शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:53 IST

संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नरमहाराष्ट्रीयन समाजमनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन समाजमनाची मशागत समताधिष्ठित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. बाराव्या-तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन समाजाची एक निकड म्हणून  उदयास आले. पूर्वांपार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अज्ञानाने अंधारलेल्या समाजमनाला ज्ञानाच्या उजेडात योग्य वाटा दाखविण्याची किमया संतांनी केली.  

कर्मकांडे, जातीय, धार्मिक कट्टरतेचे स्तोम माजलेले होते, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या टाचेखाली समाज रगडला जात होता; त्याच काळात परकीय आक्रमकांनी आपली मुळे इथे रुजवायला सुरुवात केली होती. म्हणजे परकीयांचा सत्तालोलूप मस्तवालपणा आणि स्थानिक वर्चस्ववाद्यांची मग्रुरी यात समाज भरडला जात होता. त्यावेळी संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली. वारकरी संतांनी उभी केलेली ही भागवत धर्माची भक्कम इमारत आज सातशे वर्षे उभी आहे. पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या या खेळात सर्वच इतके रंगून गेले की, सर्व भेद आपोआप गळून पडले. किंबहुना त्यासाठीच हा जात-धर्मविरहित भागवत धर्माचा खेळ मांडलेला आहे.

कोणतेही अवघड कर्मकांड नाही, कोणतेही बाह्य उपचार नाहीत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीळा लावला की, अन्य कोणताही देखावा करावा लागत नाही. टाळ-मृदंगाच्या तालावर आपोआपच आनंदाचा कल्लोळ निर्माण होतो. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, स्री-पुरुष हे सर्व भेद गळून पडतात. एरवी आपल्या उपाधीच्या श्रेष्ठत्वाचा डोलारा घेऊन मिरवणारे पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या खेळात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या या सर्व उपाध्या गळून पडतात आणि उरते ते केवळ निखळ माणूसपण! 

निर्मळ मनाने उचनीचतेचा गढूळपणा मागे सारुन स्वच्छ समाज निर्मितीची वाट संत चळवळीने मोकळी केली. अवघड दुस्तर वाटा मोडून टाकून भक्तीपंथ बहुसोपा केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022