शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

एकदा स्वत:शी बोलून तर बघा!

By admin | Updated: April 10, 2016 02:37 IST

नुकतीच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने अवघ्या २४ व्या वर्षी आपले आयुष्य संपवून टाकले. जिया खान हे त्यातलंच अजून एक उदाहरण... यांच्या आयुष्याला भेडसावत असलेला हा प्रश्न कोणता

विशेष  -  डॉ. स्वप्ना पाटकरनुकतीच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने अवघ्या २४ व्या वर्षी आपले आयुष्य संपवून टाकले. जिया खान हे त्यातलंच अजून एक उदाहरण... यांच्या आयुष्याला भेडसावत असलेला हा प्रश्न कोणता की, ज्याचे उत्तर केवळ आत्महत्या..? या जगात संवाद साधल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. फक्त तो साधणे खूप महत्त्वाचे आहे. दुरून डोंगर साजरे या उक्तीला साजेशी आहे ही ताऱ्यांची दुनिया... या चंदेरी जगाच्या शोधात कित्येक पावलं या दिशेने चालायला लागतात आणि मग एक-एक करून समोर येणाऱ्या आव्हानांपुढे गुडघे टेकतात. 'नेम आणि फेम' कमावण्याच्या उद्देशाने छोट्या शहरातल्या हजारो तरुण-तरुणी या मुंबापुरीत येऊन थडकतात... आपली स्वप्न हे मुंबई शहर नक्की पूर्ण करेल या विश्वासाने या शहरात पाऊल टाकतात. कसेतरी पैसे जमवून मोठाल्या अ‍ॅक्टिंग स्कूल्समध्ये दाखला घेतात. छोटासा रोल मिळवण्यासाठी कित्येक प्रोडक्शन हाउसच्या पायऱ्या झिजवतात. पार्टीजमध्ये उपस्थित राहून अचूक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. अशी ही रोजची धावपळ... या स्पर्धेत यशस्वी होण्याचा अट्टाहास कित्येकांच्या जिवावर बेतला आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने, नैराश्य आणि त्या नैराश्यातून आत्महत्या...आयुष्यात प्रसिद्धीबरोबर जबाबदारी येते. लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्यात आपला रोल मॉडेल शोधतात, तेव्हा आपण एक उत्तम उदाहरणाच्या रूपात लोकांसमोर येणे महत्त्वाचे... अनेक प्रसंगात नैराश्य येते. ते स्वाभाविकही आहे, पण या सगळ्यात संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. कुटुंबातल्या जवळच्या सदस्याशी किंवा एखाद्या चांगल्या मित्राशी साधलेला संवाद बऱ्याच संकटांवर उपाय ठरू शकतो. काही वेळा मनोवैज्ञानिकाची मदत घेता येऊ शकते. कुटुंबाशी बांधिलकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक कुटुंबाने याचा विचार करावा. आपल्या पाल्याला, ‘आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत,' हा विश्वास पालकांना देता आला पाहिजे. चांगल्या किंवा वाईट विषयावर झालेली चर्चा बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला देऊन जातील.'सशक्त मन'...सशक्त शरीर सुंदर जीवनाचा पाया आहे. स्वत:वर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची वाट चालावी. भविष्याची आखणी करताना वर्तमानात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. नकारात्मक दृष्टी असणाऱ्या माणसांपासून शक्य तितके लांब राहा. कोणत्याही समस्येने निराश होऊ नका. आत्महत्येच्या विचारावर मात करण्यात शहाणपण आहे. आपल्या आयुष्याचा आनंद हा आपल्याच हातात आहे, तेव्हा तुमच्या आनंदाची सूत्र दुसऱ्या कोणाच्या हाती न देता, छोटे-छोटे आनंदाचे क्षण नक्की साजरे करा. आरशासमोर उभे राहिल्यानंतर आरशात असणारी ती व्यक्ती तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी समर्थ आहे, त्या माणसाशी साधलेला संवाद अनेक समस्यांचे निराकरण करेल. तेव्हा आपल्या कोणत्याही समस्येसाठी एकदा स्वत:शी बोलून तर बघा... (लेखिका मनोचिकित्सक आहेत.)