शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:27 AM

१९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर १९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे. स्मार्टफोनमधील सोशल संवादमाध्यमे, टीव्ही/वृत्तपत्रे इ. पेक्षा सहज प्राप्त होणारी, कमी खर्चाची आणि हाताळायला सोपी असल्याने, जगभरातील अधिकाधिक स्मार्टफोनधारक बातम्या मिळविण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडियाचा राजकारण आणि राजकारण्यांशी दररोजचाच संबंध असला, तरी निवडणुका जाहीर झाल्या की, त्याचा खरा चेहरा आणि परिणाम जाणवतो. सतत बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही.सोशल मीडिया हाताळणारी कोणीही व्यक्ती जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसून काहीही पोस्ट लिहून फक्त काही मिनिटांतच जगप्रसिद्ध होऊ शकते... या माध्यमातून फार लवकर आपलेपण साधता येते; तितकीच पटकन कटुतादेखील हे माध्यम निर्माण करू शकते. हे माध्यम जेवढे ज्ञान देते, तेवढेच अज्ञान पेरते. या माध्यमाने माणसांचे आपलेपण तपासण्याची नवी पद्धत जन्माला घातलेली आहे. पूर्वी गाव, तालुका, जिल्हा किंवा जातीवरून स्नेहबंध लावण्याचा प्रयत्न केला जात होता. आता फेसबुकच्या म्युच्युअल फ्रेंडलिस्टवरून नातीगोती ठरतात. समज अन गैरसमज शीघ्र गतीने वाढविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. कुठल्याही संस्थेचे वा सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसलेले हे माध्यम आहे. एका बाजूने हे माध्यम व्यक्तिगत आहे आणि समूहाचेही आहे. दुसºया बाजूने नियंत्रणअभावी हे माध्यम कुणाचेच नाही. त्यामुळेच या माध्यमाची विश्वासार्हता संशयास्पद आहे .हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी सोपे सुटसुटीत आहे. कुठेही बसून फोन वा तत्सम उपकरणाद्वारे या माध्यमामुळे नेता अन् कार्यकर्ता यात संवाद घडू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र अन फॉलोअर्स ही आजच्या नेत्याची राजकीय शक्ती मोजण्याचे एक नवीन साधन झाले आहे. या माध्यमावर बरेचदा अनेक लोक एकमेकांशी एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेले असतात. त्यामुळे हे माध्यम माणसांना संख्यात्मक बाजूने एकत्र करत असले, तरी त्यात सत्यता मात्र फारशी नाही. हे माध्यम कल निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहे, पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी कलही निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमाने जन्माला घातलेले अन् वाढविलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्वासार्हता ही संशयास्पद असते.आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वर्तमानात रमते. तिला इतिहास महत्त्वाचा वाटत नाही. कारण वर्तमान आपल्या हातात असतो. इतिहास नाकारणाºया काळाचे आव्हान आपल्या समोर आहे. ते आव्हान वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. तरुण पिढी हे सर्व राजकीय पक्षाचे मोठे लक्ष्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येऊन आपला चाहता वर्ग तयार करण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू असतो़ हे माध्यम गतिशील असल्याने, त्याची परिणामकारकता तितकीच गतिशील आहे. ज्या गतीने ते एखाद्याला उंचीवर घेऊन जाते, त्याहून जास्त गतीने खालीही खेचते. निवडणुकांच्या आधी आणि निकाल जाहीर होण्यापूर्वी सोशल मीडियावरील बातम्यांना (आणि अफवांना) फारच महत्त्व प्राप्त होते. आजच्या राजकारणाचा गाभा अन आवाका घडविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. सोशल मीडिया हे जागतिकीकरणानंतरच्या सध्याच्या गतिमान युगाचे प्रतिबिंब आहे.(संगणक साक्षरता प्रसारक)

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया