शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:09 IST

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते.

अ. पां. देशपांडेपाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते. नंतर लाहोरच्या सरकारी कॉलेजातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, पण दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेकांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले. यश पाल हे त्यातील एक. मग त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पुरे केले दिल्ली विद्यापीठात. १९४९ मध्ये यश पाल मुंबईला नुकत्याच सुरू झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च अर्थात टीआयएफआरमध्ये आले. यशपाल यांनी प्रा. पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) काम केले. विश्वकिरण वातावरणात कसे प्रवास करतात, यावर त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. १९५४ साली यशपाल मेसेचूसेटस येथील एमआयटीमध्ये पीएच.डी. करायला गेले. यश पाल यांना संगीताची आवड होती. त्यांनी एकदा एमआयटीमध्ये रविशंकर यांच्या सतारवादनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. पीएच.डी. करून यश पाल १९५८ मध्ये परत टीआयएफआरला आले.टीआयएफआरला यश पाल असतानाच प्रा. भा. मा. उदगावकर आणि प्रा. वि. गो. कुलकर्णी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नात प्रा. यश पालही होते. ते या शालेय मुलांना शिकवत. गरीब मुलांचे शिक्षण चांगले व्हावे याची कळकळ त्यांनाही प्रा. उदगावकर व कुलकर्णी यांच्या एवढीच प्रकर्षाने होती. नंतर १९७३ मध्ये यश पाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लीकेशन सेंटरमध्ये दाखल झाले. यश पाल यांच्या गटाला सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट (साईट) कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती. याद्वारे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सॅटेलाईटद्वारा करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी लागणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुठे बाजारात मिळत नसत. वर्ष-दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने ती विकसित केली होती. त्यामुळेच ही उपकरणे शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवा, अशी मागणी त्या त्या खात्यातील लोक यशपालांकडे करत. यश पाल यांचा त्याला विरोध होता. ते म्हणत, अमेरिकेने काय केले? त्यांच्या वेळी जगात ती कोणालाही माहीत नव्हते. आता ती अमेरिकनांना माहीत आहेत. मग तुम्ही स्वत: ती विकसित का करत नाही? मी नाही कुणाला अमेरिकेत पाठवणार. असे करून त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना ती उपकरणे येथे भारतात विकसित करायला लावली. त्यामुळे या वैज्ञानिकांमध्ये आत्मविश्वास प्रफुल्लित केला. यश पाल सोबत काम करणाºया लोकांबरोबर चर्चा करून त्यांना सतत नवनवीन कल्पना देत. नावीन्यपूर्ण कामासाठी उद्युक्त करत. साईट कार्यक्रमाच्या वेळी ते नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान समजावून देत. अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी होती. यामुळेच ते या संस्थेचे काही वर्षे अध्यक्षही झाले होते. ते मोठ्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांतही चांगले रमत. त्यांना हिंदी बोलण्याची विलक्षण हौस होती. पॅशन म्हणा. त्यामुळे ते इंग्रजीत बोलत असताना कधी हिंदीत शिरतील हे त्यांनाही समजत नसेल, इतकी ती भाषा त्यांच्या रक्तात भिनली होती.१९८१ पासून दोन वर्षे प्रा. यश पाल युनेस्कोमध्ये गेले व यूएन कॉन्फरन्स आॅन आऊटर स्पेससाठी प्रमुख बनले. नंतर ते नियोजन आयोगात प्रमुख सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सेक्रेटरी झाले. तेथून ते बाहेर पडून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी भारतभर चार आंतरविद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. डॉ. जयंत नारळीकरांची आयुका ही त्यातलीच एक संस्था. त्याच वेळी विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने भारत जन विज्ञान जाथा या नावाचा एक भारतव्यापी कार्यक्रम आखला होता व त्यांना त्याचे अध्यक्ष केले होते. या विज्ञान प्रसाराच्या कार्यक्रमात ते पुरते रमले. त्यांना इतक्या विषयात रस होता की ती यादी संपायची नाही. भौतिक शास्त्रज्ञ स्ट्रिंग थिअरीबद्दल बोलत असो, गाववाले लोक दुष्काळ, पूर, वाया गेलेले पीक, बालविवाहाचा विषय असो की सतीची चाल असो किंवा एखाद्या नाटकाची चर्चा, शालेय विद्यार्थी त्यांच्या एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलत असू देत, समाजविज्ञान शास्त्रज्ञ एखाद्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार करत असू देत की आणखी काही, यश पाल त्या त्या लोकांना काही तरी न सुचलेले सांगून त्यांच्यात एक चैतन्य निर्माण करत असत. यश पाल यांची एक समिती मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी होती. दूरदर्शनच्या टर्निंग पॉर्इंटमधील अथवा खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळची त्यांची कॉमेंट्री कोण विसरेल? ते गेले. पण त्यांच्याबद्दलच्या अशा अनंत आठवणी मनामनात आहेत. त्यामुळेच कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानात इतका रमलेला खेळीया परत होणे नाही.(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि प्रसिद्ध विज्ञान प्रसारक आहेत.)