शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आरटीई प्रवेशाला मुदतवाढ मिळाली; बहिष्काराचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 17:18 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. गेल्या सात वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

- धर्मराज हल्लाळे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. गेल्या सात वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात हजारांवर विद्यार्थ्यांना न्याय मिळू लागला. परंतु, कायद्यानुसार प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा परतावा संबंधित संस्थांना देण्यात शासन कमी पडले आहे. २०१५-१६ पासून अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांचे कोट्यवधी रूपयांचे येणे थकले आहे. परिणामी, लातूर, औरंगाबाद येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणाºया संस्थाचालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. लातूरमध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात ३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश मोफत होऊ शकतील.एकंदर, तत्कालीन सरकारने विद्यार्थी हिताचा कायदा करून सामान्य कुटुंबातील मुलांना मोठ्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचा मार्ग सुकर केला. संपूर्ण कायदा आणि त्यातील तरतुदी कल्याणकारी आहेत. ज्यामुळे दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना इंग्रजी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळणे शक्य झाले. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग ही प्रक्रिया दरवर्षी पार पाडत आहे. पालकांमध्येही जागरूकता आली असून, अल्प उत्पन्न गटातील सर्वच घटकांना लाभ मिळाला. सदर कायद्यातील कलम १२ (१) सी नुसार २५ टक्के जागा दुर्बल घटकातील मुलांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. शिवाय त्यांचे शुल्क शासनाकडून संस्थांना मिळते.  त्यात अडथळे निर्माण झाल्याने संस्थाचालकांनी प्रवेश प्रक्रियाच थांबविली. आश्चर्य म्हणजे आरटीई मान्यता प्रमाणपत्र सर्व शाळांना देणे हे कायद्याने बंधनकारक असताना ते बहुतेक संस्थांना दिले नाही. त्यामुळे परतावा देण्याची वेळ आल्यावर शासकीय यंत्रणा संबंधित संस्थांना मान्यता प्रमाणपत्राची मागणी करत आहे. एकिकडे हे प्रमाणपत्र देणे शिक्षण विभागाची जबाबदारी असताना त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता कोट्यवधीचा परतावा देण्यास कारणे दिली जात आहेत.  सदर प्रमाणपत्र दिले नसल्यास ही योजना संबंधित शाळेत राबविता येत नाही, असा सूर आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या कामामुळे शाळांना द्यायच्या शुल्काची प्रतिपूर्ती वेळेत झाली नाही. ते काम लवकरच संपवून प्रतिपूर्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले  आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा आरटीई प्रवेशावरील बहिष्कार मागे घेणार का हा प्रश्न आहे.संपूर्ण राज्यात आरटीई प्रवेश अर्ज दाखल करण्यालाही शासनाने मुदतवाढ दिली आहे. २६ एप्रिलपर्यंतच अर्ज करता येणार होते ते आता ४ मेपर्यंत करता येतील. परंतु, अनेक जिल्ह्यांमध्ये शुल्क परतावा मिळाला नसल्याने संस्थाचालकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तूर्त प्रवेश प्रक्रियेत अडथळे होणार आहेत. एकूणच प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाईला शिक्षण विभाग कारणीभूत ठरत असून, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करणारे आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांचा प्रश्न कायद्यातील तरतुदीनुसार मार्गी लावून मोफत प्रवेशावर शाळांचा बहिष्कार यापुढे राहणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र