शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

दर्या मे खसखस!

By admin | Updated: April 12, 2016 04:04 IST

जवळजवळ तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्र सरकारला शंभर कोटी रुपयांची मातब्बरी वाटण्याचे काही कारण असू शकेल काय?

जवळजवळ तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्र सरकारला शंभर कोटी रुपयांची मातब्बरी वाटण्याचे काही कारण असू शकेल काय? तुलनेने ही चिमुकली रक्कम म्हणजे दर्या मे खसखस! पण या शंभर कोटींची राज्य सरकारला मातब्बरी वाटावी असा भाजपाचेच खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांचा आग्रह असावा असे दिसते. त्यामुळेच पाण्याच्या टंचाईचे ‘निमित्त’ पुढे करुन राज्य सरकारने आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या जुगाराचे सामने महाराष्ट्रातून बहिष्कृत केले तर या ‘इतक्या मोठ्या’ रकमेवर पाणी सोडावे लागेल असा धमकीमिश्रित इशारा त्यांनी दिला आहे. मुळात राज्य सरकारचा निर्णय आत्मप्रेरणेतून आलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झक्कू लावला तेव्हां कुठे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ठोस भूमिका घेणे भाग पडले. भाजपा सरकारला त्यांच्याच एका खासदाराने असा खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला असता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेन्द्रसिंग धोनी यालाही यात मध्येच तोंड खुपसण्याचे काही कारण नव्हते. त्याने थेट मुंबई उच्च न्यायालयाला अंगावर घेत न्यायालयाच्या निर्णयाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळविले गेले तरी महाराष्ट्रातील दुष्काळाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटणार नाही असा तारा तोडला आहे. खुद्द न्यायालयदेखील तसे म्हणत नाही. मुद्दा प्राथम्यक्रमाचा आहे, दुष्काळ निवारणाचा नाही. तो निवारण्याचे काम निसर्गाच्या हाती आहे आणि निसर्ग आपले काम आणखी दोन महिन्यांनंतर सुरु करील असा वेधशाळेचा अंदाज आहे. तोवर पाण्याचा जो काही साठा उपलब्ध आहे त्याचा काटकसरीने वापर करण्याचा आजचा प्रश्न आहे. दर्याभर गोडे पाणी उपलब्ध असते तर न्यायालयाला मध्यस्थी करण्याची गरजच भासली नसती