शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:05 IST

सध्या भोंगे प्रकरणावरून अख्ख्या राज्यात अस्वस्थता पसरली आहे. त्याचे साधे उत्तर नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यातील बारड या गावाने शोधले, त्या गावाची कहाणी!

राजेश निस्ताने,वृत्तसंपादक, लोकमत, नांदेड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भाेंग्यांबाबत उघड आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातच नव्हे तर देशभर भाेंगे बंदीचे वादळ उठले आहे.  यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. या सर्व गाेंधळात नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव मात्र शांत आहे. कारण या गावाने आधीच अंमलात आणलेला भाेंगे बंदीचा निर्णय! गावातील एकाेप्याचा आणि जातीय सलाेख्याचा हा उपक्रम चार वर्षांपूर्वी सुरू झाला व आजतागायत ताे टिकून आहे. गावकऱ्यांच्या एकीमुळे भविष्यातही ताे टिकून राहील, यात शंका नाही.वीसेक हजार लाेकवस्तीच्या बारड गावात १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे.  गावात १२ मंदिरे, एक मशीद, एक जैन मंदिर, दाेन बुद्ध विहार आहेत. त्या सर्वच ठिकाणी भाेंगे लावले गेले हाेते. वेळीअवेळी ते वाजत. एवढेच नव्हे तर ‘काेणाचा आवाज माेठा’ यावरून जणू विविध समाजात स्पर्धाच लागली हाेती. त्यातून जातीय तणाव निर्माण हाेण्याची चिन्हे दिसू लागली. या ध्वनी प्रदूषणाचा त्रास  सर्वांनाच हाेत हाेता.सन २०१८ मध्ये तत्कालीन सरपंच जयश्री विलास देशमुख, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा देशमुख आदींनी या भाेंगे बंदीबाबतचा विचार  गावातील प्रतिष्ठित, सर्वच जातीधर्माच्या प्रमुख व्यक्तींसमोर ठेवला.  बैठका घेतल्या. गाव गुण्यागाेविंदाने नांदावे, यासाठी भाेंगे बंदीवर विविध गटांमध्ये एकमत झाले.  ३० जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत गाव भाेंगेमुक्त करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला गेला. या गावात आता धार्मिक स्थळांवरच नव्हे, तर कुठेही जाहीर भाेंगे वाजविण्यास मनाई आहे. एवढेच काय लग्न वरात, सण-समारंभातही भाेंगे लावण्याची परवानगी नाही. निवडणूक प्रचाराच्यावेळी सुद्धा गावात भाेंगा लावलेले वाहन फिरू दिले जात नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या जाहीर सभा सुद्धा विनाभाेंग्याच्या पार पडल्या.

भाेंगे बंदीची ही अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून काटेकाेरपणे सुरू आहे. गावात ५० लाेक एखाद्या कार्यक्रमात असतील तर तेवढ्याच लाेकांना आवाज जाईल, इतरांना त्रास हाेणार नाही, असा छाेटा स्पीकर बाॅक्स लावून काम भागविले जाते.  शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या या गावात इसापूर धरणाचे पाणी  असल्याने बारमाही व बागायती शेती केली जाते. रस्ते, पाणी, वीज व इतर सुविधा गावात उपलब्ध आहेत. हागणदारीमुक्त  गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचा सात लाखांचा पुरस्कारही मिळाला आहे. गावातील विकासाचे व इतरही लाेकहिताचे बहुतांश निर्णय आजही सर्वसंमतीने घेतले जातात.

गावात विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या विचारधारेचे लाेक आहेत. परंतु या राजकारणाचा गावातील एकाेपा आणि सलाेख्यावर काेणताच परिणाम हाेणार नाही, याची खास काळजी प्रत्येकाकडूनच घेतली जाते. गावातील वाद गावातच मिटविण्यावर जाेर असताे. त्यामुळेच सण-उत्सवात पाेलिसांना या गावाच्या बंदाेबस्ताकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही. बारडचे पाेलीस पाटील यशवंत लाेमटे सांगतात, गावातील सर्व जातीधर्माच्या लाेकांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ही  भाेंगे बंदीच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब. त्यामुळेच या गावात गेल्या कित्येक वर्षात कधीही पाेलीस बंदाेबस्त मागवावा लागलेला नाही. बारडचे सरपंच प्रभाकर आठवले आहेत.

उपसरपंच बाळासाहेब देशमुख सांगत होते. भाेंगेमुक्तीच्या निर्णयाची फळं आम्ही आज चाखत आहाेत. गावात सर्वत्र शांतता नांदते. जे आम्ही केले, ते इतर गावांनाही सहज जमू शकेल. बारड गावाच्या भाेंगे मुक्तीच्या निर्णयापासून प्रेरणा घेऊन लगतच्या निवघा बाजार (ता. मुदखेड) या गावाने आपल्या गावात सर्व प्रकारच्या मिरवणुका, लग्न वराती यावर बंदी घातली आहे. गावकऱ्यांचे सामंजस्य आणि एकजुटीचे हे उदाहरण आत्ताच्या वातावरणात दिलासा वाटावा, असेच आहे! rajesh.nistane@lokmat.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र