शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

By यदू जोशी | Published: September 17, 2018 6:26 AM

एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत.

भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी युती करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांनी नक्षलवादाचे समर्थन करण्यासारखाच अनाकलनीय आहे. एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत. धार्मिक उन्माद वा उच्छाद एखाद्या विशिष्ट धर्माच्या आड केला जातो म्हणून त्याला विरोध करायचा आणि त्याचवेळी इतर धर्माच्या आधारे तो पसरविण्यासाठी कारवाया करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसायचे असा विरोधाभास आंबेडकरांच्या नव्या राजकीय निर्णयातून प्रतीत होत आहे.आंबेडकर यांनी राजकीय सोयीसाठी मित्रपक्ष बदलले आणि मित्रही. तीन दशकांच्या राजकारणात त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू त्यांना एकेक करून सोडून गेले. त्यांना ज्यांनी अकोल्याच्या राजकारणात आणले ते लंकेश्वर गुरुजी तसेच प्रा. सुभाष पटनाईक, मखराम पवार, सूर्यभान ढोमणे, बी.आर. शिरसाट अशा मंडळींचा पुढे आंबेडकर यांच्या राजकारणाबाबत भ्रमनिरास झाला. सर्व जातींना सोबत घेऊन राजकारण करण्याचा त्यांचा अकोला पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला पण ते स्वबळावर कधीही लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. काँग्रेससोबत आघाडीत होते तेव्हाच त्यांना लोकसभेत बसता आले. गेल्या वेळी त्यांनी पाचपंचवीस पक्षांना एकत्र आणून राज्यात काँग्रेसेतर आघाडी उभारली, पण ती अपयशाच्या गाळात रुतली.काँग्रेसच्या पुढाकाराने भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असताना आंबेडकर यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. एमआयएम किंवा मनसे असे दोन पक्ष आहेत ज्यांना सोबत घेणे काँग्रेसला राज्य व राष्ट्रीय पातळीवर शक्य नाही. कारण, एमआयएमशी दोस्ती केली तर काँग्रेसची हिंदू मते हातून जाण्याची भीती आहे आणि मनसेचे बोट धरले तर काँग्रेसचा हात हिंदी भाषिक राज्यांमध्ये पोळेल. तथापि, मर्यादित का असेना पण काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या प्रकाश आंबेडकरांची ताकद काँग्रेसला बळ देणारी ठरू शकली असती. काँग्रेसने त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली. आंबेडकर हे एकीकडे संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनांवर वैचारिक हल्ला चढवतात, पण दुसरीकडे त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन ते भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडते हा आरोप जुनाच आहे. निवडणूक निकालाची आकडेवारीही या आरोपाला पुष्टी देत आली आहे. एमआयएमशी दोस्ती करून आंबेडकर यांनी सदर आरोपास बळच दिले आहे. २०१४ सारखी मोदी लाट आज उरलेली नाही. अशा वेळी आपल्या विरोधातील मतांचे विभाजन भाजपाला हवेच आहे. आंबेडकरांच्या नव्या घरठावाने राज्यातील भाजपा नेत्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.रामदास आठवले, लाँगमार्चचे प्रणेते या बिरुदावर जगणारे आणि जाता जाता मुलाला राजकारणात कुठेतरी चिकटवून जायच्या प्रयत्नात असलेले प्रा. जोगेंद्र कवाडे, वडील दिवंगत रा.सू. गवई यांचे दहा टक्केही गुण अंगी नसलेले डॉ. राजेंद्र गवई आणि आता एमआयएमच्या नादी लागलेले आंबेडकर यांच्यापैकी कोणालाही रिपब्लिकन ऐक्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. प्रत्येकाने आपल्या सोयीचे दुकान गाठले आहे.(लेखक मुंबई लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत)

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ