शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सरकार नव्हे फड?

By admin | Updated: January 26, 2016 02:35 IST

‘तुझं नी माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ ही आणि अशीच अवस्था शिवसेना आणि भाजपा यांच्यात पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील यात शंका नाही.

‘तुझं नी माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ ही आणि अशीच अवस्था शिवसेना आणि भाजपा यांच्यात पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील यात शंका नाही. पण तरीदेखील सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. एका परीने त्यांची सत्तासंगत हा नाईलाजाचा मामला आहे. पण तसे असले तरी महाराष्ट्रातील जनतेने आपले किमान पाच वर्षांसाठीचे का होईना स्वत:चे भवितव्य आपल्या हाती सुपूर्द केले आहे याचे भान दोहोंनी बाळगणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांच्या मनात कुठेतरी असणे गरजेचे असताना तसे दिसत मात्र नाही. शिवसेनेचा आणि तिच्या सैनिकांचा एकूणच खोडकर स्वभाव एव्हाना भाजपाच्याही पूर्ण लक्षात यायला हरकत नाही. असे असताना ‘अरे ला कारे’ करणे यात शोभा होतच असेल तर या दोन्ही पक्षांची नव्हे तर सरकारची आणि सरकार ज्यांच्यासाठी काम करते त्या जनतेची. अलीकडच्या काळात असे प्रकार वारंवार होत चालले आहेत आणि माध्यमांमधून ‘फडणवीस यांचा सेनेला टोला, सेनेला कानपिचक्या’ यासारखी वर्णने प्रसिद्ध होऊ लागली आहेत. जणू सरकार म्हणजे सवाल-जबाबाचा फडच आहे! परवाच एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सरकारचा रिमोट कन्ट््रोल त्यांच्या हाती असल्याची कानपिचकी म्हणे सेना नेत्यांच्या पुढ्यात दिली. तितकेच नव्हे तर सेनाप्रमुखांनी हा कन्ट्रोल म्हणे त्यांच्या हाती दिला आहे. मुळात मुख्यमंत्री राज्याचा एका परीने सर्वेसर्वा असतो पण त्याला वारंवार हे सांगत बसावे लागत नाही. दुसरे आणि अधिक महत्वाचे म्हणजे फडणवीसांच्या हाती असलेला तथाकथित कन्ट््रोल सेनाप्रमुखांनी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे आणि त्याचा वापर आपल्या भल्यासाठी केला जावा, सेनेला येताजाता ढुशा देण्यासाठी नव्हे, ही आणि केवळ हीच या राज्यातील जनतेची अपेक्षा आहे.