिणाम तातडीने, काहींचे थोड्या अवधीनंतर, तर काहींचे दीर्घकाळाने दिसतील. काही जाणकारांच्या मते मात्र, भारताने या दिशेने २०१६ मधील उरी हल्ल्यानंतरच काम सुरू केले होते आणि त्यामुळे ठरवलेच, तर पाणी थांबवायला फार वेळ लागणार नाही.  पंतप्रधान मोदींनी, पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही, अशा आशयाचे विधान केले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

भारताच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे  पाकिस्तानने हादरणे स्वाभाविक आहे; कारण त्या देशाची  पाण्याची ८० टक्के गरज सिंधू नदी भागवते. भारताने पाणी थांबवल्यास त्या देशात  हाहाकार उडेल! रक्ताचे पाट वाहतील, अशा वल्गना करणे सोपे, ते प्रत्यक्षात आणणे सर्वार्थाने अपयशी, अर्थव्यवस्था गाळात गेलेल्या पाकिस्तानसाठी कर्मकठीणच! त्यामुळे युद्ध पुकारणे हा पाकिस्तानसाठी सगळ्यात शेवटचा उपाय असेल. पाकिस्तान सर्वप्रथम हेलसिंकी रुल्स (१९६६), यूएन वॉटरकोर्सेस कॉन्व्हेंशन (१९९७) आणि बर्लिन रुल्स (२००४)चा आधार घेऊन जागतिक बँक, यूएनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि अमेरिका, चीनसारख्या महासत्तांकडे जाऊन रडगाणे गाईल; पण त्यातून फार काही साध्य होईल, असे दिसत नाही.

जागतिक बँक जास्तीत जास्त भारताला पाकिस्तानसोबत वाटाघाटी सुरू करण्याची विनंती करू शकते. भारतावर  वित्तीय दबाव निर्माण करू शकते किंवा वाद त्रयस्थ मध्यस्थ वा सिंधू करारातील तरतुदीनुसार ‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’कडे सोपवू शकते. यूएनदेखील भारत व पाकिस्तानला वाटाघाटींच्या माध्यमातून तोडगा काढण्यास सांगू शकते, आंतरराष्ट्रीय जलमार्गांच्या नौवहनाशिवाय इतर उपयोगांसंबंधीचा संयुक्त राष्ट्रांचा करार (१९९७) अंतर्गत वाद सोडवण्याची सूचना करू शकते; पण भारतावर सिंधू कराराचे पालन करण्याची बळजबरी करू शकत नाही. पाकिस्तानने हा मुद्दा यूएन सुरक्षा परिषदेत नेल्यास चीन सोडून कोणताही कायम सदस्य भारताच्या बाजूने  नकाराधिकाराचा वापर करू शकतो आणि सुरक्षा परिषदेतील एकमताशिवाय यूएन भारतावर कोणतेही निर्बंध लादू शकत नाही किंवा लष्करी कारवाई करू शकत नाही.

सध्याच्या घडीला अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स यापैकी कोणीही भारताच्या विरोधात जाईल, असे दिसत नाही. अर्थात दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांतील वाद एका मर्यादेपेक्षा वाढू नये, यासाठी ते भारतावर पडद्याआडून दबाव आणतील. पाकिस्तानचा सदाबहार मित्र चीन मात्र स्वत:चे हितसंबंध लक्षात घेऊन पाकिस्तानला नक्कीच सर्वतोपरी मदत करेल. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहात हस्तक्षेप करण्याची धमकी देण्यापर्यंतही चीनची मजल जाऊ शकते. शिवाय सिंधू आणि सतलज या दोन नद्या चीनचा स्वायत्त प्रांत तिबेटमध्ये उगम पावतात, हेदेखील ध्यानात घ्यायला हवे. भारताला कोंडीत पकडण्याची  ही आयती संधी चीन नक्कीच दवडणार नाही.

कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करून थकलेल्या भारताने आता त्याची मानगूट तर पकडली आहे. आता त्याला किती रट्टे मारायचे अन् सोडायचे, याचा निर्णयही भारतालाच घ्यावा लागणार आहे.