शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 04:50 IST

नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील.

पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून भारतातून परागंदा झालेला हिरे व्यापारी निरव मोदी याची लंडनमध्ये झालेली अटक हा एक शुभसंकेत म्हणावा लागेल. मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्ल्या याच्या पाठोपाठ भारतीय कायद्याच्या कचाट्यात आलेला मोदी हा दुसरा बडा कर्जबुडव्या भगोडा आहे. ‘पीएनबी’ प्रकरणात निरव मोदीविरुद्ध दोन प्रकारचे खटले भारतात सुरु आहेत. एक ‘सीबीआय’ने दाखल केलेला फौजदारी खटला व दुसरा अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेला  ‘मनी लाँड्रिंग ’चा खटला. या पक्र रणात आरोपपत्र दाखल होण्याआधीच निरव मोदी, त्याची पत्नी, मुलगा व मामा मेहुल चोकशी देशातून पळून गेले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द केला गेला तरी कित्येक महिने तो अनेक देशांमध्ये फिरत राहिला. समन्स काढूनही हजर न राहिल्यान े मब्ुं ाइतर्् ाील न्यायालयान े त्याच्याविरुद्ध वारॅ न्ट काढले होतेच. त्याआधारे ‘इंटरपोल’च्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी झाली. मध्यंतरी निरव अमूक-तमूक देशात असल्याच्या बातम्या येत राहिल्या. ब्रिटनमध्येही गेल्याच आठवड्यात बिट्र नमधील ‘दि टेलिगा्र फ’ या वत्त्ृ ापत्रान े निरव मोदी लडं नच्या उच्चभू्रवस्तीतील रस्त्यावर फिरत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. तो लंडनमध्ये एका आलिशान μलॅटमध्ये राहात असल्याचे वृत्तही त्यासोबतदिले गेले. सुदैव असे की, निरव मोदीचा ठावठिकाणा ब्रिटनमध्ये लागला. सुदैव अशासाठी की भारताचा ब्रिटनसोबत प्रत्यार्पण करार झालेला आहे.विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणाचा अनुभव ताजा असल्याने भारत सरकारने लगेच ब्रिटन सरकारकडे निरव मोदीच्या प्रत्यार्पणाची औपचारिक विनंती सादर केली. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनीही वेळ न दवडता भारताची ही विनंती न्यायालयाकडे पाठविली. त्यानुसार न्यायालयाने निरव मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मंगळवारी रात्री ४८ वर्षांच्या निरव दीपक मोदीला लंडनच्या हॉलबोर्न मेट्रो स्टेशनवर अटक केली. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयापुढे हजर केले गेले. विजय मल्ल्याला न्यायालयाने लगेच जामिनावर सोडले होते. निरव मोदीनेही जामिनासाठी अर्ज केला. ज्यावर प्रवास करता येईल अशी सर्व कागदपत्रे त्याने न्यायालयाच्या हवाली केली. बँकेचे पैसेही आपण परत करण्याचे आश्वासन दिले. पण जामिनावर सोडले तर निरव मोदी पुन्हा परत येईलयाची खात्री वाटत नाही, असे नमूद करून, महिला न्यायाधीशांनी त्याला लगेच जामीन न देता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी ठेवली. त्यामुळे बदनाम झालेल्या या लक्ष्मीपुत्रास पुढील आठ दिवस तरी कोठडीत राहावे लागेल. प्रत्यार्पणाच्या कायदेशीर कारवाईची ही केवळ सुरुवात आहे.मल्ल्याच्या अटकेनंतरही त्याच्या प्रत्यार्पणास न्यायालायने मंजुरी देण्यास एक वर्षाहून अधिक काळ गेला होता. मात्र भारतासारखी ब्रिटनमध्ये न्यायालयीन प्रकरणे कित्येक वर्षे पडून राहात नाहीत, हेही खरे. न्यायालयाने मंजुरी दिली तरी प्रत्यार्पणाचा विषय पुन्हा ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे जाईल. त्यांनी संमती दिल्यावरही न्यायालयांत अपिलांचे दोन टप्पे होऊ शकतात. त्यामुळे निरव मोदीला भारतात आणण्यास कदाचित दोन वषर्हे ी लाग ू शकतील. पण निदान तोपयतर््ं ा तो भारताच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, असे चित्र तरी असणार नाही. ‘ईडी’ने निरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या भारताखेरीज हाँगकाँग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, सिंगापूर व संयुक्त अरब अमिरातींमधील १,८७३ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टांच आणली आहे. आणखी ४८९ कोटींच्या मालमत्ता जप्तही करण्यात आल्या आहेत. यातून बँकांचा बुडालेला पैसा वसूल करण्यासाठी निरव मोदी खटल्यांमध्ये दोषी ठरावा लागेल. हे व्हायला वेळ लागेल. पण, देशातील बँकांचा पैसा लुबाडणारा जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी भारत सरकार त्याचा नेटाने पिच्छा पुरविते असा आश्वासक संदेश मल्ल्या व निरव मोदी यांच्या प्रकरणातून मिळेल, हेही कमी नाही. एक देश म्हणून भारताने हे करायलाच हवे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीतील मतांसाठी त्याचे श्रेय घेणे हा राजकीय करंटेपणा ठरेल.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याEnglandइंग्लंडIndiaभारत