शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:53 IST

संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नरमहाराष्ट्रीयन समाजमनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन समाजमनाची मशागत समताधिष्ठित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. बाराव्या-तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन समाजाची एक निकड म्हणून  उदयास आले. पूर्वांपार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अज्ञानाने अंधारलेल्या समाजमनाला ज्ञानाच्या उजेडात योग्य वाटा दाखविण्याची किमया संतांनी केली.  

कर्मकांडे, जातीय, धार्मिक कट्टरतेचे स्तोम माजलेले होते, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या टाचेखाली समाज रगडला जात होता; त्याच काळात परकीय आक्रमकांनी आपली मुळे इथे रुजवायला सुरुवात केली होती. म्हणजे परकीयांचा सत्तालोलूप मस्तवालपणा आणि स्थानिक वर्चस्ववाद्यांची मग्रुरी यात समाज भरडला जात होता. त्यावेळी संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली. वारकरी संतांनी उभी केलेली ही भागवत धर्माची भक्कम इमारत आज सातशे वर्षे उभी आहे. पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या या खेळात सर्वच इतके रंगून गेले की, सर्व भेद आपोआप गळून पडले. किंबहुना त्यासाठीच हा जात-धर्मविरहित भागवत धर्माचा खेळ मांडलेला आहे.

कोणतेही अवघड कर्मकांड नाही, कोणतेही बाह्य उपचार नाहीत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीळा लावला की, अन्य कोणताही देखावा करावा लागत नाही. टाळ-मृदंगाच्या तालावर आपोआपच आनंदाचा कल्लोळ निर्माण होतो. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, स्री-पुरुष हे सर्व भेद गळून पडतात. एरवी आपल्या उपाधीच्या श्रेष्ठत्वाचा डोलारा घेऊन मिरवणारे पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या खेळात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या या सर्व उपाध्या गळून पडतात आणि उरते ते केवळ निखळ माणूसपण! 

निर्मळ मनाने उचनीचतेचा गढूळपणा मागे सारुन स्वच्छ समाज निर्मितीची वाट संत चळवळीने मोकळी केली. अवघड दुस्तर वाटा मोडून टाकून भक्तीपंथ बहुसोपा केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022