शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील समस्या, तर रोगापेक्षा उपाय भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 03:04 IST

राज्य सरकारांना विश्वासात घेऊन अशा रीतीने केंद्र सरकार काम करीत असेल, तर ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे, देश महासत्ता होणे दूर नाही. केंद्र सरकारची प्रशंसा करण्यात ठाकरे यांनी हात आखडता घेतला नाही

तीन आठवडे सुरू असलेला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल, या आशेवर नागरिक होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहील, हे स्पष्ट केले आहे. याबाबतची अनिश्चितता मुख्यमंत्र्यांनी संपविली. नागरिकांकडून याचे स्वागत होईल की नाही, याबद्दल शंका आहे. कारण, तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनने कोरोना विषाणूच्या फैलावाला थोडा अटकाव झाला असला, तरी अनेक समस्या पुढे आणल्या आहेत. लॉकडाऊन नसता, तर ‘कोरोना’बाधितांची संख्या आवाक्याबाहेर गेली असती. बाधितांची संख्या अजून कमी करावी किंवा मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे, ती शून्यावर आणावी यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एकट्या मुख्यमंत्र्यांचा नाही, तर केंद्र सरकारचेही त्याला अनुमोदन आहे, असे ठाकरे यांनी सूचित केले आहे. ‘कोरोना’मुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये चांगला संवाद सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांची झालेली व्हिडिओ कॉन्फरन्स तीन तासांहून अधिक वेळ चालू होती.

राज्य सरकारांना विश्वासात घेऊन अशा रीतीने केंद्र सरकार काम करीत असेल, तर ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे, देश महासत्ता होणे दूर नाही. केंद्र सरकारची प्रशंसा करण्यात ठाकरे यांनी हात आखडता घेतला नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणात कळकळ होती. जनतेबद्दल काळजी होती. जनतेने ऐकले नाही तर कारवाई करण्यात कुचराई होणार नाही, ही समजही त्यांनी दिली. मात्र, लॉकडाऊनने कोरोना थबकला तरी संपणारा नाही, याकडे दुर्लक्ष होऊ नये. भारतासाठी ‘कोरोना’ची समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. ती केवळ आरोग्याची समस्या राहिली नसून, लॉकडाऊनमुळे ती आर्थिक, सामाजिक आणि काही ठिकाणी मानसिक समस्या झालेली आहे. भूक आणि कोरोना यांच्या कैचीत भारत आणि महाराष्ट्र सापडला आहे. देशातील ४० टक्के लोक हे एकतर दारिद्र्यरेषेखालील आहेत वा रोजंदारीवर पोट भरणारे आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या प्रचंड म्हणावी अशी आहे. लॉकडाऊननंतर स्थलांतरितांचे लोंढे निघाले. त्यातील कित्येकजण अजून शहरांमध्ये अडकलेले आहेत. आणखी वीस दिवस अडकून पडण्याच्या कल्पनेने ते संभ्रमित झाले तर आश्चर्य वाटू नये.

शहरातील मध्यमवर्गाचा प्रश्न भाजी, धान्य यांचा असला तरी तो तितकासा गंभीर नाही; पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांची समस्या ही रोजच्या कमाईची आहे. दीड महिना कमाई न झाल्याने कित्येक कुटुंबे कोलमडून पडू शकतात. १४ तारखेनंतर सर्व ठीक होईल, अशा अपेक्षेने काहीजणांनी कर्जाऊ पैसे घेतले, तर अनेकांनी लोकांना मदतदेखील केली. अशी मदत पुढचे वीस दिवस सुरू राहील का, याची शंका आहे. गरिबांना पैशाची मदत सरकार तरी किती करणार. लॉकडाऊनमुळे ४० हजार कोटींचा महसूल बुडाला, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, तर पगार देण्यासही राज्य सरकारकडे पैसा नाही, अशी कबुली अशोक चव्हाण यांनी दिली. अशी स्थिती सरकारची असेल, तर पुढील तीन आठवड्यांत गरीब आणि मध्यमवर्गाची स्थिती आणखी दयनीय होईल. रोगापेक्षा औषध जालीम, अशी भावना लोकांची होऊ नये, याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल. ‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्र ठप्प झालेले आहे आणि ते ताबडतोब उभे राहणे शक्य नाही. अशा वेळी निदान काही विभागांमध्ये तरी आर्थिक उलाढाली सुरू करण्यास सरकारने प्राधान्य देणेआवश्यक बनले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेले संकेत दिलासादायक आहेत. ‘कोरोना’ची बाधा होणार नाही, याची काळजी घेऊन हे व्यवहार सुरू करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे. ते कसे करावे याचे उत्तर कोणाकडेच नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा प्रांजळ स्वभाव यातून दिसला. मात्र, या प्रश्नावरील उत्तर त्यांनाच शोधावे लागेल, लॉकडाऊन वाढविण्यावर अवलंबून राहाता येणार नाही.भारतासाठी ‘कोरोना’ची समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. ती केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नसून, लॉकडाऊनमुळे ती आर्थिक, सामाजिक व काही ठिकाणी मानसिक समस्या झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी