शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

नुरा कुस्ती

By admin | Updated: July 14, 2017 23:59 IST

कोणताही राजकीय पक्ष काहीही दावा करीत असला तरी राज्य शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांची एकजूट आणि आंदोलनाच्या दबावामुळे घेतला हे उघड सत्य आहे.

कर्जमाफीविषयी कोणताही राजकीय पक्ष काहीही दावा करीत असला तरी राज्य शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांची एकजूट आणि आंदोलनाच्या दबावामुळे घेतला हे उघड सत्य आहे. या निर्णयाचे श्रेय आता प्रत्येक पक्षाने घेणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या विषयावरून सुरू असलेले रणकंदन ‘नुरा कुस्ती’ असल्याचा संशय वाटण्याजोगी स्थिती आहे. खान्देशात या दोन्ही पक्षांचे नेते नुकतेच येऊन गेले. कर्जमाफीचा लाभ, दहा हजार रुपयांची उचल यासंबंधी सरकारला धारेवर धरण्यापेक्षा या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केले. उध्दव ठाकरे आधी आले. शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याची अजित पवार यांची टीका ठाकरेंना चांगलीच झोंबलेली होती. अजित पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा असल्याने ते सरकारविरुध्द बोलत नसल्याची मर्मभेदी टीका ठाकरे यांनी केली. दुसऱ्याच दिवशी अजित पवार आले. त्यांनी गांडुळाचा अधिक विस्तार करीत शिवसेनेच्या ‘ढोल वाजवा’ आंदोलनाची टर उडवली. सरकारमध्ये राहायचं आणि सरकारला विरोधही करायचा अशी डबल ढोलकी शिवसेना वाजवित असल्याची टीका पवारांनी केली. त्यांनी शिवसेनेचे पुरते वस्त्रहरण करणारी उदाहरणे देत सभा जिंकल्या. जिल्हा बँकेत कर्जमाफीच्या याद्या कसल्या तपासता, मातोश्रीजवळ मंत्रालय आहे, तेथून याद्या घ्या आणि तपासा, मुंबई महापालिकेकडे कोट्यवधींच्या ठेवी आहेत, त्या कर्जमाफीसाठी सरकारला द्या तसेच सातबारा कोरा झाल्याशिवाय मंत्रिमंडळाची बैठक होऊ देऊ नका असे शाब्दिक हल्ले करीत सेनेला पुरते घायाळ केले. राजकारण म्हणून दौरे, राजकीय सभा घेतल्या गेल्या. त्या चांगल्या म्हणून नेते आनंदले आणि दौरा जोमात झाला, म्हणून आयोजक स्थानिक नेते खूश झाले. पण शेतकऱ्याच्या हाती काय पडले? हा कळीचा मुद्दा आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनलच्या तर धुळे-नंदुरबार जिल्हा बँक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा बँकांच्या मदतीने शेतकऱ्यांना काहीही दिलासा दिलेला नाही. आमची आर्थिक स्थिती खराब आहे, आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही, असे या जिल्हा बँकांनी घोषित करून काखा वर केल्या आहेत. गंमत म्हणजे जळगाव बॅँकेचे उपाध्यक्ष हे शिवसेनेचे आमदार आहेत. स्वत:च्या बँकेसमोर पक्षादेश म्हणून त्यांनी ढोल वाजविला. उपाध्यक्षाच्या खुर्चीत बसून बँकेची बाजू आणि बँकेबाहेर ढोल वाजवून बँकेच्या नावाने शंखनाद करणे, याविषयी ना उध्दव ठाकरे बोलले ना अजित पवार. कर्जमाफीचे श्रेय भाजपाला जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी-शिवसेनेची ही ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे, असेच म्हणावे लागेल.