शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील सज्जनशक्तीचा पुन्हा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 18:15 IST

मिलिंद कुलकर्णी बेरीज-वजाबाकी...! खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा ...

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर संयम, सौहार्दाचे वातावरण ; प्रशासनाच्या नियोजनाला संपूर्ण समाजाची उत्तम साथसमाजमाध्यमांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन ; एकात्मतेची भावना वाढीस लागल्याची सुखद भावना

मिलिंद कुलकर्णी

बेरीज-वजाबाकी...!खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन, पुरेसा पोलीस बंदोबस्त अशी पूर्वतयारी करण्यात आली होती. धुळ्यात आदल्यादिवशी दोन आणि नंदुरबारात एक गुन्हा दाखल झाला, ही कारवाई प्रभावशाली ठरली. इतिहासात काही शहरांविषयी नोंदी असतील, पण तरीही समाजाने ठरवले तर प्रतिमा निश्चित बदलू शकते, हे या घटनेने दाखवून दिले.समाजपुरुषाची परीक्षा घेणारे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावेळी समाजातील सज्जनशक्ती काय भूमिका घेते, त्यावर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अवलंबून असतो. भूतकाळातील घटनांविषयी तर नेहमीच दोन पक्ष राहिलेले आहेत, त्यासंबंधी विषय असला तर दोन्ही पक्ष हिरीरीने भूमिका मांडतात आणि आपली बाजू कशी खरी हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा वाद हा असाच आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने उत्तम असे संतुलन राखले आणि ना कुणाचा विजय झाला ना, कुणाचा पराजय झाला, अशी भावना निर्माण झाली. वाद मिटला, देश जिंकला असे वातावरण संपूर्ण देशभर होते.निकाल ऐतिहासिक आहेच, पण या निकालाचे पडसाद काय उमटू शकतात, यासंबंधी पुरेशी खबरादारी प्रशासनाने घेतली, हे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्टÑात नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली आहे. १८ दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सत्तासमीकरणात प्रमुख चार पक्ष गुंतलेले आहेत. शिवसेनेचे आमदार मुंबईत तर काँग्रेसचे आमदार जयपूरला आहेत. राष्टÑवादी व भाजपचे आमदार एकतर मतदारसंघात किंवा मुंबईतच असावे. राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या खेळात गुंतलेली असताना प्रशासनाने समाजातील जबाबदार घटकांचे सहकार्य घेत हा प्रसंग उत्तमपणे निभावला.धुळे आणि नंदुरबारमधील घटनांची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याने अतिउत्साही, उतावीळ मंडळींना चाप बसला. पुन्हा कोणी असा प्रकार करायला धजावले नाही.समाजातील सर्वच घटकांनी संयम, एकता, बंधुभावाचे विलक्षण दर्शन घडवले. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. बाजारपेठेतही तुरळक गर्दी होती. समाजाला विश्वास देण्यासाठी सज्जनशक्ती रस्त्यावर उतरली. शांतता फेरी काढण्यात आल्या. सभांमध्ये एकोप्याचे आवाहन केले गेले. याचा खूप मोठा परिणाम झाला. जनजीवन पूर्ववत झाले.समाजमाध्यमांविषयी एरवी फारसे चांगले मत नाही. परंतु, प्रशासनाने धोक्याची जाणीव करुन देताच समाजमाध्यमांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. कुणीही आक्षेपार्ह टिपणी न करता, एकोपा आणि बंधुभाव वृध्दिंगत होईल, असाच प्रयत्न केला.अयोध्या निकालाचे समाजात उमटलेले पडसाद पाहता समंजस, परिपक्वपणाचे विलक्षण दर्शन घडले. विजय, पराजयापेक्षा वाद मिटला, देश जिंकला ही भावना सर्वतोपरी ठरली. यातूनच समाज आणि देश पुढे जाणार आहे. संख्येने कमी असल्या तरी समाजात काही विघातक व विध्वंसक शक्ती आहेत, त्यांना समाजपुरुषाच्या या एकसंघ दर्शनाने व्यवस्थित संदेश मिळाला असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव