शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

बंडखोर सारस्वत - गिरीश कर्नाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 3:16 AM

पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यानंतर त्याची कशी उत्कृष्ट नवनिर्मिती होऊ शकते याचा प्रत्यय गिरीश कर्नाड यांच्या साहित्याने साऱ्या देशाला दिला आहे. दिग्दर्शन असो, अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रांत मनमुराद आणि बुद्धिनिष्ठ मुशाफिरी करणाºया गिरीश कर्नाड यांच्या निधनाने भारतीय साहित्य आणि कलेचा एक तारा निखळला आहे. गेली ५० वर्षे भारतीय रंगभूमीच्या केंद्रस्थानी असलेले गिरीश कर्नाड यांच्या निधनाने मराठीतील सजग कलाप्रेमीही हळहळले. केवळ भाषेपुरते नव्हे, त्यांचे एकूण साहित्यातील योगदान मराठी साहित्यिकांना नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.

पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले आणि इंग्रजी भाषांतरामुळे ते जगभर गाजले. कर्नाड यांना उत्तम मराठी येत होते. नगरच्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण आजही कित्येकांच्या स्मरणात आहे. पौराणिक संदर्भ घेत त्यांनी समकालीन नाट्यलेखन केले. परंपरेशी जखडलेल्या विचारांची साखळी त्यांनी नाटकातून तोडली. विशेषत: त्यांनी उभी केलेली आधुनिक स्त्री पात्रे त्यांच्या बंडखोर विचारांची साक्ष देत होती. नागमंडल, हयवदन, ययाती अशा विविध नाटकांतून त्यांनी उभी केलेली पात्रे कालानुरूप असली तरी काळाच्या पुढचा विचार मांडणारी, पारंपरिकतेची चौकट मोडणारी, विचारांच्या मूळ गाभ्याला आव्हान देणारी, अस्वस्थ करणारी अशीच त्यांची मांडणी होती. बदललेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांची नोंद घेत त्यांचे नाटक पुढे सरकत असे. त्यांच्या तुघलक, तलेदंड, टिपू सुलतान या नाटकांतून त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक पात्रांना उभे केले आणि समकालीन बदलांचा विचार मांडला. विशेषत: ७० च्या दशकात भारतीय कलेने कात टाकायला सुरुवात केली होती त्याचे पडसाद कर्नाड यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतात. कर्नाड यांनी विचारपूर्वक नाटकामध्ये नवीन फॉर्म्स आणले. ती मांडणी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली.

पारंपरिकतेची चौकट मोडणारी विचारसरणी असल्याने ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांचा नवा विचार समजावून न घेता त्यांना अनेकदा टीकेचे लक्ष्य केले गेले. तरीही गिरीश कर्नाड कुठेही अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी अतिशय संयमितपणे स्थिती हाताळत आरोपांना उत्तर दिले. त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. परंतु लोकशाहीत विचारांना विचारांनीच उत्तर द्यायला हवे या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या भाषणांतून त्यांनी अनेकदा ‘शहरी नक्षलवादा’चा पुरस्कार केला असा त्यांच्यावर आरोप केला गेला. बदलत्या आर्थिक आणि सामाजिक घडीची वैचारिक मांडणी करताना असा वाद उद्भवणे स्वाभाविक होते. परंतु कर्नाड यांनी कधीही कुठल्याही भाषणात अथवा लेखनात हिंसेचे समर्थन केले नाही. नवसमाज रचनेची मांडणी करताना प्रत्येक माणसाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे यावर ते ठाम असायचे. तरीही ते कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर राहिले. विशेषत: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांचा धोका वाढला होता. सुरक्षा यंत्रणांनी तसा अहवालही दिला होता. परंतु कर्नाड कुठेही विचलित झाले नाहीत. कडव्या धार्मिक ताठरतेच्या विरोधात ठाम भूमिका मांडत राहिले. २०१४ मध्येही पंतप्रधान मोदींच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची त्यांनी कधीही फिकीर केली नाही. नवा बंधमुक्त विचारच नवी शाश्वत वैचारिक बैठक निर्माण करू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच विविध क्षेत्रांतील इतके सर्वोच्च पुरस्कार मिळूनही मूळ विचारांची नाळ तुटू न देता ते नवी मांडणी करीत राहिले. आयुष्यभर विचारांचा संघर्ष वाट्याला आला तरी कुठेही न डगमगता नाटक, अभिनय, दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. प्रतिभेचा अलौकिक स्पर्श असल्यामुळेच त्यांच्या हातून उत्कृष्ट निर्मिती होत गेली. ही निर्मितीच आता एक अमीट इतिहास बनून राहणार, यात शंका नाही.

मराठी नाटकाचा इतिहास विजय तेंडुलकर यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही; तसेच गिरीश कर्नाड यांचे नाव कर्नाटक रंगभूमीवर सुवर्णाक्षराने कोरून ठेवले जाईल. इतकी दर्जेदार निर्मिती त्यांनी करून ठेवली आहे.

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडMarathi Natya Sammelanमराठी नाट्य संमेलनKarnatakकर्नाटक