शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

पालक बालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 08:43 IST

वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी प्रकार, चित्रे काढणे, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविण्यात येणार असल्याचा दावा केला जातो.

-मिलिंद कुलकर्णी

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, दोन गोष्टी प्रामुख्याने होतात. एकतर कुठेतरी सहलीला जायचे नियोजन होते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात पाल्याला पाठवायचे निश्चित केले जाते. वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्थांचे प्रशिक्षण शिबिरांचे नियोजन सुरु होते. जाहिराती, प्रचार पत्रके यामाध्यमातून शिबिरांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरु असते. तीन दिवसांपासून तर १५ दिवसांपर्यंत शिबिरांचा कालावधी असतो. त्यात काय शिकविले जाणार याची मोठी जंत्री असते. वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी प्रकार, चित्रे काढणे, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविण्यात येणार असल्याचा दावा केला जातो. तज्ज्ञ मार्गदर्शकांची नावे दिलेली असतात, नावापुढे काही पदव्या असतात. त्याचा बोध फारसा होत नाही. पण असतील अशा पदव्या, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शिबिराचे स्थळ हा देखील महत्त्वाचा विषय असतो. एखादे उद्यान, मैदान, शाळा, फार्म हाऊस अशा ठिकाणी ही शिबिरे घेतली जातात. परंतु एवढ्या मोजक्या कालावधीत एवढे प्रकाश मुले शिकतील का, असा प्रश्न पालकांना पडत नाही. पोहण्याचा तलाव, घोड्यावरील रपेट अशा ठिकाणी पुरेशी दक्षता बाळगली जाते काय? निवासी शिबिर असेल तर व्यवस्था किमान राहण्यालायक आहे काय, याची काळजी पालक म्हणून घेतली जात नाही. अर्थात याला अपवाद आहेत. काही प्रतिष्ठित संस्था सुनियोजित शिबिरे घेतात आणि त्यांचा अनेक वर्षांपासून नावलौकीक आहे. चर्चा शिबिरांच्या नावावर दुकान मांडणाऱ्यांविषयीची आहे. शिबीर संयोजक किंवा पालकांना असा प्रश्न विचारला तर त्यांचे म्हणणे असते, आम्ही प्रशिक्षित करु असे म्हणत नाही. या प्रकारांची त्याला तोंडओळख होईल. त्यापैकी कोणत्या क्षेत्रात त्याला गती, आवड आहे, हे आम्ही निरीक्षण करतो आणि पालकांना सूचना करतो. म्हणजे वर्षभर त्या विषयाचे त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षण देता येईल आणि सराव करता येईल. पालकांच्या म्हणण्यानुसार, वर्षभर शाळा असल्याने तो अभ्यासात गुंतून पडतो, त्याला क्रीडा प्रकाराची आवड निर्माण व्हावी, व्यक्तिमत्व विकसित व्हावे, समूहजीवनाची सवय व्हावी हा आमचा उद्देश असतो. संयोजक आणि पालकांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य असले तरी या शिबिरांनी फारसे काही साध्य होते असे वाटत नाही. मुळात वेगवेगळे क्रीडा प्रकार एवढ्या कमी कालावधीत शिकविले जाणेच शक्य नाही. तोंडओळख केवळ शिबिरांमधूनच होते काय? वर्षभर पाल्यांना आम्ही मातीचा, मैदानाचा स्पर्श होऊ देणार नाही आणि शिबिरातून त्याने पारंगत व्हावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. काहीवेळा तर असे वाटते की, वर्षभर शाळेत गुंतलेल्या पाल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही शिबिरांमध्ये गुंतवून, आमच्या जबाबदारीतून तर मुक्त होत नाही ना? पालक म्हणून आम्ही मामाचे गाव, आमराई, गोट्या, भोवरा, विट्टीदांडू असे खेळ, चुलत, मामे, आतेभावंडांचे जमणारे गोकूळ असे स्मरणरंजन पाल्यांसमोर करायचे आणि स्वत: मात्र पाल्यांना या आनंदापासून वंचित ठेवायचे, हे कितपत योग्य आहे. खरेतर आज पालकांच्या समुपदेशानाची आवश्यकता आहे, हे या उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते.

टॅग्स :Studentविद्यार्थी