शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

रद्द होत नाही तोवर

By admin | Updated: October 12, 2015 22:10 IST

जम्मू-काश्मीर राज्याला राज्यघटनेतील ज्या ३७०व्या कलमान्वये विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे, ते कलम कायमस्वरुपी असल्याचा जो निवाडा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे

जम्मू-काश्मीर राज्याला राज्यघटनेतील ज्या ३७०व्या कलमान्वये विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे, ते कलम कायमस्वरुपी असल्याचा जो निवाडा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे, त्यात ऐतिहासिक वगैरे काहीही नाही. राज्यघटनेतील प्रत्येक कलमच कायमस्वरुपी असते. त्यामुळेच संपूर्ण राज्यघटनेच्या पुनर्विचाराची मागणी केली जाते किंवा अलीकडच्याच काळातील मागासवर्गीयांना अनुज्ञेय आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली जाते तेव्हां आगडोंब उसळत असतो. अर्थात या उसळण्याला वैधानिक नव्हे तर भावनिक आधार असतो. ३७०व्या कलमाच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. घटनेतील हे कलम रद्द करावे आणि त्या राज्याला देशातील अन्य राज्यांच्या समकक्ष आणून ठेवावे ही भाजपा आणि संघ परिवाराची केवळ भूमिकाच आहे असे नव्हे तर तो त्यांचा आग्रह आहे. पण दोनदा सत्तेत येऊनही त्यांना ते जमलेले नाही. कारण राज्यघटनेतील काश्मिरविषयक किंवा अन्य काही राज्यांच्या संबंधी ज्या तरतुदी समाविष्ट आहेत, त्या हटवायच्या झाल्या तर संबंधित राज्यांच्या विधिमंडळांनाच तसा ठराव संमत करुन केन्द्राकडे आपल्या शिफारसीसह पाठविणे अगत्याचे असते. अर्थात त्यानंतरही संसदेतदेखील तीन चतुर्थांश मताधिक्य असल्याखेरीज आणि निम्म्या राज्यांचीही संमती असल्याशिवाय कोणतीही घटना दुरुस्ती अस्तित्वात येऊ शकत नाही. भाजपापाशी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात लोकसभेतही पूर्ण बहुमत नव्हते. आज नरेन्द्र मोदी यांच्यापाशी लोकसभेतील भक्कम बहुमत असले तरी राज्यसभेत तो पक्ष अजून तरी कमकुवतच आहे. खुद्द जम्मू-काश्मीरचा विचार करायचा तर गेल्या पासष्ट वर्षात पहिल्यांदाच भाजपाला त्या राज्याच्या सत्तेची चव चाखायला मिळाली आहे. पण तीदेखील अर्धवटच. मेहबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखालील पीडीपी हा पक्ष त्या राज्यात भाजपाच्या तुलनेत वडिलकीच्या भूमिकेत आहे. साहजिकच तो पक्ष आपल्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व आपणहून गमवायला कधीही तयार होणार नाही. पण ही परिस्थिती कायम राहणार नाही अशा आशेवर भाजपा आहे आणि दीर्घकाळ तिला ही आशा टिकवून ठेवावी लागेल अशी लक्षणे आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने काही वेगळे सांगितले असे अजिबात नाही.